Posts

‘हिंद दी चादर’ समूहगानाचा नवा जागतिक विक्रम

Image
51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा इतिहास ठाणे ,23( जिमाका): “समूहगायनाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या महान बलिदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून सामाजिक ऐक्य , सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल ,” असे प्रतिपादन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त कोकण विभागात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य समूहगान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून , त्याची 'Best of India Records' या संस्थेकडून ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आज सकाळी ९.०० वाजता विभागातील सर्व शासकीय व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये एकाच वेळी हे विशेष समूहगान आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद की चादर’ हे गीत सुमारे २० हजार शाळांमधील ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एका सुरात गायले. जिल्हाधिकारी डॉ.पांच...

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष

Image
' बेस्ट ऑफ इंडिया ' रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद नवी मुंबई , दि. 23( विमाका):- हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून , नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे भावनिक आवाहन केले आहे.         नेरुळ येथील गुरु गोविंदसिंग एज्युकेशन अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांच्यासह उपमहापौर दशरथ भगत , विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे , प्रशासन सहआयुक्त विजय म्हासाळ , कोकण विभागाचे माहिती उपसंच...

कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ; अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक

ठाणे , दि.23(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी , महिला , व्यक्ती तसेच संस्थांचा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ , वेळबद्ध , पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे , अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न , वसंतराव नाईक कृषिभूषण , जिजामाता कृषिभूषण , वसंतराव नाईक शेतीमित्र , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी , उद्यानपंडित पुरस्कार , कृषिभूषण (सेंद्रिय शेती) , युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार हे पुरस्कार माननीय राज्यपाल , महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो. यापूर्वी विविध कृषी पुरस...

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
ठाणे , दि. 23 ( जिमाका):- थोर समाजसुधारक , स्वच्छता व सामाजिक समतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने , उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके , उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने , उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरुणकुमार सहारे , उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड , तहसीलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर , तहसीलदार (संगणक/सांख्यिकी) संदीप थोरात , तहसीलदार (रेतीगट) अमोल कदम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनांच्या माध्यमातून समाजात स्वच्छता , नैतिकता आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून समाजजागृतीची चळवळ उभी राहिली. 000000

विशेष लेख: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर!

Image
धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्यांची ‘हिंद दी चादर’ म्हणजेच ' भारतभूमीचे कवच ' अशी अभिमानास्पद ओळख आहे. त्यांनी धर्म स्वातंत्र्य , न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान म्हणजे भारतीय   संस्कृतीतील एक गौरवास्पद अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा आदर्श बाळगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानामुळे धर्म अबाधित राहिला. त्यांच्या या महान बलिदानास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या बलिदान दिनानिमित्त नांदेड येथे विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख. अमृतसरमध्ये एप्रिल १६२१ मध्ये शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद आणि माता नानकी   यांच्या कुटुंबात श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका घनघोर युद्धात अतुलनीय शौ...

विशेष लेख: भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब

Image
  ‘ हिंद दी चादर’ , म्हणजेच भारतभूमीचे कवच , अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेगबहादुर साहिबजी 350 वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने नागपुरातील यशस्वी आयोजनानंतर आता नांदेड आणि नागपूर   येथे नुकताच भव्य अशा आध्यात्मिक समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   तर 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर नवी मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने गुरु तेगबहादुर साहिब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख: सत्याचा मार्ग आणि अहिंसेचे तत्त्व हे भारतीय विचारांचे एक अविभाज्य अंग आहे. हे तत्त्व केवळ शारीरिक हिंसा न करण्याइतपत मर्यादित नसून , अगदी मनातही कोणाबद्दल द्वेष बाळगू नये , असा त्याचा व्यापक अर्थ आहे. भारतीय संस्कृतीने जगाला विविधतेत एकता जोपासण्याचा मंत्रही दिला. ‘एकम सत् विप्रा बहुधा वदंती’ म्हणजेच सत्य एकच आहे , परंतु विद्वान लोक ते वेगवेगळ्या प्रकारे मांडतात , हे ऋग्वेदातील सूत्र भारती...