Posts

राज्यात पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण; १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना दारातच मिळणार आरोग्य सेवा

  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र राज्यातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना तात्काळ व गतिमान पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.      पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ' १९६२ ' ही टोल-फ्री हेल्पलाइन सेवा यशस्वीपणे राबवली जात आहे. या हेल्पलाइनच्या अंतर्गत सुरू असलेल्या 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या दारातच मोफत आरोग्य सेवा पुरवली जात आहे.             या योजनेचा फायदा घेत आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर वेळेवर, सुलभ आणि विश्वसनीय उपचार करण्यात आले आहेत.             या उपक्रमाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर, पशुवैद्यकीय सेवा आणखी जलद आणि आधुनिक करण्यासाठी प्रशासनाने आता 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू केली आहे.  ...

ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 11 लाखांचे आंबे आणि साडेचार लाखांचा गुटखा जप्त, 37 जणांना अटक

    ठाणे,दि.1(जिमाका): अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट (नवी मुंबई परिसर) आणि इतर विविध भागांमध्ये ३० आणि ३१ मे २०२६ रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे.             उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलिन (Ethylene) सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित ठिकाणांवरून तब्बल ३,४५३ किलो आंब्याचा साठा जप्त करण्यात आला असून, या जप्त केलेल्या आंब्यांची एकूण किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये इतकी आहे.        ...

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 आज अखेर 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल मंगळवारी छाननी

Image
  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.             आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. 00000000      

ठाणे जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा साठेबाजी आणि काळाबाजारावर प्रशासनाची कडक नजर

Image
    ठाणे,दि.29(जिमाका) : ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा, यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. २९ मे २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL), आयओसीएल (IOCL) या प्रमुख तेल कंपन्यांचे डेपो मॅनेजर, विभागीय विक्री अधिकारी, तसेच रिलायन्स जिओ आणि नायरा पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या ठाणे जिल्ह्यात सर्व कंपन्यांचा मिळून एकूण ३ हजार २६० किलो लिटर पेट्रोल आणि १ हजार ३८८ किलो लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीनिहाय पाहिल्यास, HPCL कडे १ हजार ६२६ KL पेट्रोल व १ हजार ७७२ KL डिझेल, BPCL कडे ४०१ KL पेट्रोल व ९९६ KL डिझेल, IOCL कडे ९९० KL...

सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे कार्यालयाचे सर्व महाविद्यालयांना निर्देश

  ठाणे,दि.29(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हा पोर्टल आता MahaDBT १.० वरून MahaDBT 2.0 मध्ये परावर्तित (Migration) होत असल्यामुळे सर्व महाविद्यालयांनी सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण, ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहे. सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असून, संबंधित महाविद्यालयांनी वेळेत अर्जाची पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे तसेच कोणताही पात्र विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी आहे. तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जाची तात्काळ तपासणी करून मंजुरी / कार्यवाही पूर्ण कर...

शेतकरी बंधूनी डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतास पर्यायी खते वापरावीत

      ठाणे दि.27(जिमाका) :- राज्यामध्ये मागील 3 वर्षात खरीप हंगामात 4 4 लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते व एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होणार आहे. डिएपी ( Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फूरद ही अन्नद्रव्य आहेत.   राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फूरद युक्त   खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी ( Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे .   एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फूरद-16 टक्के सह सल्फ र व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर ...

पीएम किसान सन्मान निधी लाभाथ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी तातडीने करून घेण्याबाबत

    ठाणे दि.27(जिमाका) :- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी अॅग्रिस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्राच्या अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डिजीटल ओळख देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी योजनांमध्ये पारदर्शकता आणणे, पात्र लाभार्थीची अचूक नोंद ठेवणे व अनुदान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अॅग्रिस्टॅक म्हणजे काय? अॅग्रिस्टॅक हा शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस आहे. यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील व पिकांची नोंद एकाच ठिकाणी केली जाते. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ याच फार्मर आयडीद्वारे दिला जाणार आहे. अॅग्रिस्टॅक योजनेचे फायदे :- अॅग्रिस्टॅक नोंदणीमुळे अनुदानाची रक्कम थेट श...