Posts

शेतकरी बंधूनी डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतास पर्यायी खते वापरावीत

      ठाणे दि.27(जिमाका) :- राज्यामध्ये मागील 3 वर्षात खरीप हंगामात 4 4 लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते व एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी होणार आहे. डिएपी ( Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फूरद ही अन्नद्रव्य आहेत.   राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फूरद युक्त   खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी ( Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे .   एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फूरद-16 टक्के सह सल्फ र व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर ...

पीएम किसान सन्मान निधी लाभाथ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी तातडीने करून घेण्याबाबत

    ठाणे दि.27(जिमाका) :- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी अॅग्रिस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्राच्या अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डिजीटल ओळख देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी योजनांमध्ये पारदर्शकता आणणे, पात्र लाभार्थीची अचूक नोंद ठेवणे व अनुदान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अॅग्रिस्टॅक म्हणजे काय? अॅग्रिस्टॅक हा शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस आहे. यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील व पिकांची नोंद एकाच ठिकाणी केली जाते. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ याच फार्मर आयडीद्वारे दिला जाणार आहे. अॅग्रिस्टॅक योजनेचे फायदे :- अॅग्रिस्टॅक नोंदणीमुळे अनुदानाची रक्कम थेट श...

केंद्र शासनाने Fertilzer sale application system (FSAS) या mobile base app मधून QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे बुकींग करता येणार

  ठाणे दि.27(जिमाका) :- केंद्र शासनाकडून अनुदानित खतांच्या वितरणासाठी National Fertilizer Sale Framework अंतर्गत Fertilzer sale application system (FSAS) या अॅपद्वारे खत खरेदी प्रणाली तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या आराखड्या अंतर्गत FSAS हे App केंद्र शासनाने तयार केले असून या App मधून शेतकऱ्यांना खतांची चुकीग करता येणार आहे. राज्यात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाणार आहे. त्यासाठी शेतकरी व खत विक्रेते यांना याबाबत माहिती होण्यासाठी व त्याप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा ( National fertilizer sale framework) प्रकल्पांतर्गत IFMS व Agristack   प्रणालीचे integration करण्यात येत आहे. ·          केंद्र शासनाने Fertilzer sale application system ( FSAS ) हे mobile base App तयार केले आहे.   या mobile base app मधून QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे बुकींग करता येणार आहे. ·  ...

भिवंडीत बकरी ईदनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

    ​             ठाणे, दि.26 (जिमाका) :- भिवंडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत २७ मे २०२६ रोजी बकरी ईदचा सण चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुस्लिम बांधव पहाटेपासूनच नमाज पठणासाठी वेगवेगळ्या मशिदींमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. या पार्श्वभूमीवर परिसरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था अत्यंत सुटसुटीत व सुरक्षित राहावी यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी मोटार वाहन कायद्यानुसार विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. हे बदल २७ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजल्यापासून ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत लागू राहतील. या काळात पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.   ​             या अधिसूचनेनुसार, मुंबई, ठाणे आणि मानकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्...

बकरी ईदनिमित्त अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष अधिसूचना जारी

  ​             ठाणे,दि.26(जिमाका) :- आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चंद्र दर्शनानुसार २७ मे २०२६ रोजी (एक दिवस मागे किंवा पुढे) सकाळी ०६:०० ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहतील. ईदच्या दिवशी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील दर्गे व मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात, ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे तात्पुरते बदल केले आहेत.   ​             या अधिसूचनेनुसार, अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडून कोहोजगाव मार्गे चिंचपाडा येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोहोजगाव नाका येथे पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी व्यव...

कल्याण वाहतूक विभागातर्फे बकरी ईद निमित्त वाहतुकीत मोठे बदल ​

  ठाणे दि.26(जिमाका) :- कल्याण शहरातील दुर्गाडी इदगाह येथे बकरी ईद निमित्त आयोजित सार्वजनिक नमाज पठण आणि त्याच वेळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामाता मंदिरात होणारा शिवसेना पक्षाचा घंटानाद कार्यक्रम लक्षात घेता कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. हा सण चंद्रदर्शनानुसार दिनांक २७ मे २०२६ किंवा २८ मे २०२६ रोजी साजरा केला जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहराचे वाहतूक पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे. सदर वाहतूक नियंत्रण आदेश हे दोन्ही संभाव्य दिवशी म्हणजेच दिनांक २७ मे किंवा २८ मे २०२६ रोजीच्या मध्यरात्री ००:०० वाजल्यापासून ते बकरी ईदचा नमाज पठणा चा कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहतील. ​             या अधिसूचनेनुसार, कल्याण शहरातील लालचौकीकडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ल...

महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम

  ठाणे,दि.25(जिमाका) : भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) घेण्याबाबत दि.24 जून, 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी देशामध्ये १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-१९६६, १९८३-८४, १९८७-८९, १९९२-१९९५, २००२-२००४ यावर्षी विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. संविधानाच्या कलम 326 प्रमाणे मतदार यादीमध्ये मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. मागील 20 वर्षामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले नाही. दरवर्षी केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे, मागील 20 वर्षात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश...