Posts

ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार व आढावा समिती बैठक संपन्न

Image
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ठाणे , दि. 17( जिमाका):- ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार समिती ( DCC) व जिल्हास्तरीय आढावा समिती ( DLRC) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वार्षिक कर्ज योजना ( ACP) २०२५-२०२६ अंतर्गत बँकांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने स्वयं सहाय्यता गट ( SHG) कर्ज , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( CMEGP), प्रधानमंत्री विश्वकर्मा , प्रधानमंत्री स्वनिधी , प्रधानमंत्री मुद्रा योजना तसेच राज्य शासनाच्या विविध विकास महामंडळांच्या योजनांचा समावेश होता. बँकांनी कर्ज मंजूर करून शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा , असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. मात्र , खासगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी शासकीय योजनांच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली...

विशेष लेख: "मिशन शितल कवच" : वाढत्या उष्मालाटेचा मुकाबला करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

Image
राज्यात दरवर्षी उन्हाचा पारा वाढत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे केवळ अस्वस्थता येत नाही , तर ती जीवघेणीही ठरू शकते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता , प्रशासकीय विभाग , महानगरपालिका , आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एकत्रितपणे राबवायच्या उपाययोजनांचा हा ' ॲक्शन प्लॅन '. १. नागरी सुविधा : सावली आणि पाणी हाच आधार महानगरपालिका आणि नगरपालिकांनी सार्वजनिक ठिकाणी (बस स्टँड , बाजार , रिक्षा स्टँड) तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी. ' वॉटर एटीएम ' किंवा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. शॉपिंग मॉल्सनी केवळ ग्राहकांसाठीच नव्हे , तर सर्वसामान्यांसाठीही थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील उद्याने खुली ठेवून नागरिकांना विसावा घेण्याची संधी द्यावी. २. आरोग्य यंत्रणा : ' गोल्डन अवर ' मध्ये उपचार * स्वतंत्र वॉर्ड: प्रत्येक रुग्णालयात उष्माघाताच्या ( Heat Stroke) रुग्णांसाठी वातानुकूलित किंवा थंड वॉर्ड असावेत. * जलद प्रतिसाद टीम ( RRT): उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार करण्यासाठी विशे...

शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Image
‘Give To Gain’ संकल्पनेतून महिला आधार केंद्रांना बळ देण्याचा निर्धार ठाणे , दि. 17( जिमाका):- स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत , शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ठाणे जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी पाटील उपस्थित होत्या. संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. आर. महाजन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर संस्थेचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. संजय मोतलिंग , महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा श्रीमती बी. जे. चौधरी आणि संस्थेच्या प्रबंधक श्रीमती संगीता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा रीतसर प्रारंभ झाला. डॉ.संजय मोतलिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून...

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Image
            ठाणे , दि. 16( जिमाका): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य इंधन टंचाईच्या काळात , ठाणे जिल्ह्यातील एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळावे , यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.        या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर किंवा अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. आंतरराष्ट्रीय ऊर्जा चिंतांमुळे केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा ( ESMA) १९६८ लागू केला असून , गॅस वाटपाचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. या पार्श्वभूमीवर "आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला...

ठाण्याचे योगतज्ज्ञ डॉ. कुंभार यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

Image
ठाणे , दि. 16( जिमाका): येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे योग शिक्षक आणि योगतज्ज्ञ डॉ. अजय कुंभार यांना स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि श्रीलंकेतील भारतीय उच्चायोगाकडून विशेष प्रशंसापत्राने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेतील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सन 2020 पासून आयोजित ऑनलाईन योग सत्रांमध्ये डॉ. कुंभार सलगपणे योगदान देत आहेत. त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. डॉ. कुंभार यांनी आतापर्यंत नियमित , संरचित आणि शिस्तबद्ध योग कार्यक्रमांद्वारे योग , आरोग्य , मानसिक संतुलन आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या सेवांमुळे श्रीलंकेत भारतीय संस्कृती आणि योगाची ओळख केवळ मजबूत झाली नाही तर जागतिक स्तरावर भारताचा हा बहुमोल वारसा स्थापित झाला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला मूर्त रूप दिले आहे. डॉ. कुंभार यांनी योग विषयातच पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून , पीएचडीच्या माध्यमातून योगातच त्यांनी संशोधन केले आहे. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातर्फे त्यांचा झालेला सन्मान हा त्यांच्या योगातील योगदाचा गौरव आहे. 0000...

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात ठाणे जिल्हा सलग चौथ्या वेळेस राज्यात प्रथम क्रमांकावर

Image
  ठाणे , दि. 16( जिमाका): दि. 14 मार्च 2026 रोजी झालेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात ठाणे जिल्हा सलग चौथ्या वेळेस राज्यात प्रथम कमांकावर एकूण 83 हजार 424 प्रकरणे निकाली. 1 अब्ज 87 कोटी 50 लाख 93 हजार 326/- एवढ्या रकमेची तडजोड. 30 वर्षे , 20 वर्षे , 10 वर्षे 05 वर्षे अशी वर्षानुवर्षे जुनी प्रलंबित 1 हजार 506 प्रकरणे निकाली. प्रलंबित 28 हजार 833 व दावा दाखलपूर्व 54 हजार 591 अशी एकूण 83 हजार 424 प्रकरणे निकाली त्यामध्ये १ , ८७ , ५० , ९३ , ३२६/-एवढया रकमेची तडजोड. लोकअदालतचे महत्व:- न्यायालयीन वाद कायमस्वरूपी व जलद निकाली काढण्यासाठी लोकअदालत व मध्यस्थी प्रक्रिया हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून वाद कायमस्वरूपी व जलद गतीने मिटला जातो. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 332 प्रकरणे तसेच Debts Recovery Tribunal (DRT) प्राधिकरणाची 100 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने , त्यातील कुटुं‌बियांना व वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळालेली आहे. लोकअदालतमुळे वेळेची व पैशांची बचत होते , व या बाबींचा स...