ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि.27(जिमाका):- खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक २०२६-२७ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागाने आखलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,...