Posts

ठाणे जिल्ह्याचा 'डिजिटल कायापालट': जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या लोकाभिमुख प्रशासकीय प्रारूपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

Image
ठाणे , दि.29(जिमाका): महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता , शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ' ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार , दि.28 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ' सेवा संवाद ' आणि ' डिजी संवाद ' सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ' सेव...

ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Image
ठाणे , दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये , यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीने मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या या आदेशानुसार , आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या , कॅन , डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विकता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणे बेकायदेशीर असून , पंपावरील सुरक्षितता ...

एलपीजी तुटवड्यामुळे ठाणे जिल्ह्यात केरोसीनचे वितरण; प्रति कुटुंब 3 लिटरचा कोटा निश्चित

Image
  ठाणे , दि.27(जिमाका): सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या १२ मार्च २०२६ च्या आदेशानुसार , एलपीजीला तात्पुरता पर्याय म्हणून केरोसीनचे (घासलेट) वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ३७ लक्ष ४४ हजार लिटर (३ हजार ७४४ KL) केरोसीनचा साठा मंजूर करण्यात आला असून , त्यातील ४८ , ००० लिटरचा (४८ KL) वाटा ठाणे जिल्ह्याला मिळाला आहे. पात्रता आणि वितरणाचे नियम.. ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की , हे वितरण प्रामुख्याने अंत्योदय अन्न योजना ( AAY) आणि प्राधान्य कुटुंब ( PHH) शिधापत्रिकाधारकांसाठी असेल. मात्र , केरोसीनच्या उपलब्धतेनुसार आणि लोकांच्या प्रतिसादाचा विचार करून श्वेतपत्रिकाधारकांनाही हे इंधन मिळण्यास पात्र धरले जाईल. ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही , त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलेले नाही ; ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून सादर केल्यास अशी कुटुंबेही केरोसीन मिळवू शकतात. तसेच , स्थलांतरित मजुरांना कें...

ठाणे जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना मिळणार 'बुस्टर डोज'

वाधवाणी फाउंडेशनसोबत जिल्हा उद्योग केंद्राचा पुढाकार ठाणे , दि.24(जिमाका): महाराष्ट्र राज्य परिवर्तन संस्था ( MITRA) आणि वाधवाणी फाउंडेशन यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील सूक्ष्म , लघु व मध्यम उपक्रमांचे ( MSME) सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवडक उद्योगांची वार्षिक उलाढाल पाच पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून , यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घेतला आहे. उद्योगांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाची जोड.. 4 मार्च 2026 रोजी ' मित्रा ' (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार , कौशल्य विकास , उद्योजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर ( AI) आधारित नवोन्मेषाद्वारे रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे. या भागीदारीमुळे सन 2030 पर्यंत राज्यातील सुमारे 10 हजार व्यवसायांना प्रगतीसाठी थेट मदत मिळणार आहे. वार्षिक उलाढाल 500 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट तर 1500 उद्योगांची होणार निवड... या योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे 5ते 100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या सूक्ष्म व लघु...

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

Image
ठाणे , दि. 23( जिमाका): देशातील व्यावसायिक एलपीजी ( LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून , राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता 50 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ.नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. या नव्या धोरणानुसार , राज्यांना यापूर्वी मिळणाऱ्या 20 टक्के आणि त्यानंतर सुधारणांच्या आधारे वाढविण्यात आलेल्या 10 टक्के कोट्याव्यतिरिक्त आता अतिरिक्त 20 टक्के कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजीचा एकूण पुरवठा आता संकटपूर्व काळातील पातळीच्या 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीव कोट्याचा सर्वाधिक फायदा रेस्टॉरंट्स , ढाबे , हॉटेल्स , औद्योगिक कॅन्टीन , अन्न प्रक्रिया उद्योग , दुग्धशाळा आणि सरकारी अनुदानित अन्न केंद्रांना होणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या 5 किलोच्या एफटीए...

ठाण्यात उद्या मानसिक आरोग्यावर 'मान-सिक' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Image
मौन सोडून संवाद साधण्याचे आवाहन ठाणे , दि. 23( जिमाका):- धकाधकीच्या जीवनात शरीराच्या आरोग्यासोबतच मनाचे आरोग्य जपणे , ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ' मान-सिक ' (Man-Sick): जाणिवेतून जागृतीकडे या विशेष सार्वजनिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या , मंगळवार , २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत , स्थळ: स्व.नरेंद्र बल्लाळ सभागृह , ठाणे महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अमोल भुसारे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते तरुणांमधील मानसिक आरोग्य , त्याबद्दलचे गैरसमज आणि सामाजिक कल्याण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करतील. ' रेझोनन्स कम्युनिकेशन्स ' (Rezonanz Communications) द्वारे राबविण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या 'IEC Bureau' च्या सहकार्याने सुरू आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित सामाजिक भीती किंवा ' स्टिग्मा ' दूर करून...

शहीद दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
ठाणे , दि. 23 ( जिमाका): - शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग , राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने , उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के- पाटील , शशिकांत गायकवाड , वरूणकुमार सहारे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने , तहसिलदार सचिन चौधर , रेवण लेंभे , मीनल दळवी , कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम थोरात , लेखाधिकारी आश्लेषा जाधव , राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे संचालक घनश्याम मेहता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 000000