Posts

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ (POSH) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश

    ठाणे,दि.17(जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013(POSH Act. 2013) नुसार अंतर्गत समित्यांच्या (Internal Committee) स्थापनेबाबत विशेष तपासणी मोहीम सुरु असून ठाणे जिल्ह्यातील 10 व 10 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये (केंद्र व राज्य शासन) खाजगी आस्थापना, शाळा, महावि‌द्यालये, रुग्णालये, निमशासकीय कार्यालये, मॉल्स, उ‌द्योग-व्यवसाय, कंपन्या, हॉटेल्स तसेच इतर सर्व खाजगी आस्थापनामध्ये सहकारी व खाजगी बँक, पतसंस्था, क्रीडासंकुल, कारखाने संस्थांमध्ये कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, 2013 अन्वये आवश्यक असलेल्या अंतर्गत समिती (Internal Committee) ची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. ही मोहीम मा. जिल्हाधिकारी ठाणे व जिल्हा अधिकारी POSH ACT ठाणे तथा उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.ठाणे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी ठाणे, ...

दि.20 जून, 2026 रोजी देशभरात साजरा होणार पी.एम.किसान उत्सव दिवस पंतप्रधानांच्या शुभहस्ते दि. 20 जूनला 'पी.एम. किसान'च्या 23 व्या हप्त्याचे वितरण

  ठाणे,दि.17(जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल 202 6 ते जुलै 202 6 कालावधीतील 23 वा हप्ता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दि. 20 जून , 202 6 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरीत होणार आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र शासनाने दि. 20 जून, 202 6 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे करण्याचे ठरविले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी , 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती , पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000 /- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000 /- त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 22 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 41083.00 कोटीचा लाभ जमा झालेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किस...

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात १६ ते ३० जून दरम्यान मनाई आदेश लागू कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

    ठाणे दि.16 (जिमाका) :- ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आगामी सण-उत्सव व परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी संपूर्ण ठाणे ग्रामीण भागात दिनांक १६ जून २०२६ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक ३० जून २०२६ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत जमावबंदी व मनाई आदेश लागू केले आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील शांतता भंग होऊ नये आणि समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मनाई आदेशांमागे जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडी आणि आगामी धार्मिक व शैक्षणिक उपक्रम कारणीभूत आहेत. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चे, रॅली, धरणे आणि उपोषणे यांसारखी आंदोलने केली जात आहेत. त्यातच दिनांक १६ जून २०२६ पासून इयत्ता १० वी व १२ व...

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी आणि मनाई आदेश लागू आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय

  ​ ठाणे, दि. १६ (जिमाका) :- आगामी काळात येणारे विविध सण, उत्सव, जयंती आणि राजकीय-सामाजिक संघटनांकडून होणारी आंदोलने लक्षात घेता ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोट कलम (१) व (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हा मनाई आदेश १९ जून २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजेपासून ते ३ जुलै २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात अमलात राहणार आहे. ​             या कालावधीत अनेक महत्त्वाचे सण, उत्सव आणि विशेष दिवस साजरे होणार आहेत. यामध्ये २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, २४ जून २०२६ रोजी बजरंग दल स्थापना दिन, २६ जून २०२६ रोजी मोहरम (ताजिया यौमे आशुरा) ताबूत विसर्जन आणि राजर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) तसेच शाहू महाराज जयंती साजरी होणार आहे. यासोबतच २७ जून २०२६ रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक दिन (तिथीप...

ठाणे जिल्ह्यात शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

    ​             ठाणे दि.16(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप पेरणी करण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत जिल्ह्यात किमान १०० मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे. हवामानातील बदलांचा विचार करून शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ल्यांचा आवर्जून अवलंब करावा, अशी विनंतीही कृषी विभागाने केली आहे. ​ पावसाच्या उशिरा आगमनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाने आपत्कालीन पीक नियोजनाची तयारी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चटई पद्धतीने रोपवाटिका तयार करून भात लावणी करावी किंवा रहू पद्धतीने भाताची पेरणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या काळात कर्जत- ३, रत्नागिरी-५ या हळव्या वाणांचा आणि कर्जत-५ या निमगरव्या वाणाचा वापर करण्यावर भर द्यावा. भात ...

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकात्मिक फलोत्पादन विकास व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अर्जांचे आवाहन

  ठाणे,दि.16(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षात 'एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान' आणि 'राष्ट्रीय कृषी विकास योजना' राबविण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांमधील विविध घटक आणि उपघटकांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रामेश्वर पाचे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, शेतीचा विस्तार करणे आणि काढणीपश्चात तंत्रज्ञानाला चालना देणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत शेती व्यवसायाला आधुनिक रूप देण्यासाठी विविध बाबींवर अर्थसाहाय्य व अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनांचे स्वरूप आणि समाविष्ट घटक: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: या योजनेअंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रमात मिरची लागवड, काळीमिरी, फळबाग लागवड आणि सुटी फुले लागवड या घटकांचा समावेश आहे. तसेच अळिंबी (मशरूम) प्रकल्प, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आणि औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. याशिवाय, आधुनिक व नियंत्रित शेतीसाठी हरितगृह (ग्रीनहाऊस)...

NEET UG २०२६ परीक्षा पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आढावा

Image
    ​             ठाणे दि.16(जिमाका):- आगामी २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या 'नीट युजी २०२६ ' (NEET UG 2026) या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील राष्ट्रीय परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. ही परीक्षा कोणत्याही त्रुटीशिवाय, अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी   जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परीक्षा तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या राष्ट्रीय परीक्षेची संवेदनशीलता आणि गतवेळच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर चोख नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी दिले. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे, तहसिलदार (करमणूक) मीनल दळवी यांच्यासह परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   ​             बैठकीत मार्गदर्शन करताना जि...