Posts

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चे 28 जून 2026 रोजी आयोजन

  ठाणे,दि.19(जिमाका) :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चे आयोजन दि.28 जून 2026 रोजी करण्यात आलेले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील 37 जिल्हास्तरावर जिल्ला मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 1729 केंद्र निश्चित केले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता, परीक्षा (MAHATET) 2026 परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरु असून परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती व सूचना देण्यात येत आहे. परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची उमेदवारांची सांखिकिय माहिती पुढील प्रमाणे - पेपर - पेपर 1,   प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या - 258061, वर्गखोली संख्या - 10946. पेपर - पेपर 2,   प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या - 342064, वर्गखोली संख्या - 14568. एकूण - प्रविष्ठ परिक्षार्थीची संख्या - 600125. सदर परीक्षा पेपर 1 साठी 701 केंद्र तर पेपर 2 साठी 1028 केंद्रावर वर्गखोली, प्रवेश, लॉबी, केंद्र संचालक कक्ष असे एकूण 18717 CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा पारदर्शक व निकोप वातावरणात पार पाडावी व कोणताही गैरप्रका...

राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी सूचना व अभिप्राय पाठविण्याचे आवाहन

  ठाणे,दि.19(जिमाका) :- महाराष्ट्र शासन राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र "एकल महिला धोरण" तयार करीत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक व्हावे यासाठी राज्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. एकल महिलांच्या समस्या केवळ मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत, तसेच आवश्यक असल्यास कोणत्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात याबाबत सविस्तर सूचना पाठवाव्यात. सूचना पाठविताना केवळ त्रोटक स्वरूपातील मते न पाठविता, संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव पाठवावेत. समाजातील एकल महिला तसेच सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग या धोरण निर्मिती प्रक्रियेत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सूचना ...

आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर अंबरनाथ तहसिलदारांची जमिनीवर बसून 3 तास सकारात्मक चर्चा

Image
                                                                   ठाणे,दि.19(जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली,आदिवासी कुटुंबांच्या मूलभूत हक्कांच्या प्रलंबित प्रश्नांमधे गती आणण्यासाठी गुरुवारी अंबरनाथ तहसिलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत जमिनीवर, चटईवर बसून थेट आणि जिव्हाळापूर्ण संवाद साधला.             सुमारे तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासींच्या पाणी, दाखले, रेशन आणि शासकीय योजनांच्या प्रश्नांव...

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Image
    ठाणे,दि.18(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४ मे २०२६ च्या सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची (SIR)' पूर्वतयारी आणि अंमलबजावणी याविषयी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.     या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार प्रदीप कुडाळ आणि विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ, सद्यस्थितीतील मतदार संख्या आणि मतदान केंद्रनिहाय रचनेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मतदारसंघनिहाय सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या (SIR) ऑनलाइन मॅपिंगच्या प्रगतीचा आणि टक्केवारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच मतद...

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ (POSH) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश

    ठाणे,दि.17(जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013(POSH Act. 2013) नुसार अंतर्गत समित्यांच्या (Internal Committee) स्थापनेबाबत विशेष तपासणी मोहीम सुरु असून ठाणे जिल्ह्यातील 10 व 10 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये (केंद्र व राज्य शासन) खाजगी आस्थापना, शाळा, महावि‌द्यालये, रुग्णालये, निमशासकीय कार्यालये, मॉल्स, उ‌द्योग-व्यवसाय, कंपन्या, हॉटेल्स तसेच इतर सर्व खाजगी आस्थापनामध्ये सहकारी व खाजगी बँक, पतसंस्था, क्रीडासंकुल, कारखाने संस्थांमध्ये कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, 2013 अन्वये आवश्यक असलेल्या अंतर्गत समिती (Internal Committee) ची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. ही मोहीम मा. जिल्हाधिकारी ठाणे व जिल्हा अधिकारी POSH ACT ठाणे तथा उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.ठाणे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी ठाणे, ...

दि.20 जून, 2026 रोजी देशभरात साजरा होणार पी.एम.किसान उत्सव दिवस पंतप्रधानांच्या शुभहस्ते दि. 20 जूनला 'पी.एम. किसान'च्या 23 व्या हप्त्याचे वितरण

  ठाणे,दि.17(जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल 202 6 ते जुलै 202 6 कालावधीतील 23 वा हप्ता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि. 20 जून , 202 6 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरीत होणार आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र शासनाने दि. 20 जून, 202 6 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे करण्याचे ठरविले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी , 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती , पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000 /- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000 /- त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 22 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 41083.00 कोटीचा लाभ जमा झालेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किस...

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात १६ ते ३० जून दरम्यान मनाई आदेश लागू कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

    ठाणे दि.16 (जिमाका) :- ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आगामी सण-उत्सव व परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी संपूर्ण ठाणे ग्रामीण भागात दिनांक १६ जून २०२६ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक ३० जून २०२६ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत जमावबंदी व मनाई आदेश लागू केले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये आणि समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मनाई आदेशांमागे जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडी आणि आगामी धार्मिक व शैक्षणिक उपक्रम कारणीभूत आहेत. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चे, रॅली, धरणे आणि उपोषणे यांसारखी आंदोलने केली जात आहेत. त्यातच दिनांक १६ जून २०२६ पासून इयत्ता १० वी व १२ व...