14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
ठाणे दि.22 (जिमाका): महाराष्ट्र राज्य
विधी सेवा
प्राधिकरण , मुंबई यांचे
निर्देशानुसार जिल्हा
सत्र न्यायालय
, ठाणे व पालघर जिल्यातील
सर्व तालुका
न्यायालये , कौटुंबिक
न्यायालये , कामगार
न्यायालये , सहकार
न्यायालये, व इतर न्यायालयांमध्ये एन . आर
. बोरकर , प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधीश
ठाणे , यांच्या
मार्गदर्शनाखाली दि
. 14 सप्टेंबर रोजी
सकाळी १०
: ३० वाजता
राष्ट्रीय लोक अदालतीचे
आयोजन करण्यात
आले आहे
.
राष्ट्रीय लोक अदालतीचे दिवाणी
स्वरूपाची , फौजदारी
स्वरूपाची , वैवाहिक
स्वरूपाची , १३८
एन. आय.अॅक्ट (चेक
संबंधिची) अन्वये
दाखल झालेली
प्रकरणे, बँक
वसुली प्रकरणे,
मोटर अपघात
नुकसान भरपाई
प्रकरणे ,कौटुंबिक
वाद प्रकरणे
, कामगार विषयक
वाद , भूसंपादन
प्रकरणे , वीज
व पाणी
विषयक देयक
प्रकरणे, महसूल
प्रकरणे तसेच
दाखल पूर्व
प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी
ठेवण्यात येणार
आहेत.तरी
सर्व पक्षकारांना
आवाहन करण्यात
येत आहे
की आपण
या संधीचा
फायदा घ्यावा
व आपली
जास्तीत जास्त
प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी
ज्या न्यायालयात
प्रलंबित असतील
त्या न्यायालयाला
अर्ज करावा
.
तसेच दाखल
पूर्व प्रकरणाबाबत
जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण
ठाणे किंवा
तालुका विधी
सेवा समिती
यांच्याकडे अर्ज
करावा . तसेच
राष्ट्रीय लोकअदालतीबाबत
कोणतीही समस्या
असेल व कोणतीही चौकशी
करायची असल्यास
खालील नंबरवर संपर्क
साधावा .
वाशी
नवी मुंबई जिल्हा
ठाणे - ०२२-२७५८००८२, भिवंडी
- ०२५२२-२५०८२८,
कल्याण -०२५१-२२०५७७०, मुरबाड
- ०२५२४-२२२४३३,
शहापूर - ०२५२७-
२०७०७७६, उहासनगर
- ०२५१-२५६०३८८,
पालघर- ०२५२५-२५६७५४, वसई
-०२५०- २३२५४८५,वाडा-०२५२६-२७२६७२, डहाणू
-०२५२८-२२२१६०
,जव्हार ०२५२०-२२२५६५
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
, सेवा
सदन पहिला
मजला, जिल्हा
न्यायालय परिसर
ठाणे , येथे
येऊन प्रत्यक्ष
संपर्क किंवा
फोन नंबर
०२२-२५४७६४४१द्वारे
संपर्क साधावा
.सर्व प्रकरणे
सामंजस्याने सोडवण्याकरिता
राष्ट्रीय लोक अदालतीचा अवश्य लाभ
घ्यावा असे
आवाहन जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण
चे
सचिव एम
. आर देशपांडे
यांनी केले
आहे .
0000000
Comments
Post a Comment