Posts

कल्याण तालुक्यातील म्हारळ येथे 'महाराजस्व अभियान' संपन्न शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

Image
  ठाणे,दि.17(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, दि.17 एप्रिल 2026 रोजी कल्याण तालुक्यातील म्हाराळ मंडळासाठी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान: समाधान शिबिर टप्पा 1' चे आयोजन गोवली येथील जीवनदीप महाविद्यालय परिसरात उत्साहात करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवीत, तालुक्यातील शेकडो ग्रामीण नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यात आला.             या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.             यावेळी बोलताना त्यांनी "प्रशासनाने जनतेच्या दारापर्यंत येऊन त्यांचे प्रश्न सोडविणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे," असे प्रतिपादन केले.             या शिबिरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री.सर्जेराव म्हस्के पाटील यांनी निरीक्षक म्हणून...

राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी नवी मुंबईत 21 एप्रिल रोजी महिला जनसुनावणीचे आयोजन

    ठाणे दि.17(जिमाका) :- महिलांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सरसावला असून, 'राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत नवी मुंबईत एका विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी मंगळवार, दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी १०:०० वाजता सिडको भवन, 7 वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान प्रामुख्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाशी संबंधित प्रलंबित तक्रारींवर कार्यवाही केली जाणार असून, थेट येणाऱ्या तक्रारदारांच्या समस्यांचेही निराकरण करण्यात येईल.   जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जनसुनावणीमध्ये पीडित महिलांना आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात थेट आयोगासमोर मांडता येतील. अनेकदा पोलीस स्तरावर किंवा इतर विभागांमध्ये महिलांच्या तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित राहतात, अशा प्रकरणांना गती मिळावी आणि महिलांना प्रत्यक्ष न्याय मिळावा, हा या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आहे. या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श...

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात 28 एप्रिलपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

    ठाणे दि.17(जिमाका): ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आगामी सण-उत्सव, राजकीय नेत्यांचे दौरे आणि विविध संघटनांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश १७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२.०० वाजल्यापासून ते २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण ठा णे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रासाठी लागू राहतील.  जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आपल्या मागण्यांसाठी मोर्चे, रॅली आणि धरणे आंदोलने केली जात आहेत. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी विरोधी गटांकडून निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात शहापूर कार्यक्षेत्रातील सोनाई-शितलाई देवीचा यात्रोत्सव, वज्रेश्वरी येथील योगिनीदेवीचा यात्रोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पारंपारिक जन्मोत्सव आणि अक्षय तृतीया यांसारखे सण-उत्सव साजरे होणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक ...

पालघर-ठाणे जिल्ह्यातील मत्स्यशेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी खेकडा पालन प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  ठाणे दि.17(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय निमखारे जलजीव संवर्धन संस्था Indian Council of Agricultural Research – Central Institute of Brackishwater Aquaculture (ICAR-CIBA), नवसारी (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर व ठाणे जिल्ह्यातील मत्स्यशेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत (PMMSY) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी "मत्स्य शेततलावात पिंजरा पद्धतीने खेकडा पालन" (Mud Crab Box Culture) हा विशेष प्रात्यक्षिक प्रकल्प राबविला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी दोन्ही जिल्ह्यातील एकूण ५ प्रगतशील मत्स्यशेतकऱ्यांची निवड केली जाणार असून, सर्वात विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या लाभार्थ्यांना या प्रकल्पासाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.   या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांकडे स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा असणे आवश्यक असून त्यांना मत्स्यपालन क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित शेततळ्यावर अखंडित वीजपुरवठा, रस्त्य...

शेतीच्या युरियाचा औद्योगिक कारखान्यांसाठी काळाबाजार कृषी विभागाचा पालघरमध्ये मोठा दणका

      ठाणे दि.17(जिमाका):- बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताचा औद्योगिक वापरासाठी काळाबाजार होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कृषी विभागाने याप्रकरणी कडक पावले उचलली असून टेम्पो मालक आणि चालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खतांची साठेबाजी आणि अवैध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तारापूर एमआयडीसी परिसरात 25 मार्च रोजी पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोला अडवले होते. या टेम्पोची तपासणी केली असता, त्यात औद्योगिक वापरासाठी असल्याचे भासवून भरलेली 50 किलो वजनाची एकूण 226 पोती आढळून आली. मात्र, या मालाबाबत चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तातडीने तपास सुरू करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप बारामते आणि कृषी अधिकारी   संदीप संख्ये यांनी पंचांसमक्ष या खताचे नमुने गोळा केले आणि ते तपासणीसा...

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाहाचे सावट प्रशासनाची करडी नजर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

    ​             ठाणे दि.17(जिमाका) :- अक्षय्य तृतीया या अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक आणि वैयक्तिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. मात्र, याच काळात बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. बालविवाह ही समाजाच्या विकासातील मोठी अडथळा असून या अनिष्ट प्रथेला रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपूर्ण राज्यात कडकपणे लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार बालविवाहाचे आयोजन करणे हा एक गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असून, यात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ​             प्रशासनाने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्तरावर विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली ...

आरआयएमसी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ आता 20 एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार अर्ज ​

  ठाणे, दि.17(जिमाका) :- राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी), डेहराडून येथील प्रवेशासाठी दि. ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेच्या आवेदनपत्र प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत आता वाढ करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना दि.२० एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत.   ​ यापूर्वी आवेदनपत्र स्वीकारण्याची अंतिम दि. १५ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती, मात्र डेहराडून येथील आरआयएमसी कमांडंट यांनी दिलेल्या नवीन सूचनांनुसार या तारखेमध्ये सुधारणा करून ती आता २० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव मुदतीत अर्ज भरता आले नव्हते, त्यांना मोठा दिलासा मिळाला असून अधिक विद्यार्थ्यांना या नामांकित संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.   ​             महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त...