Posts

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि 'शिव शंभू गाथा'च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय

Image
३९६ व्या शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा संपन्न ठाणे , दि.१९(जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ' शिवजयंती उत्सव २०२६ ' अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. "निश्चयाचा महामेरू , बहुत जनांसी आधारू" या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले.     जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या ' माय भारत , मेरा युवा भारत ' या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा दि.20 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हा दौरा

    ठाणे,दि.18(जिमाका) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.             दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता सोनाळे, भिवंडी येथील राजेश्वरी कंपाऊंड येथील नवकार फॅक्टरी उद्घाटनाकरिता आगमन व उपस्थित. सोनाळे, भिवंडी येथील नवकार ग्रुप फॅक्टरीचे उद्घाटन व राखीव.             सकाळी 11.00 वाजता नवकार ग्रुप फॅक्टरी येथून जैन मंदिर, गोपाल नगरकडे प्रयाण.             11.15 वाजता जैन मंदिर, गोपालनगर येथे आगमन व दर्शन. 11.30 वाजता अंजुर फोटा येथे टेक्सटाईल्स पार्क उद्घाटनाकरिता प्रयाण.             दुपारी 12.00 वाजता अंजुर फाटा येथे मुनि सुव्रत टेक्टसटाईल्स पार्क उद्घाटनाकरिता आगमन व उपस्थिती.             दुपारी 1.00 वाजता मुनि सुव्रत ...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांसाठी महत्वाची सूचना

  ठाणे,दि.18(जिमाका) :   मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील जनहित याचिका क्रमांक- 305/1995 मधील दि.07 मे 1997 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यानातील उर्वरित अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण करुन यादी अंतिम करणे व त्यानुसार पुनर्वसन प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरु आहे.   मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्च्चाधिकार समितीमार्फत या प्रक्रियेचे सनियंत्रण करण्यात येत आहे. उप संचालक (उत्तर), संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यान, बोरीवली यांच्या अधिनस्त क्षेत्रातील अतिक्रमण धारकांचे सर्वेक्षण M/s. Grant Thornton Bharat LLP या अधिकृत एजन्सीमार्फत करण्यात आले असून, या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या एकूण 3020 अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी वनविभागाच्या संकेतस्थळ www.mahaforest.gov.in   येथे तसेच संचालक, उप संचालक (उत्तर) व वनपरिक्षेत्र कार्यालय, येऊर येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच खालील तक्त्यात नमूद केलेल्या पुनर्वसन कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या प्राथमिक यादीचे पृथक्करण करुन अंतिम पा...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे "शिव शंभू गाथा" सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न

Image
  ठाणे,दि.18(जिमाका): भारतीय इतिहासाचे देदिप्यमान पर्व आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने "शिव शंभू गाथा" या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने आणि उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.             या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर करण्यात आला.             कार्यक्रमाचे कौतुक करताना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी नमूद केले की, रोहित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण चमूने सादर केलेली "शिव शंभू गाथा" ही खऱ्या अर्थाने शिवशंभूंच्या शौर्यशाली इतिहासाला उजाळा देणारी ठरली आहे. गायक रोहित पाटील यांनी स्वतः लिहिलेली आणि ...

नागरिकांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबीर शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ

    ठाणे,दि.18(जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्यातर्फे रविवार, दि.22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता विद्या प्रसारक मंडळ यांचे धोरले बाजीराव पेशवे सभागृह व पीकलबॉल व बास्केटबॉल मैदान, ठाणे महाविद्यालय परिसर, चेंदणी रोड, सिडको बस स्टॉप समोर,  ठाणे पश्चिम येथे नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराद्वारे विधी सेवा व सहाय्य तसेच शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याकरीता एकाच छताखाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी शासनाद्वारे वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वीत केल्या जातात. परंतु सर्वच नागरिकांपर्यंत या योजना पोहोचतात असे दिसून येत नाही व त्यासाठीच या महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महाशिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, तसेच सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या एन.जी.ओ. सहभाग घेणार आहेत. या शिब...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या 'शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन' आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन

ठाणे , दि. 18( जिमाका):- सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय , महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय , ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या , १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ' शिवजयंती ' निमित्त विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ' शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन ' असून , याद्वारे नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जवळून अनुभवता येणार आहे. अश्वमेध प्रतिष्ठान आणि ' इंटॅक ' (INTACH) ठाणे चॅप्टर यांच्या विशेष सौजन्याने हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , ठाणे येथे भरवण्यात येणार आहे. उद्या सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघणाऱ्या भव्य पदयात्रेने या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता शिवकालीन युद्धकला आणि साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातील. सकाळी १०:३० वाजता ' शिवकालीन वस्तूंच्या प्रदर्शनाचे ' औपचारिक उद्घाटन होईल , ज्यामध्ये ऐतिहासिक शस्त्रे आणि त्या काळातील दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतील. कार्यक्रमाच्या ...

विशेष लेख: “हिंद-दी-चादर” सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकता संदेश देणारा कार्यक्रम

Image
“हिंद-दी-चादर” हा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला एक विशेष कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या जीवन , विचार आणि बलिदान यांचे स्मरण करून जनतेमध्ये धर्मस्वातंत्र्य , सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकता यांचा संदेश देण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध विभागीय मुख्यालये , जिल्हे आणि महानगरांमध्ये कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. नागपूर , वर्धा , भंडारा , गोंदिया , गडचिरोली , चंद्रपूर , अमरावती , यवतमाळ , बुलढाणा , अकोला , वाशीम , नांदेड , हिंगोली , परभणी , जालना , औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) , लातूर , धाराशिव , बीड , अहमदनगर , पुणे , पिंपरी-चिंचवड , मुंबई , ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर , नाशिक , धुळे , नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांची शहादत १६७५ मध्ये झाली. त्यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी महान बलिदान दिले. त्यांच्या शिकवणुकीत समानता , सहिष्णुता , निर्भयता आणि मानवाधिकार ...