घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाच्या अडचणी दूर होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
घोडबंदर मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होते. तसेच मिरा भाईंदर,
वसई-विरार या भागाला हा मार्ग ठाणे, नवी मुंबईशी जोडतो. मार्गाच्या रुंदीकरणात वन विभागाकडून
परवानग्या मिळत नसल्याने रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. मिरा-भाईंदर आणि ठाणेकरांच्या
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या
दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण व विकासकामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना-हरकत
दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर
केले असले, तरी विभागाने सुचविलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी
समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युऊर-बोरीवलीचे
उपसंचालक प्रदीप पाटील, सहायक वन संरक्षक सोनल वळवी, मयूर खुटवसे, इको फूट फॉरवर्डचे
हेड अमोल कुंभार, प्रकल्प अधिकारी सिध्देश सांगरे, प्र. माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे
उपस्थित होते.
0000000000

Comments
Post a Comment