Posts

Showing posts from May, 2026

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने 'शिष्यवृत्ती' जाहीर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात वाहिली आदरांजली

Image
  ठाणे, दि. 02 (जिमाका) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा गौरवशाली इतिहास आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून १०० टक्के प्रकाशित केला जाईल, तसेच हा प्रेरणादायी इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले.                 आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १८७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.             याप्रसंगी बोलताना मंत्री डॉ. उईके म्हणाले की, राघोजी भांगरे यांनी समाजासाठी आणि देशहितासाठी दिलेले बलिदान विसरता येणारे नाही. विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने 'राघोजी भांगरे शिष्यवृत्ती' सुरू केली असून, प्रकल्प, विभाग आणि राज्य स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प...

जिल्हाधिकारी कार्यालयातील व जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी देणार 'एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक'ला सक्षम पर्याय

Image
  'प्रोजेक्ट आशाये'चा संकल्प     ठाणे,दि. 01 (जिमाका):- 'महाराष्ट्र दिना'चे औचित्य साधून ठाणे जिल्हा प्रशासन आणि वेसॅक इंडिया (VesacIndia) यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रोजेक्ट आशाये' (Project AASHAYEIN) या अभिनव उपक्रमाचा आज साकेत रोड येथे थाटात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या सहकार्याने सुरू झालेला हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिलाच 'प्रशासकीय पथदर्शी प्रकल्प' ठरणार आहे.             या सोहळ्यात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रशासनाकडून 'केअर आणि कन्सर्न' (काळजी आणि जिव्हाळा) ठाण्याचे 'ट्री-मॅन' विजयकुमार कट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 5 जून (जागतिक पर्यावरण द...

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न

Image
    ठाणे,दि.01(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले.             यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील,वरुणकुमार सहारे, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, प्रदीप कुडाळ, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000000000

जेथे कष्टाला मान, तेथेच महाराष्ट्र महान महाराष्ट्र देशाचे उत्पादन हब - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  ठाणे,दि.01 (जिमाका): "आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमूल्य योगदान असून जेथे कष्टाला मान दिला जातो, तोच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान ठरतो. आज महाराष्ट्र हे देशाच्या उत्पादनाचे प्रमुख हब म्हणून नावारूपास आले आहे," असे गौरवपूर्ण उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.             महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य मंत्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि यशवंतराव चव्हाणांनी आणलेला मंगलकलश या वारशाचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर केला.             राज्याच्या...

स्वगणना करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा जनगणनेचा शुभारंभ

  ठाणे,दि.01(जिमाका) : राष्ट्रीय जनगणनेला आजपासून देशव्यापी सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करीत ठाणे जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या शुभारंभ कार्यक्रमासाठी महापौर शर्मिला पिंप्रोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जनगणना सहसंचालक रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.   यावेळी स्वगणनेसाठी असलेल्या क्यूआर कोडचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी टॅब वर हा कोड स्कॅन करून स्वगणना केली. दिनांक १ ते १५ मे हा स्वगणनेचा कालावधी असून त्यानंतर १६ मे ते १४ जून याकलावधीत घरोघरी जाऊन जनगणना केली जाणार आहे.   यावेळी विकास आणि प्रगती या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. जनगणनामोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन देखील त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सहसंचालक भोसले यांच्या हस्त...