राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

ठाणे,दि.21(जिमाका):- महाराष्ट्र शासनातर्फे दि.22 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेदरम्यान शासकीय, NGO व खाजगी व्यावसायिक यांच्यामार्फत राज्यात एक लक्ष मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी मोतीबिंदू सर्वेक्षण शिबिरे व शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून नजीकच्या शासकीय रुग्णालयात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न