Posts

Showing posts from March, 2020

शेअर प्रवासी वाहतूकीवर बंदी

Image
                                ठाणे दि. 20 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात   टाळण्यासाठी शेअर रिक्षा , शेअर ओला , शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे   आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. शेअर रिक्षा , शेअर ओला , शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप मधुन सर्व सामान्य प्रवासी शेअरींगव्दारे शहरांतर्गत व ग्रामीण भागात ये-जा करत असतात , त्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान कोरोना विषाणू        ( COVID-19) या प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतुक करणारी वाहने जसे “ शेअर रिक्षा , शेअर ओला , शेअर उबर व ग्रामीण भागातील काळ्या-पिवळ्या जीप ही प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने इत्यादी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्यात यावीत , असे आदेश दिले आहेत. सदर आदेशा...

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे   ,   दि.   17 (जिमाका) :   ठाणे जिल्ह्यात     कोरोना ‍विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रभावी     उपाययोजना व जनजागृती करीत आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.     सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन ठाणे     जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी     केले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक असेल तरच प्रवास करावा.   खासगी कंपन्यांमार्फत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम संकल्पनेनुसार परावानगी देण्यात येत आहे.   नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी मिशनमोडवर काम सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्च पर्यंत रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट ,   अंगठा लावण्याची आवश्यकता नाही. तसेच रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत संबधित विभागाला सूचना दिल्या आहेत. याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण...

31 मार्च पुर्वी वाहनाची नोंदणी करण्याचे आवाहन

   ठाणे दि.1 3 ( जिमाका):   देशभरात भारत स्टेज-6 मानांकन नसलेली वाहने विक्री व नोंदणी करण्यास मनाई केली आहे. भारत स्टेज-4 मानांकनाची वाहने खरेदी केली असल्यास त्यांची नोंदणी   दि .31 मार्च 2020 पुर्वी होऊन त्यांना नोंदणी क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. भारत स्टेज -4 मानांकनाची वाहने दि. 31 मार्च 2020 पुर्वी नोंदणी न झाल्यास रस्त्यावर वापरता येणार नाहीत. दि 31मार्च 2020 रोजी वा त्यापूर्वी होणारी गर्दी पाहता तसेच ऐनवेळी कागदपत्रात काही त्रुटी उद्भवण्याची शक्यता पाहता वाहन मालकांनी त्यांची वाहने ताबडतोब नोंदणीसाठी सादर करावीत.           यापूर्वी खरेदी केलेल्या काही वाहनांच्या बाबातीत कागदपत्रातील त्रुटीमुळे अथवा कोणत्याही कारणाने नोंदणीची प्रक्रिया   अपूर्ण राहिली असल्याची शक्यता आहे.   केवळ शुल्क व कर भरल्यामुळे नोंदणी प्रक्रीया पुर्ण होत नाही तर वाहनास नोंदणी क्रमांक जारी झाल्यावरच सदर प्रक्रीया कायदेशिररित्या पूर्ण होते.           सर्व वाहन धारकांनी त्यांच्या मा...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा मंडळांचा निर्णय

ठाणे दि.1 3   ( जिमाका):    करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून तसेच सार्वजनिक हिताच्या व आरोग्याच्या दृष्टीने     गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रा रद्द कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी    स्वागतयात्रा संयोजकांना केले होते. या आवाहनाला सर्व आयोजकांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून यंदा शोभायात्रा अथवा अन्य कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे मान्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व    स्वागतयात्रा आयोजक मंडळे ,   प्रवासी कंपनी ,   मॉल्स चालक ,   चित्रपट गृहे ,   नाट्यगृह यांचे मालक यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला आ. गणपत गायकवाड अपर पोलीस आयुक्त    अनिल कुंभारे , निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील ,   उपायुक्त बाळासाहेब पाटील ,   अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार ,   जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. मनीष रेंगे आदी उपस्थित होते. या बैठकी...

ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू -- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे दि ११ -- ठाणे जिल्ह्यात ‛ कोरोना ' व्हायरसचा   संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी   जिल्ह्यामध्ये आजपासून   ‛ आपत्ती व्यवस्थापन कायदा ' लागू केल्याची घोषणा केली आहे. ठाणे जिल्हा मुंबई शहरालागत असल्यामुळे अनेक पर्यटक ठाणे जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा   फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे   जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार , जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक   विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या...

घाबरू नका पण सतर्क रहा ---जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Image
            ठाणे   ,   दि.6जिमाका :     ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही तसेच एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही.     या विषाणूचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पुरेशी खबरदारी घेतली आहे.   सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर   आयोजन करणे टाळा.   घाबरू नका   पण सतर्क रहा   असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.   कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील   मेडिकल असोसिअशनचे   पदाधिकारी यांची   संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी   कोरोनासंदर्भात नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही    आणि उपाययोजनांबाबतचा आढावा   घेतला. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन   सज्ज असून जिल्हा रुग्णालये , जिल्हापरिषद आरोग्य विभाग , तसेच महान...