Posts

Showing posts from December, 2025

राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ‘डीएव्ही’च्या देव व ऊर्वीला पदक

Image
  ठाणे,दि.30(जिमाका) :- येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुनिलकुमार देव सिंग याने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात रजत; तर मुलींच्या गटात ऊर्वी जगदीश मोरे हिने कांस्यपदक पटकविले. जिल्हास्तरीय आणि विभागीय निवड चाचणी स्पर्धेद्वारे या दोघांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.   ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत देव आणि ऊर्वीने आपापल्या वयोगटात ट्रॅडिशनल, रिदमिक आणि आर्टिस्टिक प्रकारात प्रत्येकी तीन सुवर्ण पदके पटकविली होती. त्यानंतर वसई येथे झालेल्या मुंबई विभागीय शालेय योगासन स्पर्धेत देवने ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टिक प्रकारात दोन सुर्वर्ण पदके प्राप्त केली होती; तर ऊर्वीने आर्टिस्टिक प्रकारात सुर्वण आणि ट्रॅडिशनल प्रकारात कांस्यपद पटकविले होते. त्यामुळे या दोघांची छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीड...

महिला बचतगटाच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू लोकशाहीची गुढी

        ठाणे,दि.29(जिमाका) :- आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या वतीने उथळसर प्रभाग समितीअंतर्गत (प्रभाग क्र. 10, 11 व 12) आज महिला बचतगटाच्या माध्यमातून सिध्देश्वर तलाव परिसर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.    मतदानाचा अधिकार हा कोणत्याही लोकशाही समाजातील मूलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे सक्षम लोकशाहीसाठी 'आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण'... हा नारा घेऊन   एकता महिला बचतगटातील महिला जेथे वास्तव्य करतात तेथील परिसरात मतदान जनजागृती करत लोकशाहीची ही गुढी उभारण्यासाठी पुढाकार घेत आहेत. 00000000000

बार्टीचे विविध क्षेत्रातील कार्य प्रशंसनीय! समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांचे प्रतिपादन बार्टीचा वर्धापन दिन साजरा

Image
  ठाणे,दि.29(जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या मूल्यांचा जनमाणसात प्रचार-प्रसार करून वंचित,उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत बार्टीचे योगदान प्रशंसनीय असल्याचे मत समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ- मुंडे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेचा 47 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक   विशाल लोंढे, विभागप्रमुख अनिल कारंडे,   रवींद्र कदम, शुभांगी पाटील,   डॉ बबन जोगदंड,   लेखाधिकारी नितीन चव्हाण यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना मुंढे म्हणाल्या, बार्टी ही संस्था अनुसूचित जातींच्या   कल्याणासाठी   विविध उपक्रम राबवत आहे.त्याचा फायदा अनेकांना होत आहे. य...

बनावट नियुक्ती पत्रांपासून सावधान! जिल्हा प्रशासनाचे आवाहन; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

    ठाणे,दि.26(जिमाका):- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 'लिपिक टंकलेखक' या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी ठाणे शहर पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.             ॲड.प्रतिभा माळी यांच्या नातेवाईक असलेल्या श्रीमती वृषाली जाधव आणि श्रीमती मृणाली माळी या दोघांना जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्याचे बनावट आदेश देण्यात आले होते. हे नियुक्ती पत्र घेऊन त्या 24 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होण्यासाठी गेल्या होत्या. संबंधित महिलांनी सादर केलेली कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे पाहिल्यानंतर, ती प्रथमदर्शनी बनावट असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आले. जिल्हा प्रशासनाने अधिक चौकशी केली असता, सतीश संजय वानखेडे नामक व्यक्तीने ही बनावट नियुक्ती...

ठाणे शासकीय तंत्रनिकेतन मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अभ्यासक्रमनिहाय / विषयनिहाय तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातांची (Visiting Lecturer) आवश्यकता

    ठाणे,दि.26(जिमाका) : शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे या संस्थेत शैक्षणिक वर्ष 2025-2026 च्या सम सत्राकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात अभ्यासक्रमनिहाय / विषयनिहाय तासिका तत्वावर अभ्यागत अधिव्याख्यातांची (Visiting Lecture) आवश्यकता आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारानी दि.29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे संबंधीत विभागात शैक्षणिक मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस हजर राहावे.             उमेदवारांनी संबंधित विषयाचे सादरीकरण व मुलाखतीच्या तयारीने उपस्थित राहावे. तसेच सोबत स्वतःचा बायोडेटा, मूळ शैक्षणिक कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकित प्रतींचा एक संच सोबत ठेवावा. निवड केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक भारापोटी संद्धांतिक तासिकेस रूपये 800/- प्रति तास व प्रात्यक्षिक तासिकेस रू.400/- प्रति तास या दराने मानधन देय राहील.             जाहिरात निव्वळ तासिका तत्वावर नियुक्तीसाठी असल्यामुळे भविष्यात नियमित नियुक्तीचा कुठलाही न्यायालयीन दावा करता येण...

घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाच्या अडचणी दूर होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

Image
    ठाणे,दि.12,(जिमाका) :- गायमुख ते फाउंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी  संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. ठाणे आणि मिरा भाईंदर या दोन शहरांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणासंदर्भात वन विभागाच्या तांत्रिक अडचणी संदर्भातील आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतली. ही बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समितीसभागृहात संपन्न झाली. घोडबंदर मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होते. तसेच मिरा भाईंदर, वसई-विरार या भागाला हा मार्ग ठाणे, नवी मुंबईशी जोडतो. मार्गाच्या रुंदीकरणात वन विभागाकडून परवानग्या मिळत नसल्याने रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. मिरा-भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण व विकासकामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना-हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले, तरी विभागान...

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

Image
      ठाणे,दि.11,(जिमाका) :- जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षते आढावा बैठक पार पडली. खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत तातडीने उपायोजना राबविण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.  जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या बैठकीत आयुष्यमान कार्ड समिती, 15 वित्त आयोग आढावा बैठक, जिल्हास्तरीय नियमित लसीकरण टास्क फोर्स समिती, जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियत्रंण समिती, वातावरणीय बदल व मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध व पुनर्विलोकन समितीमार्फत या विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आय...

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

Image
    ठाणे,दि.11,(जिमाका) :- ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ठाणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत ठाणे शहर व ग्रामीण, नवीमुंबई, मिरा-भाईंदर या पोलीस विभागांच्या हद्दीत माहे जानेवारी 2025ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत खुन, बलात्कार, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, जाळपोळ असे विविध प्रकाराचे   एकूण 186 गुन्हे   नोंदविण्यात आले आहेत.   त्यापैकी 102 अत्याचारित व्यक्तींना एकूण 42 लाख 50 हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात आले आहे. 84 प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या आभावामुळे अर्थसहाय्य देण्यात आलेले नाही.   कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणांत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करुन सदर कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण क...

‘गांजा’ विक्रीच्या प्रयत्नात दोघे जेरबंद ठाणे ग्रामीण पोलीसांची धाडसी कारवाई

    ठाणे, दि. 10 (जिमाका) :- ‘गांजा’ सारख्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी फिरत असलेल्या दोघांना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. अंमली पदार्थ विक्रीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई करून 4 किलो 52 ग्रॅम वजनाच्या रु. 1 लाख 20 हजार किंमतीच्या गांज्यासह दोघांना अटक केली. अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीसांनी दिली आहे.   ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डि. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलिस अधीक्षक अमोल मित्तल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा सापळा रचला. दि. 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता पथकाला माहिती मिळाली की दोन इसम मुंबई-नाशिक मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शहापूर तालुक्यातील गोलभन गावाच्या हद्दीतील डायमंड हॉटेलसमोर सापळा रचून आसीफ गणी शेख उर्फ पिंजारी (वय 40, रा. सावंत पार्क, शहापूर) आणि विपुल कृष्णा मोरे (वय 30, रा. विघ्नहर्ता बिल्डिं...

इ. 8 वी साठी 28 डिसेंबरला राज्यभर परीक्षा केंद्रांवर आयोजन

  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षा   ठाणे,दि.10,(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-4 मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (NMMS) इयत्ता 8 वी साठी रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण 758 केंद्रावर घेण्यात येणार असून, या परीक्षेसाठी राज्यभरातून   एकूण 13 हजार 789 शाळा व एकूण 2 लाख 50 हजार 544 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांना परिषदेच्या www.mscepune.in   व   https://mscenmms.in    या संकेतस्थळांवर शाळा लॉगिन या विकल्पावर   दि.10 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. या प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्...

राज्यस्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन

  ठाणे,दि.10,(जिमाका) :-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे   अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्ममाने कुळगाव बदलापुर पुर्व येथे दि. 12 ते 14   डिसेंबर 2025 या कालावधीत शासकीय शालेय क्रीडा- 2025-26 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांनी दिली आहे. सन 2025-26 च्या राज्यस्तरीय शालेय हॅण्डबॉल (14 वर्षे   मुले व मुली) क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी यंदा ठाणे जिल्ह्याकडे सो‍पविण्यात आलेली आहे. ही स्पर्धा दि.12 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत आदर्श विद्या मंदिर, कुळगाव बदलापुर पुर्व ता.अंबरनाथ, जि. ठाणे येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 8 विभागातून 16 संघातील सुमारे 317 खेळाडू मुले/मुली, मार्गदर्शक, अधिकारी आणि पंच सहभागी होत आहेत. तसेच जिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना ट्रॅकसूट तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंना डिज...

फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ

  ठाणे, दि.09(जिमाका) :- कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांकरीता आंबिया बहार सन 2025-26 मधील आंबा व काजू या पिकांसाठी सहभाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य सांख्यिक कृषि आयुक्तालय पुणे यांनी दिली आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारमध्ये राबविण्यात येते. कोकण विभागात आंबिया बहार 2025-26 मध्ये आंबा व काजू या पिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर,2025 होती. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in   वर सहभाग घेता येत नव्हता. त्यामुळे सहभागाचा कालावधी वाढवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांकरीता आंबिया बहार सन 2025-26 मधील आंबा व काजू या पिकांसाठी सहभाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन फळपिक विमा विमा योजने...

“एक दिवस सैनिकांसाठी” हा उपक्रम राबवणार ध्वजदिन निधी संकलनाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

Image
  ठाणे, दि.09(जिमाका) :- “ प्रत्येक महिन्यातील एक दिवस सैनिकांसाठी समर्पित करणार असून, त्या दिवशी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. तसेच ध्वजदिन निधी संकलनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत, ” असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाहीर केले. ठाणे जिल्ह्याचा ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी व ध्वजदिन समितीचे अध्यक्ष                     डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षेतेखाली आज   नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी व अपर जिल्हादंडाधिकारी हरिचंद्र बा. पाटील,   निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने,   उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, भारतीय नेव्ही   कमांडर मनजित वत्स, भारतीय नेव्ही   सब. लेफटनन्ट देव शंकर त्रिपाटी, भरतीय नेव्हीचे प्रविण उत्तम लोंढे नवी मुंबई सहायक पोलीस आयुक्त निलम वाव्हळ, ठ...

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त

Image
  ठाणे,दि.09,(जिमाका) :- तरुण पिढीमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर (N-CORD) समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ऑद्यौगिक सुरक्षा कार्यालय, कल्यण, ठाणे, जिल्हा आरोग्य कार्यालय, ठाणे, जिल्हा शिक्षण विभाग, ठाणे (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण अधिकारी, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर व कल्याण महानगरपालिका, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, ठाणे, जिल्हा कृषि अधिक्षक, ठाणे, उपवन संरक्षक कार्यालय, ठाणे, सह. आयुक्त केंद्रीय व सेवा कर विभाग ठाणे, उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी, अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे, जिल्हा शैल्यचिकित्सक ठाणे, जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, सहायक अधिक्षक टपाल विभाग, ठाणे, न...

बालविवाह निर्मूलनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक अशा घटना दिसताच 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

Image
  ठाणे, दि.08(जिमाका) :- “ बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल, तर समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनास सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. अशा घटना दिसताच 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, ” असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजीक विकास ट्रस्ट (MSVT/SEVA) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे न्यायमूर्ती रविंद्र पाजणकर, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री.रामकृष्ण रेड्डी, श्रीमती पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी श्रीमती रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र केंद्र, विशेष बाल विकास पोलिस अधिकारी, चाईल्ड लाईन ठाणे, MSVT/सेवा संस्थेचे संस्थापक श्री.अशोक पवार, श्री.रामेश्वर भाले, वैभव गायकवाड प्र. माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, पोलीस प्रशास...