Posts

महिला सक्षमीकरण जिद्द आणि शासकीय पाठबळाच्या जोरावर ठाण्याच्या तेजस्विनी कुलकर्णी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!

Image
                        आजच्या स्पर्धात्मक युगात महिला केवळ घरची जबाबदारी सांभाळून थांबल्या नाहीत, तर उद्योजकतेच्या क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. ठाण्यातील सौ. तेजस्विनी सचिन कुलकर्णी यांनी 'अर्काया ऑप्टिक्स' (Arkay Optics) या आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताची ओळख निर्माण करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांच्या या यशामागे जिद्द आणि राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा' (CMEGP) मोलाचा वाटा आहे. सौ. तेजस्विनी यांनी लेझर सर्जिकल फायबर उत्पादनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरवले, मात्र कोणत्याही उद्योगासाठी भांडवल आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा वेळी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे त्यांच्या मदतीला धावून आले. केंद्राने आयोजित केलेल्या 10 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेतून त्यांना व्यवसायाचे बारकावे आणि शासकीय योजनांची सखोल माहिती मिळाली. पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक असलेल्या अर्ज प्रक्रियेमुळे त्यांना पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाख रुपयांचे कर्ज विनाविलंब मंजूर झाले. वि...

महिला सक्षमीकरण ठाणे जिल्ह्याची सुरक्षा कवच डॉ. अनिता जवंजाळ यांची आपत्ती व्यवस्थापनातील धडाकेबाज यशोगाथा

Image
                           केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सध्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेचा जागर सुरू असताना, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तृत्वाने प्रशासकीय सेवेचा ठसा उमटवणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ-भोईर यांची कामगिरी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे. डिसेंबर २०१८ पासून या आव्हानात्मक पदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. जवंजाळ यांनी केवळ नैसर्गिक आपत्तीच नव्हे, तर मानवनिर्मित संकटांच्या काळातही अत्यंत धैर्याने आणि संवेदनशीलतेने काम केले आहे.   त्यांच्या या ७-८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कोविड-१९ च्या तिन्ही लाटांमध्ये अहोरात्र सेवा बजावून प्रशासनाचा कणा म्हणून काम केले. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली असताना प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असो किंवा भीषण चक्रीवादळाने निर्माण केलेली संकटे असोत, डॉ. जवंजाळ यांनी घटनास्थळी राहून बचाव आणि मदत कार्याचे चोख नियोजन केले. त्यांचे कार्य केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर युक्रेन, इराण आणि इस्राईलमधील य...

महिला सक्षमीकरण अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत सौ. आर्या जोशी यांनी प्रज्वलित केली महिला सक्षमीकरणाची ज्योत

Image
       केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सध्या महिला सक्षमीकरणाची मोहीम राज्यभर मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. महिला केवळ चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न राहता, त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रांत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. याच मोहिमेला बळ देणारे एक प्रेरणादायी नाव म्हणजे सौ. आर्या जोशी. 'ब्रम्हतेज' संस्थेच्या संस्थापक आणि संचालक असलेल्या सौ. आर्या जोशी यांनी अध्यात्म, ज्योतिष आणि वैदिक विधी यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांत आपल्या कार्याचा असा काही ठसा उमटवला आहे की, आज हजारो लोकांसाठी त्या एक दीपस्तंभ ठरल्या आहेत. सौ. आर्या जोशी यांचे कार्य केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या कार्याला एक भक्कम वैचारिक आणि वैज्ञानिक जोड आहे. मुळात वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण आणि दांडगा अनुभव गाठीशी असल्याने, त्या कोणत्याही समस्येकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील शास्त्र आणि तर्क शुद्धपणे मांडतात. अध्यात्म आणि विज्ञान यांचा हा अपूर्व संगम त्यांच्या मार्गदर्शनातून दिसून येतो. आजच्या धावप...

महिला सक्षमीकरण: जिद्दीच्या जोरावर 'ती'ने घडविले प्रगतीचे लेणे; शहापूरच्या सौ. प्रतिक्षा बेहरे यांचा प्रेरणादायी प्रवास

Image
        "इच्छा तिथे मार्ग" या उक्तीचा प्रत्यय शाहापूर तालुक्यातील काणवे (खर्डी) येथील एका जिद्दी गृहिणीने करून दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला खऱ्या अर्थाने बळ देत, सौ. प्रतिक्षा प्रकाश बेहरे यांनी आपल्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा 'कॉस्ट्यूम ज्वेलरी'चा व्यवसाय उभा केला असून, आज त्या ग्रामीण भागातील महिलांसाठी एक आदर्श बनल्या आहेत. प्रतिक्षा बेहरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सामान्यच. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शेती व्यवसायात गुंतल्या होत्या. मात्र, मनात काहीतरी स्वतःचे करण्याची आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची तीव्र ओढ होती. अशातच त्यांना शासनाच्या बचत गट (Self Help Group) आणि ईएपी (Employee Assistant Programme) कार्यक्रमाच्या माध्यमातून 'महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे'बद्दल (Rural Self Employment Training Institute) माहिती मिळाली. हीच माहिती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी ठाणे येथील महाबँक प्रशिक्षण संस्थेत 'जनरल ई...

ठाणे जिल्ह्यात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

Image
ठाणे,दि.14(जिमाका): शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्...

ठाण्यात 15 एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी 'विभागीय कार्यशाळेचे' आयोजन

  ठाणे,दि.14(जिमाका) : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी ठाण्यात एका विशेष विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.             डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यं त समाज कल्याण विभाग, मुंबई व ठाणे आणि विभागीय तृतीयपंथी मंडळ, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून तक्रार निवारण: तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करणे, कायदेशीर मार्गदर्शन: त्यांना त्या...

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
    ठाणे,दि.14(जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.                        यावेळी   जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,   तहसिलदार सचिन चौधर, नायब तहसिलदार मधुकर जाधव आदी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             त्याचबरोबर टाऊन हॉल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने जरूर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी याप्रसंगी केले. 0000000