"ताउत्के" चक्रीवादळाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी

 


ठाणे दि.18 :- "ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी सकाळ पासून जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.

  या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत  ठाणे तालुक्यात एक जणांचा मृत्यू व  चार जखमी झालेत . मिरा भाईदर मध्ये एक मृत्यू झाला असून . उल्हासनगर मध्ये एका मृत्यूची नोद झाली आहे व एक जखमी झाले आहे.

तसेच भिवंडी तालुक्यात  एक घर व अंबरनाथ तालुक्यात  पाच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न