गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये
ठाणे,दि.05(जिमाका):- ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि.4 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यातील वाहतूक कोंडीसंदर्भात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार, दि.4 ऑगस्ट रोजी ठाणे घोडबंदर रोडवरील गायमुख घाटामध्ये होणाऱ्या वाहतूक समस्येबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात तात्काळ स्थळपाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम, तहसिलदार उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे, शाखा अभियंता प्रसाद सनगर व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्थळपाहणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्र...

Comments
Post a Comment