महिला सक्षमीकरण तंत्रज्ञानाची साथ आणि जिद्दीची भरारी कृषी अभियंता वैशाली भापसे यांनी फुंकले कल्याणच्या शेतीत परिवर्तनाचे वारे
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे काम कल्याण तालुक्यात पाहायला मिळत आहे. या मोहिमेचा एक तेजस्वी चेहरा म्हणजे श्रीम. वैशाली आसराजी भापसे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा असा काही संगम साधला आहे की, आज कल्याण तालुक्यातील शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यवसायाकडे झुकू लागली आहे. वैशाली भापसे यांची पार्श्वभूमीच मुळी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची आहे. बी.टेक आणि एम.टेक (कृषी अभियांत्रिकी) सारख्या पदव्या संपादन केल्यावर, केवळ नोकरी न शोधता, आपल्या ज्ञानाचा उपयोग मातीशी नातं सांगणाऱ्या बळीराजासाठी करण्याचा त्यांनी निर्धार केला. लहानपणापासूनच शेतीशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाण होती. याच जाणीवेतून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला आणि आज त्या कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्...