Posts

Showing posts from February, 2020

संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पोहचवा -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Image
ठाणे दि. 21 जिमाका : संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरीता सकारात्मक प्रभावी माध्यम असुन या माध्यमाच्या द्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले संस्कृती आर्ट फेस्टीवल चे संचालक तथा आमदार प्रताप सरनाईक   यांनी उपवन येथे   गायक कैलास खैरे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी अन्न ,नागरी पुरवठा   व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,ठाणे महापौर नरेश म्हस्के,आमदार प्रताप सरनाईक,विभागीय आयुक्त शिवाजी दौड,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिवाजी राठोड,आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. संगीत व गीत ऐकल्याने दैनदिंन तान तनाव कमी होते.या संगीताचा उपयोग सकारात्मक संदेश जनतेमध्ये पोहचविल्यावर जनता त्यावर सकारात्मक प्रतिसाद देते असेच   स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविण्याचे काम   या संगीताच्या माध्यामातून संस्कृती आर्ट फेस्टीवल करणार आहे. देशातील गावामध्ये सुध्दा स्वच्छेचा संदेश पोहचला असून त्यामुळे कुटुबाच्या आरोग्...

पहिली बाष्पक परिषद बाष्पक क्षेत्राशी संबंधीत सर्वाना उपयुक्त ठरेल

Image
ठाणे दि. 21 जिमाका : राज्य सरकारच्या बाष्पक संचालनालयामार्फत देशात प्रथमच बाष्पक परिषद होत आहे.ही परिषद बाष्पक क्षेत्राशी संबंधीत सर्वाना उपयुक्त ठरेल असा विश्वास   कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.   या परिषदेच्या उद्घाटन श्री वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.     यावेळी   संचालक , बाष्पके संचालक   धवल   अंतापूरकर , कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर , सचिव केंद्रीय बाष्पके मंडळ नवी दिल्ली श्री. टि. एस. जी. नारायण , प्रधान सचिव कामगार राजेश कुमार , विवेक भाटीया उन्नी कृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.   बाष्पके तपासणीला सुरवात होवून 15 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन वाशी येथिल सिडको भवन येथे   करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील   कंपन्यांनी   सहभाग घेतला आहे. तर चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी देश विदेशातील वक्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी बोलतांना   श्री वळसे पाटील म्हणाले बाष्पकेंचा वापर होत असताना त्याबाबतीतले पुरेपुर ज्ञान   आवश्यक आ...

नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी मुद्दत वाढ

        ठाणे दि.18 जिमाका : भारत निवडणूक आयोगाने दि . 01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून सदर कार्यक्रमास मुदतवाढ दिलेली आहे . सदर कार्यक्रमांतर्गत   दिनांक 13 मार्च , 2020 ते   दिनांक 15 एप्रिल ,2020 पर्यंत ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून दिनांक 30 एप्रिल , 2020   रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे . सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक 15 मे , 2020 रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येणार आहे .               तसेच शनिवार दि. 28 मार्च , 2020 , रविवार दि . 29 मार्च 2020 व शनिवार दि . 11 एप्रिल 2020 , रविवार दि . 12 एप्रिल , 2020 या दिवशी ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्यात येणार आहे . ...

1 मार्च पासून दिव्यांग उपकरण शिबीराचे आयोजन

ठाणे दि.१७ जिमाका: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आयोजित तथा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, एम.एल.ए. हॉस्टेल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ ते ०७ मार्च २०२० रोजी एम.एल.ए. हॉस्टेल, नागपूर येथे दिव्यांग उपकरण चिन्हीकरणाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.     सदर शिबीरामध्ये दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कैलीपर्स, कृत्रिम जयपूर पाय-हात, कुबड्या, शुज, बेल्ट, कानाचे मशीन या सर्व उपकरणाचा समावेश असणार आहे व लाभार्थ्यांना विनामुल्य या उपकरणांचा लाभ घेता येणार आहे.     सदर शिबीराचा लाभ घेण्याकरिता इच्छूक लाभार्थींनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे येथे दि. २२ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे, एम.आर.देशापांडे यांनी केले आहे. 00000

ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्याचे अभिनंदन

Image
ठाणे दि. १२ -- राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.   या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रीमंडळाचे अभिनंदन ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र राज्यपत्रित अधिकारी महासंघाचे ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांना पुष्पगुच्छ देवून सर्वांनी अभिनंदन केले. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील.     यासोबतच दररोज 45 मिनिटाचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारी पासून होईल. यावेळी उप अध्यक्ष ठाणे जिल्हा समन्वय समिती डॉ. अविनाश भागवत , सचिव   तथा शिक्षणाधिकारी साहेबराव बढे , सदस्य जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे , जनसंपर्क अधिकारी संगीता पवार कोषाअध्यक्ष तथा नायब तहसिलदार सिंधू खडे , महेंद्र सावत यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबईसह सर्व कार्यालयांसाठी एकच ...

शनिवारी निवृत्तीवेतन धारकांचा त्रैमासिक मेळावा

ठाणे दि ११. जिमाका :     ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने निवृत्तीवेतन धारकांकरीता   त्रैमासिक मेळावा दि.१५ फेब्रुवारी रोजी स.११ वा जिल्हा कोषागार कार्याल ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

धनगर समाजातील विद्यार्थांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

धनगर समाजातील विद्यार्थांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना   ठाणे दि.११ जिमाका:     समाज कल्याण विभागाच्यावतीने धनगर समाजातील विद्यार्थ्यां करिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामधील इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वस्तीगृहामध्ये   प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती – क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी भोजन भत्ता २५ हजार रुपये , निवास भत्ता १२ हजार रुपये व निर्वाह भत्ता ६ हजार रुपये असे एकूण ४३ हजार रुपये रक्कमेचा लाभ व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे .           तरी या योजनेचा लाभ घेण्याकरिता इयत्ता १२वी नंतरच्या मान्यतप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश घेतलेला असावा , विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेवरच केली...