Posts

महिला सक्षमीकरण: जिद्दीच्या जोरावर 'ती'ने घडविले प्रगतीचे लेणे; शहापूरच्या सौ. प्रतिक्षा बेहरे यांचा प्रेरणादायी प्रवास

Image
        "इच्छा तिथे मार्ग" या उक्तीचा प्रत्यय शाहापूर तालुक्यातील काणवे (खर्डी) येथील एका जिद्दी गृहिणीने करून दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला खऱ्या अर्थाने बळ देत, सौ. प्रतिक्षा प्रकाश बेहरे यांनी आपल्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा 'कॉस्ट्यूम ज्वेलरी'चा व्यवसाय उभा केला असून, आज त्या ग्रामीण भागातील महिलांसाठी एक आदर्श बनल्या आहेत. प्रतिक्षा बेहरे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सामान्यच. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शेती व्यवसायात गुंतल्या होत्या. मात्र, मनात काहीतरी स्वतःचे करण्याची आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची तीव्र ओढ होती. अशातच त्यांना शासनाच्या बचत गट (Self Help Group) आणि ईएपी (Employee Assistant Programme) कार्यक्रमाच्या माध्यमातून 'महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे'बद्दल (Rural Self Employment Training Institute) माहिती मिळाली. हीच माहिती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी ठाणे येथील महाबँक प्रशिक्षण संस्थेत 'जनरल ई...

ठाणे जिल्ह्यात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

Image
ठाणे,दि.14(जिमाका): शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्...

ठाण्यात 15 एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी 'विभागीय कार्यशाळेचे' आयोजन

  ठाणे,दि.14(जिमाका) : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी ठाण्यात एका विशेष विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.             डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यं त समाज कल्याण विभाग, मुंबई व ठाणे आणि विभागीय तृतीयपंथी मंडळ, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारणासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून तक्रार निवारण: तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करणे, कायदेशीर मार्गदर्शन: त्यांना त्या...

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
    ठाणे,दि.14(जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.                        यावेळी   जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,   तहसिलदार सचिन चौधर, नायब तहसिलदार मधुकर जाधव आदी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             त्याचबरोबर टाऊन हॉल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने जरूर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी याप्रसंगी केले. 0000000

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात अभिवादन

Image
    ठाणे,दि.14(जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ठाणे येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.           यावेळी   जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील आदी मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना, समाजबांधवांना "संविधान उद्देशिका" भेट म्हणून देण्यात आली.                        त्याचबरोबर टाऊन हॉल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या मान्यवरांनी या प्रदर्शनासही भेट दिली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने जरूर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण प...

​​ महिला सक्षमीकरण जिद्द, प्रशिक्षण आणि यशाची क्लिक ठाण्याच्या पूजा साखरे यांचा फोटोग्राफीतील प्रेरणादायी प्रवास

Image
  ​       ठाणे,दि.14(जिमाका) : हातामध्ये कॅमेरा घेऊन जगाकडे बघण्याची वेगळी दृष्टी आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे ठाण्याच्या पूजा रमेश साखरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, पूजा यांचा शून्यातून विश्व उभे करण्याचा हा प्रवास अत्यंत कौतुकास्पद आणि जिल्ह्यातील इतर तरुणींसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. ​             ठाणे येथील पाचपाखाडी, बनाचा पाडा परिसरात राहणाऱ्या पूजा यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासमोर भविष्यातील करिअरचा प्रश्न होता. पदवीधर असूनही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती, कारण घराचा संपूर्ण गाडा रोजंदारीवर चालणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून होता. पूजा यांना फोटोग्राफीची उपजत आवड होती, मात्र केवळ आवड असून चालत नाही, तर त्याला तांत्रिक कौशल्याची जोड असावी लागते. योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि महागड्या उपकरणांसाठी लागणाऱ्या भांडवलाअभावी त्यांची ही आवड केवळ स्वप्न बनून रा...

​​ महिला सक्षमीकरण जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर कोपर खैराणेच्या सौ. कविता भिसे यांची आत्मनिर्भरतेकडे यशस्वी झेप!

Image
    ​             ठाणे,दि.14(जिमाका) : केंद्र आणि राज्य शासनाच्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेला खऱ्या अर्थाने बळ देणारे एक प्रेरणादायी उदाहरण नवी मुंबईतील कोपर खैराणे परिसरात समोर आले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि कौशल्याची जोड देत सौ. कविता अनिल भिसे यांनी टेलरिंग व्यवसायातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचा हा प्रवास आज अनेक महिलांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. ​             मूळची शेतीवर अवलंबून असणारी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कविताजींचे शिक्षण ११ वी पर्यंत झाले होते. कुटुंबाचा भार पेलण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या रोजगाराच्या संधी शोधत होत्या. याच दरम्यान, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना 'महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), ठाणे' या संस्थेची माहिती मिळाली. ही माहिती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल, असे त्यांना त्यावेळी वाटलेही नव्हते. त्यांनी तातडीने या संस्थेच्या ...