Posts

Showing posts from December, 2025

शहिदी समागम कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय आणि अशासकीय यंत्रणांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांचा इतिहास समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावा -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शहिदी समागम कार्यक्रम आयोजनाची आढावा बैठक संपन्न

Image
  ठाणे, दि.4(जिमाका):- "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर" यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी तसेच अशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.             नवी मुंबई,खारघर येथील ओव्हल मैदान येथे दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत शहिदी समागमचे आयोजन करण्यात येत आहे. या   कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, या कार्यक्रमाची सुरुवात आरम्भता की ‘अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आज करण्यात आली.   या कार्यक्रमास शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल आणि अन्य सर्व समाजांचे समाजबांधव देखील लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.   या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण...

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणूक -2025 एकूण 58.10 टक्के मतदान 1 लाख 30 हजार 926 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Image
  ठाणे,दि.03(जिमाका) :-   ठाणे जिल्हयातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी    दि.02 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार एकूण 58.10 टक्के मतदान झाले असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मतदार यादीनुसार कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेमध्ये एकूण 24 प्रभागांमध्ये मतदान झाले. या 24 प्रभागांमध्ये एकूण 1 लाख 17 हजार 653 पुरुष, 1 लाख 7 हजार 686 स्त्री आणि 16 इतर असे एकूण 2 लाख 25 हजार 355 मतदार होते त्यापैकी 68 हजार 257 पुरुष, 62 हजार 667 स्त्री आणि 2 इतर असे एकूण 1 लाख 30 हजार 926 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी बातमीसोबत जोडण्यात आली आहे. मतमोजणी रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. 000000000    

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल 21 डिसेंबरला होणार मतमोजणी

    ठाणे,दि.02(जिमाका)  :-  राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि दि.03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी नियोजित होती परंतु मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या रिट याचिकेच्या सुनावणीमध्ये देण्यात आलेल्या निर्णयानुसार दि.3 डिसेंबर 2025 रोजी होणारी मतमोजणी ही आता दि. 21 डिसेंबर 2025 रोजी करावी व तसा निकाल घोषित करावा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच न्यायालयीन अपील दाखल झाल्याने बाधित झालेल्या नगरपरिषदा/नगरपंचायतींकरिता मतदान दि.20 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी दि.21 डिसेंबर 2025 रोजी नियोजित असल्याची माहिती महाराष्ट्र  राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली आहे.             नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणीदरम्यान 2 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याचे आदेश दिले.  याआधी आयोगाने 2 आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया निश्चित ...

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदीचे आदेश नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

  ठाणे,दि.02(जिमाका) :-     महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषद (वर्ग - अ) व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद (वर्ग - अ) येथील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मद्यविक्री व वितरणावर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. मतदानपूर्व   48   तास आणि मतमोजणी दिवशी  ‘ ड्राय डे ’  लागू राहणार आहे.   असे आदेश   जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. निवडणूक आयोगाने   02   डिसेंबर   2025   रोजी मतदान व   03   डिसेंबर   2025   रोजी मतमोजणी जाहीर केली आहे. त्यानुसार मद्यविक्री केंद्रे ,   दुकानं ,   बार ,   रेस्टॉरं ट्स ,   तसेच परवाना प्राप्त मद्यविक्री ठिकाणे निर्दिष्ट कालावधीत पूर्णपणे बंद राहतील.   दि.   01.12.2025   मतदाना च्या पूर्वसंध्येचा पूर्ण दिवस ,   दि.   02.12.2025   मतदानाचा दिवस ,   दि.   03.12.2025   मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री पुर्णपणे बंदराहील. ...

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कालवा पाण्याचे नियोजन जाहीर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

    ठाणे,दि.02(जिमाका) :-     ठाणे पाटबंधारे मंडळाअंतर्गत भातसा धरण व्यवस्थापन विभाग ,   भातसानगर यांनी रब्बी व उन्हाळी हंगाम  2025-26  साठी कालवा पाटीचे ( Rotation)   पाण्याचे सविस्तर वेळापत्रक ,   अटी-शर्ती व नियमांची अधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे शहापूर ,   भिवंडी ,   वाडा ,   मोखाडा ,   जव्हार ,   पालघर परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना येत्या हंगामात सिंचनासाठी कोणत्या दिवशी पाणी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती भातसा धरण व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. सूचनेनुसार लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी खालील महत्त्वाच्या बाबींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे  –   मंजूर उपसा सिंचन योजनेनुसारच (कालवा/नदी/नाले) पाणी वापरावे. मंजूर क्षेत्रास कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यामध्ये तनी मीटरचे अंतर असले पाहिजे. अनधिकृत उपसा आढळल्यास तात्काळ पाणी बंद केले जाईल. •   लाभक्षेत्रातील कालव्यापासून  35 मीटर पर्यंतच्या विहीरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी उदा. ऊस ,...

ठाणे जिल्ह्यातील अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल खून प्रकरणामधील पिडीतांच्या वारसांना गट-क व गट ड संवर्गातील पदावर शासकीय / निशासकीय नोकरी

  ठाणे,दि.02(जिमाका) :-    शासन निर्णय क्र. युटीए-2021/व्र.क्र. 214/सामासु, दि.20.11.2025. शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 (सुधारित अधिनियम, 2015) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क व गट ड संवर्गातील पदावर शासकीय / निशासकीय नोकरी देण्याबाबतची सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीने छाननी अंती केलेल्या शिफारशीनुसार या विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे विचारात घेऊन आणि या दोन्ही विभागामध्ये समन्वय साधून नियुक्तीस मंजूरी देण्याचे अधिकार मा. आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने दिवंगत व्यक्तीच्या कुटूंबातील एका पात्र वारसास शासकीय / निमशासकीय नोकरी द्यावयाच्या प्रलंबित प्रकरणात नोकरी देण्याबाबतची कार्यवाही दि.26 जानेवारी 2026 पूर्वी संबंधित जिल्ह...

कुळगाव बदलापूर नक्शा प्रकल्प

  ठाणे,दि.02(जिमाका) :-   केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत NAKSHA हा पथदर्शी प्रकल्प राबिवला जात आहे. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नगरपरिषद हद्दीतील मौजे- 1) एरंजाड, 2) सोनिवली, 3) कुळगाव, 4) बदलापूर,  5) जोवेली, 6) वालिवली, 7) कात्रप, 8) शिरगाव, 9) मांजर्ली, 10) खरवई, 11) माणकिवली, 12) बेलवली या 12 गावांची निवड करण्यात आली आहे. या नक्शा प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 12 गावामधील नगर भूमापन अभिलेख तयार करण्याकरिता चौकशी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यानुसार मिळकतीची चौकशी करणे, नवीन मिळकत पत्रिका बनविणे, मिळकतीला नवीन नगर भूमापन क्रमांक देणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांना मालकी हक्क पुरावा प्राप्त होणार असून मालमत्तेबाबत पारदर्शकता निर्माण होऊन मिळकतीचे नकाशान्वये सीमा निश्चित होऊन भविष्यातील वाद निर्माण होणार नाही. नागरी हक्काचे संरक्षण होऊन नागरिकांना कर्ज सुविधा मिळणे सुलभ होणार आहे. या योजनेची सुरुवात 5 डिसेबर 2025 रोजी मौजे-जोवेली तालुका-अंबरनाथ जिल्ह...

प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सतर्कतेमुळे मुरबाड मध्ये दोन बालविवाह थांबवण्यात यश

    ठाणे,दि.01(जिमाका) :-  दि .23 नोव्हेंबर 2025  रोजी सकाळी  11.30  दरम्यान कंट्रोल चाईल्ड हेल्पलाईन ( 1098 ) पुणे येथून  16   वर्षाच्या दोन मु लीं चा  बाल विवाह  24 नोव्हेंबर 2025   होणार असल्या च्या   संदर्भात अशी माहिती मिळाली .   त्यांचे लग्न उद्या असून आज सायंकाळी 7 वाजता हळद आहे. त्याप्रमाणे त्यांची सविस्तर माहिती मिळ वि ण्यात आली.  याबाबत जिल्हा महिला बाल  विकास अधिकारी ,  जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना माहिती तातडीने  देण्यात आली असता त्यांनी या संदर्भात संरक्षण अधिकारी आणि सामाजिक संस्था यांची मदत घेण्यास सांगितल्या प्रमाणे त्यांना  कळ वि ण्यात आले. त्याप्रमाणे आपण याबाबत सर्वांना कळ वू न मुरबाड पोलीस स्टेशन या ठिकाणी लेखी माहिती  देऊन त्यांच्या मदतीने दिलेल्या ठिकाणी चाइल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयक ,  स्थानिक पोलीस विभाग, पोलीस पाटील ,  महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि  सेवा संस्था यांनी तात्काळ कार्यवाही करण्यास पोहोचलो असता त्या   ठिकाणी बालिका घरी नव्हत्य...