Posts

विशेष लेख क्र.07 - एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन

Image
आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्ग केंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पाहणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज उत्तरं सापडत नाही. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहेत किंवा अंतर्गत व बाह्य संघर्षात गुरफटले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, देश देखील अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत, एका दूरदर्शी विचारवंताने एकात्म मानवतावाद या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते. परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट केले की...

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

Image
कॉपीमुक्त ठाणे करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्राद्वारे आवाहन   ठाणे,दि.10(जिमाका):-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इ.12 वी व इ. 10 वी परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात, यासाठी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांकरिता आपल्या आवाहनात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले आहेत की, तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश...

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ

Image
शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य   ठाणे,दि.10(जिमाका):-  सामान्य प्रशासन विभागाच्या दि.13 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा दिला असून त्यात मुद्दा क्रमांक 2 मध्ये नागरिकांना दैनंदिन जीवन सुकर व्हावे, याकरिता सातत्याने प्रयत्न करावेत, असे नमूद आहे. त्यानुषंगाने नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सेवा त्यांना एक छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी दि.9 फेब्रुवारी 2025 पासून एकाच छत्राखाली विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेंतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे शक्य होणार आहे. या सर्व सेवा शासनमान्य आधारकेंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र येथे नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहेत. (संबंधित केंद्रांची यादी सोबत जोडली आहे) तरी, जिल्ह्यातील गरजूंनी ...

एसटी कर्मचाऱ्यांनी " प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा " समजून काम करावे..! - उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मौलिक सल्ला

Image
  ठाणे,दि .09 (जिमाका :- एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी   " प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!" समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील   नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा -मोहरा बदलून " फाईव्ह स्टार " परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे.     मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC...

“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” “जनसामान्यांची सेवा हाच धर्म”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  ठाणे,दि.09(जिमाका):-   हे शासन सर्वसामान्यांचे असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी “ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ” आणि “ जनसामान्यांची सेवा हाच धर्म ” या तत्वांवर चालणारे असून   नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.             सार्वजनिक आरोग्य विभाग वतीने 6 डे-केअर किमोथेरपी सेंटर (ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व वर्धा) उभारण्यात येणार असल्याची घोषणा आणि कर्करोग मोबाईल व्हॅन-8, 102 रुग्णवाहिका-384, सीटी स्कॅन-2, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका-7, डिजिटल हँड हेड एक्स-रे मशिन-80 चा लोकार्पण सोहळा जिल्हा नियोजन भवन सभागृह, येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.              यावेळी आयुष मंत्रालय तसेच स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प...

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

    ठाणे,दि .07 (जिमाका :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि.११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दि.२१ फेब्रुवारी २०२५ ते दि.१७ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. १) ९०११३०२९९७, २) ८२६३८७६८९६,   ३) ८७६७७५३०६९, ४) ७३८७४००९७०, ५) ९९६०६४४४११ ६) ७२०८७७५११५,   ७) ८१६९२०२२१४,   ८) ९८३४०८४५९३,   ९) ८३२९२३००२२, १०) ९५५२९८२११५. वरील भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा काला...

मनोधैर्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य घेवून साक्ष फिरविणाऱ्या महिलेवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे कडून वसुलीची कारवाई

  ठाणे,दि.07(जिमाका :-   बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पीडित महिला न्यायालयात फितूर झाल्याने शासनाकडून मिळालेली एक लाख रुपयांची मदत तिला परत करावी लागणार आहे. बलात्कार पीडित म्हणून पुनर्वसनासाठी शासनाकाकडून तिला ही मदत देण्यात आली होती. मात्र तिच्या फितूरीमुळे आरोपीची निर्दोष सुटका झाल्याने तिला दिलेली रक्कम आता परत घेतली जाणार असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तशी तिला नोटीस पाठवण्यात आली आहे. कल्याण येथील 40 वर्षीय (घटना घडली तेव्हाचे वय) महिलेचे पती मनोरुग्ण होते. या कारणाने तिने उपचारासाठी त्यांना ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात 2017 मध्ये दाखल केले होते. या संधीचा फायदा घेऊन तिच्या दिराने घराच्या हिश्श्यावरून तिच्याशी हुज्जत घातली आणि घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला. कोणाकडे वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याबाबत तिने कल्याण पोलीस ठाण्यात दिराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेला शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ व्हावा, यासाठी पोलिसांमार्फत हे प्रकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्यात ...