Posts

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

ठाणे , दि. 02( जिमाका):- बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. 56/2026, दि. 25 फेब्रुवारी 2026, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, कलम 12, 8. तसेच भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 74, 75, 79 नुसार नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयातील आरोपी वाहनचालक इसम नामे जयेश काळूराम मुने हा असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन मोटार बस क्र. MH-05AZ-0754 हे बस संवर्गातील वाहन आहे. या अत्याचाराची घटना नमूद वाहनांमध्ये झाल्याची नोंद एफ.आय.आर. मध्ये करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील जप्त वाहनास मोटार वाहन नियमाप्रमाणे रु. 19 हजार 500/- दंडात्मक कारवाई करून वाहनाची नोंदणी निलंबन करण्याकरिता वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी वाहनचालक यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे. माहे एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 730 वाहनांवर स्कुलबस नियमाप्रमाणे कारवाई करून रु. 11 लाख 32 हजार 250/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पाल...

इराण-इस्रायल मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Image
जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ ठाणे , दि. 2 ( जिमाका): इराण-इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे . ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी ( SEOC) संपर्क साधण्यात आलेला असून , कोणत्याही नागरिकाकडून इराण-इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश...

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन नवी मुंबई , दि.१: ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती पुढील पिढीपर्यंत पोहचली जावी. यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे. तसेच नवी मुंबई परिसरात त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात येईल , अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की , शिख समाजाचे न...

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Image
नवी मुंबई , दि.०१: “हिंद दी चादर” म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हे , तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहील , असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार , अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले , शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी , मुखी , दमदमी टकसाल , प्रधान संत समाज , बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज , राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक , राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश

Image
गुरु तेग बहादूरांच्या शौर्याची परंपरा नवी पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी   खारघर , दि.०१– महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे , असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितद्वारे दाखविण्यात आला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले की , गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन...

"हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन

Image
सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून   ' बोले सो निहाल ' च्या जयघोषाने दुमदुमले खारघर        नवी मुंबई , दि. 27( विमाका): ' हिंद-दी-चादर ' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ' बोले सो निहाल... सत श्री अकाल ' चा गगनभेदी जयघोष आणि या सोहळ्यात संत , भाविक , लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य ' नगर कीर्तन ' सोहळा पार पडला.       या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. 27) सायंकाळी 5.00 वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा , सीबीडी बेलापूर येथून प्रारंभ झाला. यानंतर डी.वाय.पाटील चौक बेलापूर , आरबीआय कॉलनी चौक , बेलपाडा मेट्रो , खारघर रेल्वे स्टेशन चौक , उत्सव चौक , ग्राम विकास चौक , गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा , खारघर येथून समागम स्थळ ओवे खारघर येथे या नगर किर्तनाचा समारोप करण्यात आला. हे किर्तन केवळ एक शोभा यात्रा नाही तर गुरुसाहे...