Posts

Showing posts from May, 2025

विशेष लेख क्र.22 - आदर्श राजमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

Image
आदर्श राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं. आदर्श कन्या, सुशील भार्या, सर्वगुणसंपन्न माता अन् प्रजाहितदक्ष शासक अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून त्यांनी आजीवन जनसेवा केली. इतकेच नव्हे तर, सर्वधर्मियांना विश्वासात घेऊन उत्तम राज्यकारभार केला. महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम हे अहिल्यादेवी यांच्या कारकिर्दीत गुण्यागोविंदाने नांदलेत. राजकारणातून समाजकारण करून धर्मपरायणात सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या अहिल्यादेवींना हिंदू संस्कृतीतील पुण्यश्लोक ही उपाधी बहाल करण्यात आली. ही गोष्ट मराठी जनमानसाच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे. अहिल्यादेवींनी आपल्या कारकीर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाररासाठी ठोस उपाययोजना करताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. त्यांच्यासाठी देखील राजकोषात आर्थिक तरतूद केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणप...

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत

Image
  ठाणे,दि.30(जिमाका):-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान- अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित / संकरीत वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांतर्गत प्रति शेतकरी आर्थिक सहाय्य किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सोयाबीन, भुईमुग, सुर्यफूल व तीळ या पिकांकरिता 100% अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याकरिता  https://mahadbt.maharashtra. gov.in/FarmerAgriLogin/ AgriLogin  या संकेतस्थळावर  “ बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते ”  या टाईटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी दि.30 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येईल.   तसेच भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिता अनुदानावर प्रमाणित बियाणे उप...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण पौष्टिक तृणधान्य-उपअभियान (श्रीअन्न) अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण

Image
  ठाणे,दि.30(जिमाका):-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) नाचणी प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांनी अर्ज करण्याबाबत कळविण्यात आले आहे. लाभार्थी निवड निकषः प्रमाणित बियाणे वितरण या घटाकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. या प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकांमार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCES) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण संबंधित संस्थेनी करावे. नाचणी बियाण्याकरीता रु.3 हजार प्रति क्विंटल शासकीय अनुदान असून उर्वरित रक्कम लाभार्थी हिस्सा शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना द्यावा लागेल. 10 वर्षांच्या आतील अधिसूचित वाण प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत अनुदानास पात्र ठरतील. वितरकांनी दर्शनी भागावर अन्न आणि पोषण सुरक्षा कार्यक्रमातंर्गत प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध असल्याचा फलक लावावा. संबंधित वितरकाने बियाण्याचे वाणनिहाय दर, अनुदान व अनुदान वजा ज...

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती

             ठाणे, दि.30 (जिमाका) :-   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्या आधिपत्याखालील धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथील  सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे आणि माजी सैनिक विश्रामगृह, ठाणे या दोन आस्थापनांवर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी  माजी सैनिक प्रवर्गातून कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.                   वसतिगृहासाठी भरण्यात येणारे पद :-    वसतिगृह अधीक्षक  (पुरुष)   - 01 (माजी सैनिक  JCO  प्रवर्गातून) , निवासी ड्युटी, राहण्यास १ BHK निवासस्थान, वयोमर्यादा  - 35 ते 55 वर्ष, शैक्षणिक पात्रता  - किमान SSC पास संगणक ज्ञान, दुचाकी चालक परवाना आवश्यक, एकत्रित मासिक मानधन - रुपये 31 हजार 875/-. विश्रामगृहासाठी भरण्यात येणा रे   पद :-  स्वागत कक्ष सहायक  - 01   (माजी सैनिक प्रवर्गातून  JCO उमेदवारास प्राधान्य ),  अनिवासी ड्युटी, वयोमर्यादा  - 35 ते 55 वर्...

विकसित कृषी संकल्प अभियानाचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Image
                                    ठाणे, दि.29 (जिमाका) :-    ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात विकसित कृषी संकल्प अभियानाचे  दि.29 मे ते दि. 12 जून 2025 या कालावधीत 15 दिवस राबविण्यात येणाऱ्या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र ठाणे, डॉ. सुरेश जगदाळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ डॉ. सलील हंडे, डॉ.मयुरा गोळे, डॉ.संग्राम चव्हाण, डॉ.संजय कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, तहसिलदार रेवण लेंभे, तहसिलदार सचिन चौधर व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा‍धिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले. ...

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025

ठाणे, दि.29(जिमाका) :-  पुनर्रचित हवामान आधारित फळप ि क विमा योजना दि. 12 जून ,  2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृ षी  विमा कंपनी ,  बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी ,  फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्ह र्स ल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग व आंबिया बहारामध्ये अधि सू चित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी  महाराष्ट्र  राज्यात राबविण्यात येत आहे. मृग बहार सन 2025 मध्ये संत्रा ,  मोसंबी ,  डाळिंब ,  द्राक्ष (क) ,  चिकू ,  पेरु ,  सिताफळ व लिंबू या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन 2025-26 मध्ये डाळिंब ,  संत्रा ,  मोसंबी ,  काजू ,  केळी ,  द्राक्ष ,  आंबा ,  पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. दि. 11 एप्रिल ,  2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. 15 मे ,  2025 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

ठाणे, दि.29(जिमाका) :-  राज्यातील फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सन  2005-06  पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यात आले .  सन  2014-15  पासून  “ एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ”   प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत केंद्र शासनाचा  60  टक्के व राज्य शासनाचा  40  टक्के असा सहभाग असून ,  शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा व जीवनमान सुधारण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध उपघटकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उद्देश  :- 1.     वैविध्यपूर्ण   कृ षी   हवामान   विभागानुसार   प्रादेशिक   अनुकूलता   व   गरजा   लक्षात   घेऊन   त्या   त्या   प्रदेशातील   फलोद्यान   क्षेत्राचा   संशोधन ,  तंत्रज्ञान ,  प्रसार ,  काढणीत्तोर   तंत्रज्ञान ,  प्रक्रिया   व   पणन   सुविधा   यांच्या   माध्यमातून   स मू ह   पद्धतीने   स र...