Posts

नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तालीम रंगणार

      ठाणे,दि.8(जिमाका) :- आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या 'नागरी संरक्षण दल' (Civil Defence) वतीने नवी मुंबईत एका विशेष 'मॉकड्रिल'चे (प्रात्यक्षिक सराव) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरी संरक्षण दलाला नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभणार आहे. ​       ​       हे प्रात्यक्षिक गुरुवार, 9 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर-11, बोनकोडे गाव येथील 'माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान' येथे हा प्रात्यक्षिक सराव संपन्न होणार असून दुपारी 2:00 ते 5:00 (दोन ते पाच) या वेळेत हे मॉकड्रिल पार पडणार आहे. ​             ​ या सरावामध्ये केवळ नागरी संरक्षण दलच नाही, तर विविध शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये ​ विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, ​ होमगार्ड्स आणि स्वयंसेवक, ​ T.D.R.F. (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) आणि N.D...

जिल्ह्यांमध्ये 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह' साजरा होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन

    ठाणे,दि.8 (जिमाका): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे संपूर्ण राज्यात 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि महामानवांच्या विचारांचा जागर करणे हा मुख्य उद्देश आहे.             या सात दिवसांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 8 एप्रिल: सप्ताहाचे उद्घाटन आणि प्रत्येक कुटुंबाला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतीचे वाटप केले जाईल, 9 व 10 एप्रिल: शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्याने, निबंध आणि वकृत्व स्पर्धा घेतल्या जातील. तसेच 'चवदार तळे सत्याग्रह' शताब्दी वर्षानिमित्त मानवी हक्कांवर विशेष कार्यक्रम होतील, 11 एप्रिल: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील, 1...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना- युवकांसाठी सुवर्णसंधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

                   ठाणे, दि.7(जिमाका) :- केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ( PMIS) ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये उमेदवारांना 6 ते 9 महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा रु.9 हजार एवढे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये विविध आस्थापना मध्ये जसे की भारत पेट्रोलियम , नायरा एनर्जी लिमिटेड , तमिलनाड मर्कन्टाईल बँक , गिल इंडिया लिमिटेड , महिंद्रा अॅन्ड महिंद्रा , प्रेसिडेंट सिस्टम लिमिटेड , माझगावडॉक शिपबिल्डर्स लिमिटेड , हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन , एचडीएफसी बँक , रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड इ. नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध आहे.   या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव , नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी , व्यावसायिक नेटवर्क तयार होणे , आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास य...

अमृत परिवार सर्वेक्षण अभियान, 2026 अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण

      ठाणे, दि.7(जिमाका) :-   महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील अशा जाती ज्यांना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही, अशा जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेता येतो. अमृतच्या लक्षित गटात सद्यस्थितीमध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य इत्यादि जातींचा समावेश आहे. अमृतच्या विविध योजना कुटुंबातील प्रत्येक घटक जसे विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी यांच्यासाठी आहेत. या योजना लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहचाव्या यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रात या लक्षित गटातील कुटुंबांचे परिवार सर्वेक्षण केले जाणार आहे. अमृत परिवार सर्वेक्षण अभियान दि.8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 दरम्यान ठाणे जिल्ह्यात सुद्धा राबविले जाणार आहे...

जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी 'हॉटस्पॉट'वर नजर ठेवा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने

Image
  ठाणे, दि.7 (जिमाका): जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आणि व्यसनमुक्ती मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हयातील अंमली पदार्थांचे 'हॉटस्पॉट' शोधून त्याठिकाणी कडक नजर ठेवा, तसेच अनोंदणीकृत व्यसनमुक्ती केंद्रांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात डॉ. संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली 22 वी जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची (NCORD) बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस औद्योगिक सुरक्षा उपसंचालक नितीन गजपुरे, सहायक संचालक वंदना शिंदे, मो. अ. कुरेशी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, नायब तहसिलदार चंद्रकांत राजपूत, जिल्हा समन्वयक (शिक्षण प्राथमिक) अनिल कुऱ्हाडे, मीरा-भाईंदर शिक्षण विभागाचे विशाल हिरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नि. पा. आहेर, मनोविकृतीचिकित्सक डॉ. विजय तेली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस निरीक्षक निखिल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक तुषार माने, सहायक पोलीस निरीक्...

ठाणे-बोरिवली प्रवासाचे अंतर आता फक्त 15 मिनिटांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'नायक' आणि 'अर्जुन' टीबीएमचा शुभारंभ

Image
    ठाणे, दि.7 (जिमाका): मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा आज गाठला गेला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाणे येथे बोगदा खोदकाम करणाऱ्या अवाढव्य 'टीबीएम' (Tunnel Boring Machine) यंत्रांचा लाँचिंग सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त-2 अश्विन मुद्गल, व्यवस्थापकीय संचालक मेघा इंजिनिअरींग कृष्णा रेड्डी आदि मान्यवर उपस्थित होते.               यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या प्रकल्पाचे वर्णन "अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा" असे केले. ते म्हणाले की, ...

मुंबई- मीरा भाईंदरच्या वेगवान प्रगतीचा 'मेट्रो' अध्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 100 किमीच्या ऑपरेशनल नेटवर्कचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण!

Image
  ठाणे दि.07 ​ (जिमाका):- ‘2018 मध्ये पेरलेल्या स्वप्नाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, मेट्रो 9 च्या या लोकार्पणामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदरमधील अंतर खऱ्या अर्थाने मिटले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगत वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय उलगडला. दहिसर पूर्व ते काशिगाव या 4.4 किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिबीन कापून आणि हिरवा झेंडा दाखवून केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत दहिसर पूर्व स्थानकाची पाहणी केली आणि दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रोने प्रवासही केला.             या ऐतिहासिक सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुव किशोर पाटील, मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र लालचंद मेहता, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ...