Posts

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे निर्देश

      ठाणे,दि.23(जिमाका) :- राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले   आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये, •         पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा. •         शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाण...

1962 हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ 'गोल्डन अवर' मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान

  ठाणे,दि.23(जिमाका) :- पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि 1962 मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. '1962 कॉल सेंटर' आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणजे, यापैकी ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील पशुपालकांसाठी ही सेवा 'लाईफलाईन' ठरली असून, तब्बल ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. हे केवळ आकडे नसून, पशुसंवर्धन क्षेत्रातील समर्पित पशुवैद्यकीय सेवेचे निदर्शक...

महिला सक्षमीकरण तंत्रज्ञानाची साथ आणि जिद्दीची भरारी कृषी अभियंता वैशाली भापसे यांनी फुंकले कल्याणच्या शेतीत परिवर्तनाचे वारे

Image
    केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे काम कल्याण तालुक्यात पाहायला मिळत आहे. या मोहिमेचा एक तेजस्वी चेहरा म्हणजे श्रीम. वैशाली आसराजी भापसे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा असा काही संगम साधला आहे की, आज कल्याण तालुक्यातील शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यवसायाकडे झुकू लागली आहे. ​             वैशाली भापसे यांची पार्श्वभूमीच मुळी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची आहे. बी.टेक आणि एम.टेक (कृषी अभियांत्रिकी) सारख्या पदव्या संपादन केल्यावर, केवळ नोकरी न शोधता, आपल्या ज्ञानाचा उपयोग मातीशी नातं सांगणाऱ्या बळीराजासाठी करण्याचा त्यांनी निर्धार केला. लहानपणापासूनच शेतीशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाण होती. याच जाणीवेतून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला आणि आज त्या कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्...

महिला सक्षमीकरण ​जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्वाचे दुसरे नाव सौ. भूमिका शिर्के यांचा 'शून्य ते विश्व' प्रवास

Image
  ​ माणसाकडे जर काही करून दाखवण्याची जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यशाचे नंदनवन फुलवता येते, हे शहापूर तालुक्यातील नारायणगावच्या सौ. भूमिका भरत शिर्के यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भूमिकाताईंचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून तो ग्रामीण भागातील हजारो महिलांना दिशा देणारा एक दीपस्तंभ ठरला आहे. वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून 'कमवा आणि शिका' या सूत्राचा अवलंब करत कष्ट उपसले आणि आपले बीएपर्यंतचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी त्यांच्यातील शिक्षणाची ओढ ओळखून त्यांना पाठबळ दिले, ज्यामुळे त्यांनी डी.एड.चे शिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केले. काही काळ शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली असली तरी, नियतीने त्यांच्यासाठी अधिक व्यापक समाजकार्याची दारे उघडी ठेवली होती. ​             महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (MSRLM) क्षेत्र समन्वयक पदासाठी झालेल्या नि...

महिला सक्षमीकरण ध्येयवेड्या नेतृत्वाचा प्रशासकीय 'मास्टरस्ट्रोक' श्रीमती विजू सिरसाठ यांचा प्रेरक प्रवास

Image
    ​            प्रशासकीय सेवेमध्ये केवळ पदाचा वापर करून काम करणे आणि त्याच पदाला आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी उंची मिळवून देणे, यात खूप मोठा फरक असतो. हाच फरक कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू अनुगा मुरलीधर सिरसाठ यांनी आपल्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सिद्ध करून दाखवला आहे. उद्योग संचालनालयाच्या इतिहासात कोकण विभागाच्या पहिल्या महिला उद्योग सहसंचालक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या विजू सिरसाठ यांनी आपल्या संवेदनशील, पारदर्शक आणि कार्यक्षम कार्यशैलीने महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर कोकणचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.  ​            त्यांचे नेतृत्व केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून, ते जमिनीवरील बदलांचे प्रतीक ठरले आहे. त्यांच्या 'व्हिजनरी' मार्गदर्शनाखाली कोकण विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १.३९ लाख कोटी रुपयांची विक्रमी निर्यात साध्य केली असून महाराष्ट्राच्या एकूण निर्यातीत एकट्या कोकणचा वाटा सुमारे २५ टक्के इतका मोठा आहे. विशेषतः रत्नागिरीच्या...

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी तात्काळ अर्ज करा

      ठाणे,दि.21(जिमाका) :-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत   राज्यातील क्रीडा विकासाकरिता “ मिशन लक्ष्यवेध ” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमा अंतर्गत खेळ व खेळाडू, क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करीयर मार्गदर्शन खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहभाग हे सर्व घटक विकसित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा स्तरावर टेबल टेनिस, शूटिंग व वेटलिफ्टींग ही क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यात येणार असून गुणवंत खेळाडूंना उच्चस्तरीय प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.             त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामध्ये खेळनिहाय प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड चाचणी प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तर निवड चाचणी निकष :-      ...

डेअरी आणि चीज ॲनालॉगच्या वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

    ठाणे,दि.21(जिमाका):- अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या ध्येयधोरणानुसार सर्वसामान्य जनतेला सकस आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात जगात अग्रेसर असून भारतीय आहारामध्ये पनीरला विशेष महत्त्व आहे. चविष्ट असण्यासोबतच पनीर हे प्रथिने, कॅल्शियम आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असल्याने शाकाहारी लोकांसाठी ते पोषणाचा एक उत्तम स्रोत मानले जाते. मात्र, अलीकडे बाजारपेठेत 'पनीर' आणि 'चीज' यांच्या नावाखाली ' ॲनालॉग' पदार्थांचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. मुळात पनीर हा केवळ दुधापासून बनवलेला पदार्थ असतो, तर दुसरीकडे 'डेअरी ॲनालॉग' हे दूध सोडून इतर खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून बनवले जाते, जे केवळ पनीरसारखे दिसते पण प्रत्यक्षात पनीर नसते.         अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि फास्ट फूड विक्रेते अन्न तयार करताना मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करतात, परंतु ग्राहकांना त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. यामुळे ग्राहकांची फस...