Posts

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी तात्काळ अर्ज करा

      ठाणे,दि.21(जिमाका) :-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत   राज्यातील क्रीडा विकासाकरिता “ मिशन लक्ष्यवेध ” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमा अंतर्गत खेळ व खेळाडू, क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करीयर मार्गदर्शन खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहभाग हे सर्व घटक विकसित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा स्तरावर टेबल टेनिस, शूटिंग व वेटलिफ्टींग ही क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यात येणार असून गुणवंत खेळाडूंना उच्चस्तरीय प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.             त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामध्ये खेळनिहाय प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड चाचणी प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तर निवड चाचणी निकष :-      ...

डेअरी आणि चीज ॲनालॉगच्या वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

    ठाणे,दि.21(जिमाका):- अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या ध्येयधोरणानुसार सर्वसामान्य जनतेला सकस आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात जगात अग्रेसर असून भारतीय आहारामध्ये पनीरला विशेष महत्त्व आहे. चविष्ट असण्यासोबतच पनीर हे प्रथिने, कॅल्शियम आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असल्याने शाकाहारी लोकांसाठी ते पोषणाचा एक उत्तम स्रोत मानले जाते. मात्र, अलीकडे बाजारपेठेत 'पनीर' आणि 'चीज' यांच्या नावाखाली ' ॲनालॉग' पदार्थांचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. मुळात पनीर हा केवळ दुधापासून बनवलेला पदार्थ असतो, तर दुसरीकडे 'डेअरी ॲनालॉग' हे दूध सोडून इतर खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून बनवले जाते, जे केवळ पनीरसारखे दिसते पण प्रत्यक्षात पनीर नसते.         अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि फास्ट फूड विक्रेते अन्न तयार करताना मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करतात, परंतु ग्राहकांना त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. यामुळे ग्राहकांची फस...

पाईपलाईन गॅस जोडणीच्या विस्तार करण्यासाठी नवीन पीएनजी जोडणीसाठी अर्ज करावे

    ठाणे दि.21(जिमाका) :   आखाती देशातील युध्दजन्य परिस्थीती विचारात घेऊन दि.27 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पीएनजी जोडणीच्या विस्ताराबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच दि.30 मार्च 2026 रोजीच्या शासनपत्रान्वये व्यावसायीक आस्थापनांना (उदा. हॉटेल, रेस्टॉरंट) यांना व्यावसायीक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यासाठी पीएनजी करीता अर्ज करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार करण्यासाठी जेथे पीएनजी गॅस पाईपलाईन पोहोचलेली आहे व तेथील नागरिकांना/संस्थांना घरगुती/व्यावसायिक वापराकरिता नवीन पीएनजी जोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे, अशा नागरिकांनी/संस्थांनी घरगुती/व्यावसायिक वापराकरिता नवीन पीएनजी जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाकरीता महानगर गॅस लि. तसेच ग्रामीण भागाकरीता गुजरात गॅस लि. या सिजीडी संस्थांकडे अर्ज करावेत. तथापी काही कारणास्तव त्यांना सीजीडी संस्थांकडे अर्ज करणे शक्य नसल्यास महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील नागरीक संस्थांनी शिधावाटप अधिकारी यांच्याकडे तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीक / संस्थांनी संबधित त...

महिला सक्षमीकरण ​कृषी क्षेत्रातील महिला सक्षमीकरणाचे उमटले पाऊल तंत्रज्ञान व्यवस्थापक वैशाली भापसे यांची यशोगाथा

Image
    आजच्या प्रगत युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असताना, कल्याण तालुक्यात कृषी क्षेत्रात एक आश्वासक बदल घडत आहे. हा बदल घडवून आणण्यामागे 'तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक' श्रीम. वैशाली आसराजी भापसे यांची दूरदृष्टी आणि तांत्रिक कौशल्य कारणीभूत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देत, वैशालीजींनी आपल्या कृषी अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षणाचा उपयोग थेट शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केला आहे. बी.टेक आणि एम.टेक (कृषी अभियांत्रिकी) अशा भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांना शेतीतील तांत्रिक आणि वैज्ञानिक पैलूंची सखोल जाण आहे. लहानपणापासून कुटुंबाचा शेतीशी असलेला जवळचा संबंध आणि बळीराजाची आव्हाने प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे, त्यांच्या मनात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि याच प्रेरणेतून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश करून कृषी विकासाचे ध्येय स्वीकारले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून काम करताना वैशाली भापसे यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी पार न पाडता, नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यावर भर दिला आ...

औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन

  ठाणे दि.20(जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , ठाणे आणि लाईट हाऊस कॉम्युनिटीइज फाउंडेशन , ठाणे व औद्दोगिक प्रशिक्षण संस्था , बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 एप्रिल 2026   रोजी औद्दोगिक प्रशिक्षण संस्था , बेलापूर , सेक्टर 29 , अग्रोली गाव , साबीडी , बेलापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यास एकूण 4 उद्योजक आणि 55 उमेदवारांनी उपस्थिती लावली. विविध क्षेत्रांतील उपलब्ध नोकरीच्या संधींचा लाभ घेत उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये एकूण 8 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला ( CMYKPY समन्वयक) आकाश गोरे ,   (कौशल्य समन्वयक) महीदीपसिंग चौहान तसेच (लाईट हाऊस कॉम्युनिटीइज फाउंडेशन , ठाणे) यश पवार व औद्दोगिक प्रशिक्षण संस्था , बेलापूर प्राचार्य सदाशिव पाटील   उपस्थित होते. मान्यवरांनी उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी , कौशल्य विकासाचे महत्त्व आणि करिअर घडवण्यासाठी आवश्यक बाबी याबाबत मार्गदर्शन केले, असे   जिल्हा कौशल्य विकास, रोज...

कल्याण तालुक्यातील म्हारळ येथे 'महाराजस्व अभियान' संपन्न शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

Image
  ठाणे,दि.17(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, दि.17 एप्रिल 2026 रोजी कल्याण तालुक्यातील म्हाराळ मंडळासाठी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान: समाधान शिबिर टप्पा 1' चे आयोजन गोवली येथील जीवनदीप महाविद्यालय परिसरात उत्साहात करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवीत, तालुक्यातील शेकडो ग्रामीण नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यात आला.             या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.             यावेळी बोलताना त्यांनी "प्रशासनाने जनतेच्या दारापर्यंत येऊन त्यांचे प्रश्न सोडविणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे," असे प्रतिपादन केले.             या शिबिरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री.सर्जेराव म्हस्के पाटील यांनी निरीक्षक म्हणून...

राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी नवी मुंबईत 21 एप्रिल रोजी महिला जनसुनावणीचे आयोजन

    ठाणे दि.17(जिमाका) :- महिलांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सरसावला असून, 'राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत नवी मुंबईत एका विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी मंगळवार, दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी १०:०० वाजता सिडको भवन, 7 वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान प्रामुख्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाशी संबंधित प्रलंबित तक्रारींवर कार्यवाही केली जाणार असून, थेट येणाऱ्या तक्रारदारांच्या समस्यांचेही निराकरण करण्यात येईल.   जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जनसुनावणीमध्ये पीडित महिलांना आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात थेट आयोगासमोर मांडता येतील. अनेकदा पोलीस स्तरावर किंवा इतर विभागांमध्ये महिलांच्या तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित राहतात, अशा प्रकरणांना गती मिळावी आणि महिलांना प्रत्यक्ष न्याय मिळावा, हा या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आहे. या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श...