अतिसारावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ जूनपासून 'स्टॉप डायरीया कॅम्पेन' ५ वर्षांखालील बालकांच्या आरोग्यासाठी व्यापक मोहीम
ठाणे दि.15(जिमाका) :- पाच वर्षांखालील बालकांमधील अतिसारामुळे होणारे आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे रोखण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यात 'स्टॉप डायरीया कॅम्पेन २०२६ ' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या मोहिमेची पूर्वतयारी १ जून २०२६ पासूनच जिल्हाभरात सुरू झाली असून, या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १६ जून ते ३१ जुलै २०२६ या दीड महिन्याच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे केली जाणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत बालकांमध्ये अतिसाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. हे अभियान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली राबवले जात आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या थेट समन्वय, निय...