"ताउत्के" चक्रीवादळाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी

 


ठाणे दि.18 :- "ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी सकाळ पासून जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.

  या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत  ठाणे तालुक्यात एक जणांचा मृत्यू व  चार जखमी झालेत . मिरा भाईदर मध्ये एक मृत्यू झाला असून . उल्हासनगर मध्ये एका मृत्यूची नोद झाली आहे व एक जखमी झाले आहे.

तसेच भिवंडी तालुक्यात  एक घर व अंबरनाथ तालुक्यात  पाच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”