Posts

Showing posts from June, 2021

सन 2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणेकांमी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  ठाणे   दि .14 ( जिमाका ) :- सन 2020-21 या वर्षात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळ ण्यासाठी प्रस्ताव सादर करा वे . शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय, ठाणेकडे               दि. 15 जून 2021 ते दि. 19 जून 2021 कार्यालयीन वेळेत (स.11 ते दु. 4) प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावे.               माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (ई.10 वी) परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ. 8वी किंवा              9 वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.               उच्च माध्यमिक शालांत प्रताणपत्र परिक्षा (इ. 12 वी) मध्ये प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत ई. 11 वी मध्ये क्रीडा स्पर्...

अनाथ बालकांसाठी 5 लाखाची मदत जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही

Image
  आर्थिक आधारा सोबत बालकांना भावनिक आधार गरजेचा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ठाणे   दि. 14 ( जिमाका) :- ज्या बालकांचे पालक कोरोना काळात मयत झाले अशा बालकांना सर्व प्रकारचे सहाय्य शासन करणार असून अशा बालकांना 5 लाखाची मदत शासन देणार असल्याचे .   महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर   यांनी सांगितले महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील अनाथ   बालकांशी   मायेचा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधला त्यानंतर श्रीमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले प्रत्येक बालकांना पुनर्रस्थापित करण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून   बालकांना सहकार्य करण्यात येत आहे. बालकांचे शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता येईल यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. अनाथ बालकांचे सर्वेक्षण चालु आहे. एकही बालक वंचित राहणार नाही. ज्या बालकांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र हरपले आहे अशा बालकांना आधार देण्याची आवश्यकता असून . बालकांच्या विकास...

कोरोनामुळे ज्या बालकांच्या पालकांचे निधन झाले , अशा बालकांना बाल संगोपन बालगृह योजनेचा लाभ

  ठाणे दि.10( जिमाका) : कोवीड -१९ या रोगाच्या अभुतपूर्व परिस्थिती मध्ये बालकांची काळजी व संरक्षण संबंधीत कार्यतर संस्थांमधील बालकांची सुयोग्य काळजी तसेच कोवीड - १९ च्या रोगामुळे ज्या बालकांचे आई - वडीलांचे निधन झाले आहे त्यांचे पुनर्वसन करणेस्तव ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्हयातील कोवीड -१९ च्या रोगामुळे ज्या बालकांचे आई - वडीलांचे निधन झाले आहे अशा बालकांचे बाल संगोपन (दरमहा रुपये १,१००/-), बालगृह योजनेचा लाभ तसेच दत्तक बालक या योजनेचा लाभ घेऊ इच्छीत असाल तर आपण चाईल्ड लाईन संपर्क क्र. १०९८ (२४x७), अध्यक्ष / सदस्य, बाल कल्याण समिती, ठाणे - ८७६६४४६५२०, जिल्हा बाल संरक्षण कक्ष -७७०९३५८७७० व राज्यस्तरीय संपर्क क्र. ८३०८९९२२२ / ७४०००१५५१८(सकाळी ८.०० ते रात्री ८.००) वर संपर्क करावा. दानशुर व्यक्ती काही कालावधीसाठी बालकांचे पालकत्व (foster Care) घेऊ इच्छीत असाल तर आपण सुध्दा वरील क्रमांवर संपर्क करु शकता. अन्य कोणालाही संपर्क करु नका ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते असे   आवाहन   ठाणे जिल्हा महिला व बाल व...

5 जुलै रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

    ठाणे दि.09 (जिमाका): सोमवार दि. 5 जुलै 202 1 रोजी दुपारी 1 वाजता समिती सभागृह पहिला मजला,नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. कोविड-१९ या साथरोगाच्या आपत्तीमुळे सदर रोगाचा संसर्ग न होण्याच्या दृष्टीकोनातून जनहितार्थ Social Distancing चे पालन करणेबाबत सूचना दिल्याने लोकशाही दिनाचे आयोजन करणेंत आले नाही. तथापि लॉकडाऊन टप्प्याटप्याने शिथिल करण्यात आलेने शासनाने सदर परिपत्रकाद्वारे लोकशाही दिन आयोजित करणेबाबत खालील सूचना निर्गमित केल्या आहेत. लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी परिषदेद्वारे (Video Conferencing) अथवा अर्जदारांच्या संमतीने Google Meet, Zoom App इ. अॅपचा वापर करुन करणेंत येईल. तसेच ज्या ठिकाणी कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलाविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच अर्जदारांना छोटया संख्येच्या गटात समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करणेबाबत सूचना निर्गमित ...

ठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरणे या ठिकाणी मनाई आदेश जारी

ठाणे दि.08( जिमाका): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव   ठाणे जिल्हयात असल्याने   सार्वजनिक व खाजगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादींमुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेच्या   आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने   तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब,तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे. ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात. अशा ठिकाणी   सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी   होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ...

पारंपारीक शिवकालीन तुतारीच्या निनादात शिवस्वराज्य दिन साजरा

Image
  जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यात आला*. जिल्हा परिषद मुख्यालयासह , पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिनी उत्साह ठाणे दि.६:   ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पारंपारीक शिवकालीन तुतारीच्या निनादात, उत्साही, भारावलेल्या, मंगलमय वातावरणात, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत 'शिवस्वराज्य'दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यात आला.   यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र) अजिंक्य पवार तसेच   विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.     राज्य शासनाच्या निर्देशा...

खत बचतीची विशेष मोहिम

ठाणे दि.2 (जिमाका): कृषि विज्ञान केंद्र बारामती व   महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळवण्यासाठी खत   बचतीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी आपल्या अँड्रॉईड मोबाईल फोन मधील गूगल प्ले-स्टोअर मध्ये ' Krushik/ कृषिक ' सर्च करुन अथवा खालील QR कोड स्कॅन करुन   प्रथम ' कृषिक ' ॲप डाऊनलोड करा.                         रासायनिक खतांचा कमीत-कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकांसाठी अचूक व फायदेशीर खत मात्रा निवडणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन जमिनीची सुपिकता वाढीस लागून अधिक उत्पन्न आपल्या हाती येईल.     ...