Posts

भिवंडीत बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

    ​             ठाणे, दि.26 (जिमाका) :- भिवंडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत २७ मे २०२६ रोजी बकरी ईदचा सण चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुस्लिम बांधव पहाटेपासूनच नमाज पठणासाठी वेगवेगळ्या मशिदींमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. या पार्श्वभूमीवर परिसरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था अत्यंत सुटसुटीत व सुरक्षित राहावी यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी मोटार वाहन कायद्यानुसार विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. हे बदल २७ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजल्यापासून ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत लागू राहतील. या काळात पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.   ​             या अधिसूचनेनुसार, मुंबई, ठाणे आणि मानकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्...

बकरी ईदनिमित्त अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष अधिसूचना जारी

  ​             ठाणे,दि.26(जिमाका) :- आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चंद्र दर्शनानुसार २७ मे २०२६ रोजी (एक दिवस मागे किंवा पुढे) सकाळी ०६:०० ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहतील. ईदच्या दिवशी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दर्गे व मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात, ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे तात्पुरते बदल केले आहेत.   ​             या अधिसूचनेनुसार, अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडून कोहोजगाव मार्गे चिंचपाडा येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोहोजगाव नाका येथे पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी व्यव...

कल्याण वाहतूक विभागातर्फे बकरी ईद निमित्त वाहतुकीत मोठे बदल ​

  ठाणे दि.26(जिमाका) :- कल्याण शहरातील दुर्गाडी इदगाह येथे बकरी ईद निमित्त आयोजित सार्वजनिक नमाज पठण आणि त्याच वेळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिरात होणारा शिवसेना पक्षाचा घंटानाद कार्यक्रम लक्षात घेता कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. हा सण चंद्रदर्शनानुसार दिनांक २७ मे २०२६ किंवा २८ मे २०२६ रोजी साजरा केला जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहराचे वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे. सदर वाहतूक नियंत्रण आदेश हे दोन्ही संभाव्य दिवशी म्हणजेच दिनांक २७ मे किंवा २८ मे २०२६ रोजीच्या मध्यरात्री ००:०० वाजल्यापासून ते बकरी ईदचा नमाज पठणा चा कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहतील. ​             या अधिसूचनेनुसार, कल्याण शहरातील लालचौकीकडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ल...

महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम

  ठाणे,दि.25(जिमाका) : भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) घेण्याबाबत दि.24 जून, 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी देशामध्ये १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-१९६६, १९८३-८४, १९८७-८९, १९९२-१९९५, २००२-२००४ यावर्षी विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. संविधानाच्या कलम 326 प्रमाणे मतदार यादीमध्ये मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. मागील 20 वर्षामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले नाही. दरवर्षी केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे, मागील 20 वर्षात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश...

‘जन भागीदारी’ अभियानातून आदिवासी विकासाचा नवा संकल्प शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम

      ठाणे,दि.22(जिमाका) :- आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट आणि अत्यंत प्रभावीपणे मिळावा, या उदात्त उद्देशाने शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा, लव्हाळी येथे “ जन भागीदारी - सर्वात दूर, सर्वात पहिले ” या देशव्यापी माहिती, शिक्षण व संपर्क (IEC) अभियानाचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या अभियानाने दुर्गम भागातील तळागाळातील जनतेपर्यंत विकासाची एक नवी आशा पोहोचवली असून आदिवासी विकासाचा एक नवा संकल्प या निमित्ताने दृढ झाला आहे. ​             या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात शिक्षण विस्तार अधिकारी घोलप आर.बी., शिक्षण विस्तार अधिकारी   शिंदे के.एम., विस्तार अधिकारी मोहेकर, लव्हाळी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका   बुटेरे एस.आर., लव्हाळीचे मुख्याध्यापक   तारमळे सी.बी., कारावचे मुख्याध्यापक गोंधळी एस. डी. आणि सोनावळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे   जाधव टी.व्ही. यांच्या शुभहस्ते 'धरती आबा बिरसा मुंडा' यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ​  ...

एल निनोच्या संभाव्य धोक्याविरुद्ध ठाणे जिल्हा कृषी विभाग सज्ज जिल्ह्यात राबवणार १०८० 'जलतारा' उपचार

    ​             ठाणे,दि.22(जिमाका) :- भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार साल 2026 हे एल निनोचे वर्ष असल्याने कृषी क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची वाटचाल मंदावणे, पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात मोठा खंड पडणे आणि एकूणच पर्जन्यमान कमी राहणे अशा समस्या उद्भवू शकतात. याचा थेट फटका खरीप हंगामातील पेरण्यांना बसू शकतो आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणी किंवा पुनर्लागवडीची वेळ येऊ शकते. मातीतील ओलावा वेगाने कमी झाल्यामुळे पिकांवर ताण येतो, तसेच फुलोरा व दाणे भरण्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवल्यास अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होऊ शकते. संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे जलस्त्रोतांमधील साठा घटून भूजल पातळी खाली जाण्याची आणि उच्च तापमानामुळे बाष्पीभवन वाढून पिकांची पाण्याची गरज वाढण्याची भीती आहे. या नकारात्मक परिणामांना तोंड देण्यासाठी   शासनाचा कृषी विभाग आणि ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पूर्णपणे सज्ज झाले आहे.   ​  ...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला लवकरच सुरुवात महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात

    ​             ठाणे,दि.22(जिमाका) :- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारी आणि पारंपारिक पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे आधुनिक स्वरूप देणारी 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' संपूर्ण पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. महाआयटीकडून सध्या 'महाडीबीटी' पोर्टलवर अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, ते पूर्ण होताच इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.   ​             राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारी ही योजना राज्याच्या आर्थिक विकासात अत्यंत भरीव योगदान द...