ठाणे जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही

ठाणे जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही
ठाणे दि.4  (जिमाका):ठाणे जिल्हयात भाताची  लागवड  जास्त असल्याने सन 2019-20 या वर्षाकरीता ठाणे जिल्हासाठी एकूण 13290 मे टन युरीया खताची मागणी मंजुर झाली आहे.एकुण 13290 मे टन युरिया खताच्या मागणी पैकी ठाणे जिल्हृयात आज अखेर राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टीलायझर्स मार्फत 7228.22 मे.टन कृभको मार्फत 360 मे.टन आणि झुआरी मार्फत 78 में टन  असा एकुण 7666.22 मे.टन युरिया खताचा पुरवठा वितरणाकडे झाला आहे.

शेतकऱ्यांना 100 टक्के युरीया खत पुरवठयाचे नियोजन करण्यात  आले आहे.तसेच सुफला या खताचा पुरवठा वितरकांकडे झाला आहे.जिल्हात खताचा साठा पुरेसा आहे.शेतकऱ्यांनी युरीया तुटवडयाबाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  अंकुश माने व कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांचेकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन