भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा


भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
ठाणे दि. 29 (जिमाका): सततच्या पावसामुळे भातसाधरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे  भातसाधरणाचे पाच दरवाजे उघडण्यात येणार आहेत.भातसाधरणातून सुमारे 155 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जाणार आहे.भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल ,सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात येत आहेत.या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न  करण्याचा व दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न