बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी 15 सप्टेबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे दि.10 (जिमाका):केंद्र
शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याणपुरस्कार
दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार सन २०२१ व बालकल्याण पुरस्कार २०२१ करिता केद्र
शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in हया
संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत सदर पुरस्काराची माहिती
सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक १५ सप्टेबर२०२०
पर्यत आहे.
बाल शक्ती
पुरस्कार : ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या)
शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ
नाविन्यपुर्ण शेाध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात
विशेष नैपुण्यपुण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार
दिला जातो.
बालकल्याण
पुरस्कार :
वैयक्तीक
पुरस्कार : मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात
कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान ७ वर्षे
काम करण्या-या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो.
संस्था
स्तरावर : बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला
हा पुरस्कार दिला जातो संस्था पुर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी. बालकल्याण
क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपुर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.असे आवाहन
जिल्हा महिला व बाल विकास परिविक्षा अधिकारी ठाणे संदिप परदेशी
यांनी केले आहे.
Comments
Post a Comment