Posts

सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रक्रिया युनिट स्थापना करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    ठाणे,दि.04(जिमाका) :- सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रक्रिया युनिट स्थापना करणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे. कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट (Processing Unit) स्थापन करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था(FPO), क्लस्टर स्तर महासंघ (CLF), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती/संस्था यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. पात्र लाभार्थी घटक :- योजनेंतर्गत पुढील प्रमाणे घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल - शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), क्लस्टर स्तर महासंघ (CLFS), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), वैयक्तिक अर्जदार, कोणत्याही अधिनियमांतर्गत नोंदणीकृत इतर उपक्रम. पात्रता निकष - a) गट लाभार्थी (FPO/Cluster Level Federation (CLFs) Primary A...

सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तुर करीता लाभार्थ्यांचे महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन

    ठाणे,दि.04(जिमाका) :- सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तुर करीता लाभार्थ्यांचे महाडीबीटी वर अर्ज करावेत. लाभार्थी निवड निकष :- 1. प्रमाणित बियाणे वितरण या घटाकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल १ हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. 2. या प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे व शेतकऱ्यांचा Agristack Farmer ID असणे बंधनकारक आहे.            3. शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण संबंधित संस्थेनी करावे. 4. प्रमाणित बियाणे वितरणासाठी 5 वर्षा आतील (अधिसूचनेच्या 3 वर्षांनंतर 5 वर्षे विचारात घेतली जातील) अधिसुचित वाण प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत अनुदानास पात्र ठरतील. 5. तुर प्रमाणित बियाणे वितरणासाठी 5 वर्षा आतील वाण करीता रू.6000/- प्रति क्विंटल व 5 वर्षा वरील परंतु 10 वर्षा आतील वाण करीता रु.3000/-प्रति क्...

जिद्द, संघर्ष आणि यशाचा महामेरू रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी लीलाताई वानखेडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Image
    ​             वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अचानक कोसळलेला दुःखाचा डोंगर, पदरी दीड आणि तीन वर्षांची दोन लहान मुले आणि हातात केवळ इयत्ता सातवी पास असणारे शैक्षणिक प्रमाणपत्र; अशा अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरू झालेला भुसावळ येथील लीला दिनकर वानखेडे यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरला आहे. रेल्वेच्या डी.आर.एम. (DRM) ऑफिसमधून ऑफिस सुपरिटेंडेंट (OS) म्हणून सेवानिवृत्त झालेल्या लीलाताईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीची साक्ष देते. ​             १९७९ मध्ये पतीच्या निधनानंतर लीलाताईंवर दोन्ही मुलांच्या संगोपनाची आणि एकेरी पालकत्वाची मोठी जबाबदारी आली. शिक्षण कमी असल्यामुळे सुरुवातीला पावलोपावली अडचणी आल्या. परंतु, पराभवाचा विचार न करता त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. १८ ऑक्टोबर १९८० रोजी त्यांना अनुकंपा तत्त्वावर रेल्वेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ...

जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे अंतर्गत आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर 2026

                   ठाणे,दि.3(जिमाका) : ठाणे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात होत असलेली उल्लेखनीय कामगिरी ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग   व्हावा, विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.10 ते 20 जून 2026 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये जिम्नॅस्टीक्स्, हॅन्डबॉल, खो-खो, पॉवरलिफ्टींग, रग्बी या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी हॅन्डबॉल, पॉवरलिफ्टींग, रग्बी या खेळांचे प्रशिक्षण बी.के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण ठाणे येथे तसेच जिम्नॅस्टीक्स् आणि वेटलिफ्टींग या खेळांचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल, ठाणे कोपरी, ठाणे, तसेच खो खो या खेळाचे प्रशिक्षण शिबीर शाळा क्रं.76, घणसोली, जि. ठाणे   येथे होणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यात "माझं गाव - आरोग्य संपन्न गाव" अभियानाला गती सर्व 427 ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग, आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन

Image
  ठाणे दि.03 (जिमाका) :-   राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी "माझं गाव - आरोग्य संपन्न गाव" अभियानाला   ठाणे जिल्ह्यात अत्यंत उत्साही आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या थेट अधिपत्याखाली जिल्हाभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. ग्रामस्तरावरील जनसहभागातून गावागावांमध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या व्यापक प्रयत्न करण्यात येत असून, विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२७ ग्रामपंचायतींनी या अभियानासाठी आपली नोंदणी पूर्ण केली असून ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांचा याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. अभियानाच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून, आजअखेर तालुका स्तरावर ५ मोठे मेळावे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३३ मेळावे तस...

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा

    ​             ठाणे,दि. ०३ (जिमाका) :- उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने अत्यंत तत्परता दाखवत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.             ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.                 जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ३९ गावे आणि १२७ पाड्यांची (एकूण १६६ लोकवस्त्या) तहान भागवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ४० पाण्याच्या टँकरद्वारे अविरत पुरवठा सुरू केला असून, याद्वारे सुमारे ५८ हजार ४४३ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.               ​ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तीन तालुक्यांम...

राज्यात पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण; १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना दारातच मिळणार आरोग्य सेवा

  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र राज्यातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना तात्काळ व गतिमान पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.      पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ' १९६२ ' ही टोल-फ्री हेल्पलाइन सेवा यशस्वीपणे राबवली जात आहे. या हेल्पलाइनच्या अंतर्गत सुरू असलेल्या 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या दारातच मोफत आरोग्य सेवा पुरवली जात आहे.             या योजनेचा फायदा घेत आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर वेळेवर, सुलभ आणि विश्वसनीय उपचार करण्यात आले आहेत.             या उपक्रमाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर, पशुवैद्यकीय सेवा आणखी जलद आणि आधुनिक करण्यासाठी प्रशासनाने आता 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू केली आहे.  ...