Posts

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

Image
ठाणे , दि. 23( जिमाका): देशातील व्यावसायिक एलपीजी ( LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून , राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता 50 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ.नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. या नव्या धोरणानुसार , राज्यांना यापूर्वी मिळणाऱ्या 20 टक्के आणि त्यानंतर सुधारणांच्या आधारे वाढविण्यात आलेल्या 10 टक्के कोट्याव्यतिरिक्त आता अतिरिक्त 20 टक्के कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजीचा एकूण पुरवठा आता संकटपूर्व काळातील पातळीच्या 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीव कोट्याचा सर्वाधिक फायदा रेस्टॉरंट्स , ढाबे , हॉटेल्स , औद्योगिक कॅन्टीन , अन्न प्रक्रिया उद्योग , दुग्धशाळा आणि सरकारी अनुदानित अन्न केंद्रांना होणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या 5 किलोच्या एफटीए...

ठाण्यात उद्या मानसिक आरोग्यावर 'मान-सिक' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Image
मौन सोडून संवाद साधण्याचे आवाहन ठाणे , दि. 23( जिमाका):- धकाधकीच्या जीवनात शरीराच्या आरोग्यासोबतच मनाचे आरोग्य जपणे , ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ' मान-सिक ' (Man-Sick): जाणिवेतून जागृतीकडे या विशेष सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या , मंगळवार , २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत , स्थळ: स्व.नरेंद्र बल्लाळ सभागृह , ठाणे महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अमोल भुसारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते तरुणांमधील मानसिक आरोग्य , त्याबद्दलचे गैरसमज आणि सामाजिक कल्याण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करतील. ' रेझोनन्स कम्युनिकेशन्स ' (Rezonanz Communications) द्वारे राबविण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या 'IEC Bureau' च्या सहकार्याने सुरू आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित सामाजिक भीती किंवा ' स्टिग्मा ' दूर करून...

शहीद दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
ठाणे , दि. 23 ( जिमाका): - शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग , राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने , उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के- पाटील , शशिकांत गायकवाड , वरूणकुमार सहारे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने , तहसिलदार सचिन चौधर , रेवण लेंभे , मीनल दळवी , कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम थोरात , लेखाधिकारी आश्लेषा जाधव , राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे संचालक घनश्याम मेहता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 000000

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दि.24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे , दि. 20( जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दि. 24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर सर्व स्तरावर क्षयरोग नियंत्रणाकरिता विविध विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. दि. 24 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय , ठाणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये टी.बी. मुक्त ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात येणार आहे , असे जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिनेश बा. सुतार यांनी कळविले आहे. या वर्षाचे घोषवाक्य ‘होय! आपण क्षयरोगाचा निश्चित अंत करुन शकतो. ठाणे जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली , जनभागीदारीच्या बळावर.’ हे आहे. 00000

ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार व आढावा समिती बैठक संपन्न

Image
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ठाणे , दि. 17( जिमाका):- ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार समिती ( DCC) व जिल्हास्तरीय आढावा समिती ( DLRC) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वार्षिक कर्ज योजना ( ACP) २०२५-२०२६ अंतर्गत बँकांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने स्वयं सहाय्यता गट ( SHG) कर्ज , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( CMEGP), प्रधानमंत्री विश्वकर्मा , प्रधानमंत्री स्वनिधी , प्रधानमंत्री मुद्रा योजना तसेच राज्य शासनाच्या विविध विकास महामंडळांच्या योजनांचा समावेश होता. बँकांनी कर्ज मंजूर करून शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा , असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. मात्र , खासगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी शासकीय योजनांच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली...

विशेष लेख: "मिशन शितल कवच" : वाढत्या उष्मालाटेचा मुकाबला करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

Image
राज्यात दरवर्षी उन्हाचा पारा वाढत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे केवळ अस्वस्थता येत नाही , तर ती जीवघेणीही ठरू शकते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता , प्रशासकीय विभाग , महानगरपालिका , आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एकत्रितपणे राबवायच्या उपाययोजनांचा हा ' ॲक्शन प्लॅन '. १. नागरी सुविधा : सावली आणि पाणी हाच आधार महानगरपालिका आणि नगरपालिकांनी सार्वजनिक ठिकाणी (बस स्टँड , बाजार , रिक्षा स्टँड) तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी. ' वॉटर एटीएम ' किंवा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. शॉपिंग मॉल्सनी केवळ ग्राहकांसाठीच नव्हे , तर सर्वसामान्यांसाठीही थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील उद्याने खुली ठेवून नागरिकांना विसावा घेण्याची संधी द्यावी. २. आरोग्य यंत्रणा : ' गोल्डन अवर ' मध्ये उपचार * स्वतंत्र वॉर्ड: प्रत्येक रुग्णालयात उष्माघाताच्या ( Heat Stroke) रुग्णांसाठी वातानुकूलित किंवा थंड वॉर्ड असावेत. * जलद प्रतिसाद टीम ( RRT): उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार करण्यासाठी विशे...