आदिवासी बांधवाच्या समस्या तात्काळ सोडवा -मंत्री के.सी.पाडवी.

 


 ठाणे दि.24 (जिमाका): आदिवासी  घटकासाठी अनेक योजना सरकारकडून राबविल्या जातात.त्या योजना  ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत व आदिवासी बांधवाना त्याचा लाभ भेटला पाहिजे.त्यांसाठी त्याच्या समस्या तात्काळ सोडवा असे प्रतिप्रादन आदिवासी  विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी आदिवासी विकास योजनाची आढावा बैठक  समिती सभागृह जिल्हाधिकारी  कार्यालय येथे केले.

यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त ठाणे  ग्रामीण, डॉ.शिवाजी राठोड,संबधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री  पाडवी यांनी तालुका निहाय आदिवासी योजनाचा आढावा घेतला व  समस्या जाणून घेतल्या.आदिवासी भागात जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे विद्यार्थांना योजनाचा लाभ मिळत नाही त्यामुळे आदिवासी भागात जातीच्या दाखल्यासाठी कॅप आयोजीत करा असे निर्देश संबधिताना दिले.

आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा  शेतीविकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टिने उपलब्ध असलेल्या  साधनांचा व उर्जेचा पुरेपूर उपयोग करुन आदिवासी भागात जे उत्पादन होते त्याच्या उत्पादनाचे मार्केटींग करणे गरजेचे आहे .वंदन केंद्र शहापूर ,यांनी आदिवासी भागात  केलेल्या कामाचे कौतूक केले.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन