Posts

विशेष लेख: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर!

Image
धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्यांची ‘हिंद दी चादर’ म्हणजेच ' भारतभूमीचे कवच ' अशी अभिमानास्पद ओळख आहे. त्यांनी धर्म स्वातंत्र्य , न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान म्हणजे भारतीय   संस्कृतीतील एक गौरवास्पद अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा आदर्श बाळगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानामुळे धर्म अबाधित राहिला. त्यांच्या या महान बलिदानास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या बलिदान दिनानिमित्त नांदेड येथे विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख. अमृतसरमध्ये एप्रिल १६२१ मध्ये शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद आणि माता नानकी   यांच्या कुटुंबात श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका घनघोर युद्धात अतुलनीय शौ...

विशेष लेख: भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब

Image
  ‘ हिंद दी चादर’ , म्हणजेच भारतभूमीचे कवच , अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेगबहादुर साहिबजी 350 वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने नागपुरातील यशस्वी आयोजनानंतर आता नांदेड आणि नागपूर   येथे नुकताच भव्य अशा आध्यात्मिक समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   तर 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर नवी मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने गुरु तेगबहादुर साहिब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख: सत्याचा मार्ग आणि अहिंसेचे तत्त्व हे भारतीय विचारांचे एक अविभाज्य अंग आहे. हे तत्त्व केवळ शारीरिक हिंसा न करण्याइतपत मर्यादित नसून , अगदी मनातही कोणाबद्दल द्वेष बाळगू नये , असा त्याचा व्यापक अर्थ आहे. भारतीय संस्कृतीने जगाला विविधतेत एकता जोपासण्याचा मंत्रही दिला. ‘एकम सत् विप्रा बहुधा वदंती’ म्हणजेच सत्य एकच आहे , परंतु विद्वान लोक ते वेगवेगळ्या प्रकारे मांडतात , हे ऋग्वेदातील सूत्र भारती...

"हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन

Image
कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था , ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी   कोकण विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आवाहन नवी मुंबई , दि.२१(विमाका): शिखांचे नववे गुरु , " हिंद दी चादर" परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था , ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा , राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणे , हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांना केले आहे. जागतिक विक्रमाची नोंद... या विशेष उपक्रमाची दखल ' बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स ' या संस्थेकडून घेतली जाणार आहे. ...

'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू

Image
महसूल विभाग आपल्या दारी..! ठाणे , दि.21(जिमाका):- राज्यातील सामान्य जनता , शेतकरी , महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी सत्वर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा 1) ' राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.     महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , कार्यक्षम आणि गतिमान व्हावे , या उद्देशाने प्रत्येक जिल्हयातील तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत पूर्व तयारी करण्यात येणार असून , प्रत्यक्ष शिबिरांची सुरुवात 7 मार्चपासून होणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा ( Single Day Service Delivery) पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी समस्त ठाणेकरांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण...

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि 'शिव शंभू गाथा'च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय

Image
३९६ व्या शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा संपन्न ठाणे , दि.१९(जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ' शिवजयंती उत्सव २०२६ ' अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. "निश्चयाचा महामेरू , बहुत जनांसी आधारू" या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले.     जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या ' माय भारत , मेरा युवा भारत ' या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात...