Posts

कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध योजनांचा आढावा

Image
  ठाणे,दि.12(जिमाका):- शासन व प्रशासन सर्वसामान्यांच्या सर्वांनी विकासासाठी कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातही शहरी व ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या विकासकामांचा तसेच महसूल विभागाच्या नियमित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली.                 जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही बैठक संपन्न झाली.             केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या आढाव्याबरोबरच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी विशेष शासकीय प्रकल्पासाठी लागणारी जमीन आणि भूसंपादन स्थिती, शासकीय जमीन, ग्राम भेटी या विषयांचाही सविस्तर आढावा घेतला. त्याबरोबरच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR), जनगणना व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामकाजाबाबतचाही आढावा त्यांनी घेतला. या कामांमध्ये येत असलेल्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या तसेच या ...

ठाणे जिल्ह्यात 'जनगणना 2027' च्या पहिल्या टप्प्याला वेग स्व-गणनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    ठाणे,दि.12(जिमाका) :- केंद्र शासनाच्या दिनांक 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार देशभरात 'जनगणना २०२७ ' चे महाकाय राष्ट्रीय कार्य दोन टप्प्यांत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक १६ मे २०२६ ते दिनांक १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत 'घर यादी व घरगणना' (House Listing & Housing Census) चे काम सुरू करण्यात आले आहे. हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर, मोहिमेचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच प्रत्यक्ष 'लोकसंख्या गणना' पुढील वर्षी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२७ ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकूण ०९ चार्ज कार्यरत करण्यात आले आहेत. या प्रशासकीय रचनेमध्ये ग्रामीण स्तरावरील तहसीलदार स्तरावर भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड व अंबरनाथ हे ०५ चार्ज समाविष्ट असून शहरी स्तरावर कुळगाव-बदलापूर नगर परिषद, अंबरना...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेशप्रक्रिया सुरु

    ठाणे,दि.12(जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भारतरत्न                                                 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, शहापूर येथे मुलांचे 4 व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतीगृह, कल्याण, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, येथे मुलींची-4 अशी एकूण 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील शालेय, कनिष्ठ/वरीष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसयिक/बिगर व्यावसयिक अभ्यासक्रम जसे की, बी.ए./बी. कॉम./बी.एस.सी. पदवीका/पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदवीका, नर्सिंग इत्यादी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी https://hmas.mahait.org   प्रस्तुत लिंकचा वापर करून अर्...

अमृत संस्थेमार्फत लघु उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन(EDP)

    ठाणे,दि.11(जिमाका) :- अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या लघु उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आभासी आणि प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहे. उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजकांना व्यवसाय क्षेत्रात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम खुल्या प्रवर्गातील इच्छुक युवक-युवती , महिला , स्वयंरोजगार इच्छुक आणि लघुउद्योजकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्यवसाय निवड , उद्योग उभारणी , व्यवसाय व्यवस्थापन , आर्थिक नियोजन , विपणन कौशल्य , ग्राहक सेवा , डिजिटल माध्यमांचा वापर , शासकीय योजना व अनुदानाची माहिती तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत करण्यात येणार आहे. स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होणार असून , उद्योजकतेच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी आवश्यक ज्...

राज्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर पहिल्या टप्प्यात ३७ लाख ५२ हजार गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू

          ठाणे,दि.11(जिमाक) :- राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगासारख्या घातक संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली असून सन २०२६-२७ या वर्षाकरिता गोटपॉक्स लसीकरण मोहीम अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.  आशी माहिती पशुसंवर्धन  सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (पशुधन व नियोजन)  पुणे यांनी दिली आहे.              २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण लस उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच तब्बल ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे' येथे या आवश्यक लसमात्रांचे यशस्वी उत्पादन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील गोधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आह...

राज्यात मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला युद्धपातळीवर प्रारंभ शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन

    ठाणे,दि.11(जिमाका) :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात 'मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम' आता युद्धपातळीवर आणि व्यापक मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दूग्धव्यवसाय सहआयुक्त पुणे यांनी दिली आहे. पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असल्याने, ऐनवेळी येणारे संकट टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी आपल्या गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे आणि जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. पावसाळ्यापूर्वी प्राण्यांमध्ये प्रामुख्याने होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या अत्यंत घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे गरजेचे ...

हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळ, ठाणे राबवीत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  ठाणे,दि.10(जिमाका) :- हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, ठाणे मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्यांकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. मागासवर्गीय समाज घटकांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध योजनांचा लाभराबविण्यात येतात या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक सक्षमीकरण घडविणे आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे. सदर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, इच्छुक लाभार्थ्यांनी या महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahadisha.in   या संकेतस्थळाच्या पोर्टल द्वारे आपले कर्ज मागणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदरचे अर्ज सादरीकरण करताना लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत कोणतेही अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात स्वीकारली जाणार नाहीत. महामंडळामार्फत उपलब्ध योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . 1. ५० % अनुदान योजना : एकूण प्रकल्प खर्च : रु. १५०,०...