Posts

जिद्द, संघर्ष आणि यशाचा महामेरू रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी लीलाताई वानखेडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Image
    ​             वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अचानक कोसळलेला दुःखाचा डोंगर, पदरी दीड आणि तीन वर्षांची दोन लहान मुले आणि हातात केवळ इयत्ता सातवी पास असणारे शैक्षणिक प्रमाणपत्र; अशा अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरू झालेला भुसावळ येथील लीला दिनकर वानखेडे यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरला आहे. रेल्वेच्या डी.आर.एम. (DRM) ऑफिसमधून ऑफिस सुपरिटेंडेंट (OS) म्हणून सेवानिवृत्त झालेल्या लीलाताईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीची साक्ष देते. ​             १९७९ मध्ये पतीच्या निधनानंतर लीलाताईंवर दोन्ही मुलांच्या संगोपनाची आणि एकेरी पालकत्वाची मोठी जबाबदारी आली. शिक्षण कमी असल्यामुळे सुरुवातीला पावलोपावली अडचणी आल्या. परंतु, पराभवाचा विचार न करता त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. १८ ऑक्टोबर १९८० रोजी त्यांना अनुकंपा तत्त्वावर रेल्वेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ...

जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे अंतर्गत आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर 2026

                   ठाणे,दि.3(जिमाका) : ठाणे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात होत असलेली उल्लेखनीय कामगिरी ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग   व्हावा, विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.10 ते 20 जून 2026 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये जिम्नॅस्टीक्स्, हॅन्डबॉल, खो-खो, पॉवरलिफ्टींग, रग्बी या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी हॅन्डबॉल, पॉवरलिफ्टींग, रग्बी या खेळांचे प्रशिक्षण बी.के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण ठाणे येथे तसेच जिम्नॅस्टीक्स् आणि वेटलिफ्टींग या खेळांचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल, ठाणे कोपरी, ठाणे, तसेच खो खो या खेळाचे प्रशिक्षण शिबीर शाळा क्रं.76, घणसोली, जि. ठाणे   येथे होणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यात "माझं गाव - आरोग्य संपन्न गाव" अभियानाला गती सर्व 427 ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग, आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन

Image
  ठाणे दि.03 (जिमाका) :-   राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी "माझं गाव - आरोग्य संपन्न गाव" अभियानाला   ठाणे जिल्ह्यात अत्यंत उत्साही आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या थेट अधिपत्याखाली जिल्हाभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. ग्रामस्तरावरील जनसहभागातून गावागावांमध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या व्यापक प्रयत्न करण्यात येत असून, विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२७ ग्रामपंचायतींनी या अभियानासाठी आपली नोंदणी पूर्ण केली असून ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांचा याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. अभियानाच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून, आजअखेर तालुका स्तरावर ५ मोठे मेळावे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३३ मेळावे तस...

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा

    ​             ठाणे,दि. ०३ (जिमाका) :- उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने अत्यंत तत्परता दाखवत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.             ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.                 जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ३९ गावे आणि १२७ पाड्यांची (एकूण १६६ लोकवस्त्या) तहान भागवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ४० पाण्याच्या टँकरद्वारे अविरत पुरवठा सुरू केला असून, याद्वारे सुमारे ५८ हजार ४४३ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.               ​ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तीन तालुक्यांम...

राज्यात पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण; १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना दारातच मिळणार आरोग्य सेवा

  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र राज्यातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना तात्काळ व गतिमान पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.      पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ' १९६२ ' ही टोल-फ्री हेल्पलाइन सेवा यशस्वीपणे राबवली जात आहे. या हेल्पलाइनच्या अंतर्गत सुरू असलेल्या 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या दारातच मोफत आरोग्य सेवा पुरवली जात आहे.             या योजनेचा फायदा घेत आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर वेळेवर, सुलभ आणि विश्वसनीय उपचार करण्यात आले आहेत.             या उपक्रमाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर, पशुवैद्यकीय सेवा आणखी जलद आणि आधुनिक करण्यासाठी प्रशासनाने आता 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू केली आहे.  ...

ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 11 लाखांचे आंबे आणि साडेचार लाखांचा गुटखा जप्त, 37 जणांना अटक

    ठाणे,दि.1(जिमाका): अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट (नवी मुंबई परिसर) आणि इतर विविध भागांमध्ये ३० आणि ३१ मे २०२६ रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे.             उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलिन (Ethylene) सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित ठिकाणांवरून तब्बल ३,४५३ किलो आंब्याचा साठा जप्त करण्यात आला असून, या जप्त केलेल्या आंब्यांची एकूण किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये इतकी आहे.        ...

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 आज अखेर 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल मंगळवारी छाननी

Image
  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.             आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. 00000000