Posts

Showing posts from September, 2020

आंतरजिल्हा वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेस यांनी अंमलात आणावयाची मानक कार्यपद्धती

ठाणे दि. 10 (जिमाका): परिवहन आयुक्त कार्यालयाकडून कोव्हीड १९ महामारी च्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्यात आलेली आहे. सदर वाहतूक करताना खाजगी प्रवासी बस मालकांनी   खालील मानक कार्यपद्धती अमलात आणावी. खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हीड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेचपरिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतत पालन करावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम , १९८९ च्या नियम २० (१) ( x ) मधील तरतूदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय , चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच , सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क , सॅनिटायझरचा   वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.   मास्क परिधान न कलेल्या प्रवाशांना बसमध्...

जिल्हा सैनिक कार्यालायाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत

    ठाणे दि. 10 (जिमाका): मराठा लाईट इंफंट्री बटालियनच्या मुंबई विभागात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांच्या तर्फे कोविड-१९ च्या संकट काळात मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. ५१ , ०००/- (रुपये एकवन्न हजार मात्र) रकमेचा धनादेश दि. ०३ सप्टेंबर २०२०   रोजी   जिल्हाधिकारी , ठाणे राजेश नार्वेकर यांच्याकडे   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , ठाणे मेजर प्रांजळ जाधव, १४ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे माजी सैनिक सुभेदार मनोहर शिर्के, सुभेदार विष्णू गायकवाड , सुभेदार विजय शिंदे व हवालदार दत्ताराम उतेकर यांच्या उपस्थीतीत सुपूर्द करण्यात आला .

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी 15 सप्टेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे दि.10 (जिमाका):केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याणपुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार सन २०२१ व बालकल्याण पुरस्कार २०२१ करिता केद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in हया संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत सदर पुरस्काराची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक १५ सप्टेबर२०२० पर्यत आहे. बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण कला , सांस्कृतिक कार्य , खेळ नाविन्यपुर्ण शेाध , सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुण कामगिरी केलेली आहे , त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार : वैयक्तीक पुरस्कार : मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान ७ वर्षे काम करण्या-या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावर : बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो संस्था पुर्णतः शासनाच...

केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली आर्थिक मदतीचे प्रस्ताव ऑनलाईन पाठविण्याबाबत.....

  ठाणे दि. 10 (जिमाका): माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा यांच्या (हवलदार पदापर्यंत) पाल्यांकरीता केंद्रीय सैनिक बोर्ड , नवी दिल्ली यांचेकडून सन २०२०-२१ करीता RMDF/AFFDF मधून आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. सदर आर्थिक मदतीसाठी ( www.ksb.gov.in ) ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर   यांनी केले आहे. आर्थिक मदत निकष - चारितार्थ अर्थिक मदत वय वर्ष 65 व पुढील पेंशन नसलेले माजी सैनिक विधवा रु 48000/- रुपये   सन 2020-21 अंतिम मुदत 1 मार्च 2021 अशी आहे.शालेय शिक्षण आर्थिक मदत पहिल्या 2 पाल्यांस रु.12000/-प्रतिवर्ष प्रतिपाल्य-1 ली ते 9 वी व 11 वी च्या पाल्यांनी 30 स्प्टेंबर 2020 पर्यंत अर्ज करावे.10   वी व 12 वी यांनी   30 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे . बी.ए/बीएसी/बी कॉम यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे. मुलीच्या लग्नाची आर्थिक मदत दोन मुलींसाठी प्रत्येकी रु.50000/- रुपये विवाहाच्या   तारखेनंतर 180 दिवसांच्या आत अर्ज करावे.अंत्यविधी आर्थिक मदत रु.5000/- मृत्यू दिनांकानंतर 01 वर्षाच्या आत अर्ज करावे.अनाथ मुलासाठी आर्थिक...

केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा.- खा. कपिल पाटील

  ठाणे   दि. १०- ठाणे जिल्ह्य़ात   केंद्र शासनाच्या   योजनांचा लाभ अधिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाने योजनेची प्रभावी आणि गांभीर्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश    दिशा समितीचे अध्यक्ष खा. कपील पाटील यांनी दिले. केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेणे व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती (दिशा) यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज समिती   सभागृहात अॉनलाईन पद्धतीने घेण्यात आली.   यावेळी खा. श्रीकांत शिंदे ,   जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , जिप मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे , प्रकल्प संचालक डॉ रूपाली सातपुते आदी उपस्थित होते.   या बैठकीत   प्रधानमंत्री सडक योजना , प्रधानमंत्री आवास योजना , स्मार्टसिटी , स्वच्छ भारत मिशन , प्रधानमंत्री फसल विमा योजना , कृषी विकास योजना , दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना , अमृत योजना , यांसह केंद्र शासनाच्या एकुण ३० योजनांचा आढावा घेण्यात आला. या   योजनांची सद्यस्थिती तसेच अंमलबजावणीची   माहित...

माझे कुंटुब माझी जबाबदारी ही मोहिम प्रभावीपणे राबवा - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

  नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधुनिक आर.टी.- पी.सी.आर. चाचणी व निदान प्रयोगशाळा , 6 कोव्हीड सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण माझे कुंटुब माझी जबाबदारी ही   मोहिम प्रभावीपणे राबवा -   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठाणे दि. १०(जिमाका): राज्यशासनातर्फे आरोग्याच्या मोठया प्रमाणात सोयी सुविधा निर्माण   करण्यात येत आहेत. या सुविधेचा दर्जा उत्कृष्ट असुनही याबाबत जनतेच्या मनात साशंकता   आहे.या सर्व जम्बो सुविधांबाबत जनतेच्या मनात विश्वासार्हता   वाढविण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी   प्रयत्न करावेत.तसेच   माझे कुंटुब माझी जबाबदारी ही   मोहिम प्रभावीपणे राबवावी असे प्रतिपादन   मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या   आत्यधुनिक प्रयोगशाळा तसेच सहा कोविड सेंटर्सचे   ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते   करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.   या कार्यक्रमास नवी मुंबई येथे   पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , खासदार राजन विचारे , मनपा आयुक्त अभिजित बांगर , नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीन...