कल्याण तालुक्यातील म्हारळ येथे 'महाराजस्व अभियान' संपन्न शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ
ठाणे,दि.17(जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, दि.17 एप्रिल 2026 रोजी कल्याण तालुक्यातील म्हाराळ मंडळासाठी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान: समाधान शिबिर टप्पा 1' चे आयोजन गोवली येथील जीवनदीप महाविद्यालय परिसरात उत्साहात करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवीत, तालुक्यातील शेकडो ग्रामीण नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी "प्रशासनाने जनतेच्या दारापर्यंत येऊन त्यांचे प्रश्न सोडविणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे," असे प्रतिपादन केले. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्री.सर्जेराव म्हस्के पाटील यांनी निरीक्षक म्हणून...