Posts

Showing posts from June, 2026

राज्यात पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण; १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना दारातच मिळणार आरोग्य सेवा

  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र राज्यातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना तात्काळ व गतिमान पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.      पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात गेल्या पाच वर्षांपासून ' १९६२ ' ही टोल-फ्री हेल्पलाइन सेवा यशस्वीपणे राबवली जात आहे. या हेल्पलाइनच्या अंतर्गत सुरू असलेल्या 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या दारातच मोफत आरोग्य सेवा पुरवली जात आहे.             या योजनेचा फायदा घेत आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर वेळेवर, सुलभ आणि विश्वसनीय उपचार करण्यात आले आहेत.             या उपक्रमाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर, पशुवैद्यकीय सेवा आणखी जलद आणि आधुनिक करण्यासाठी प्रशासनाने आता 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू केली आहे.  ...

ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 11 लाखांचे आंबे आणि साडेचार लाखांचा गुटखा जप्त, 37 जणांना अटक

    ठाणे,दि.1(जिमाका): अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट (नवी मुंबई परिसर) आणि इतर विविध भागांमध्ये ३० आणि ३१ मे २०२६ रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे.             उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलिन (Ethylene) सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित ठिकाणांवरून तब्बल ३,४५३ किलो आंब्याचा साठा जप्त करण्यात आला असून, या जप्त केलेल्या आंब्यांची एकूण किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये इतकी आहे.        ...

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 आज अखेर 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल मंगळवारी छाननी

Image
  ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.             आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. 00000000