Posts

Showing posts from May, 2020

कोव्हीड संशयित रूग्णांस दाखल करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर होणार कायदेशीर कारवाई – महापालिका आयुक्त

  ठाणे दि . 30:- शहरातील नॅान कोव्हीड खासगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड संशयित रूग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच रूग्णालयाच्या संचालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे .             कोणतेही रूग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देवू शकत नाही असे राज्य शासनाचे निर्देश आहेत . त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कोव्हीड संशयित सिमटोमॅटीक रूग्णांना खासगी नॅान कोव्हीड रूग्णालयात दाखल करून घेणेबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे .             या आदेशानुसार शहरातील नॅान कोव्हीड रूग्णालयांनी कोव्हीड संशयित रूग्ण दाखल झाल्यास त्याच्या प्रकृती स्वाथ्यानुसार आणि रूग्णालयात दाखल करून घेण्याची आवश्यकता असल्यास आयसोलेशन वॅार्डमध्ये दाखल करून घ्यावे . सदर रूग्णावर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आश्यकता वाटली तर त्याचे स्वॅब कोरोना कोव्हीड तप...

मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडा बनविणार १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल-पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, आयुक्तांनी केली पाहणी

  ठाणे दि .२९:-   मुंब्रा येथील ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल उभा करण्यात येणार असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली.   भविष्यात कोरोना कोव्हीड १९ रूग्णांना बेडस् उपलब्ध व्हावेत यासाठी शहरामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआऱडीएच्यावतीने 1000 बेडसचे कोव्हीड 19 रूग्णालय उभारण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून लवकरच ते रूग्णालय कार्यान्वित होणार आहे . तथापि भविष्यातील गरज लक्षात घेवून मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत महानगरपालिकेच्या कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्यावतीने 1000 बेडसचे कोव्हीड रूग्णालय महाडाच्यावतीने उभे करण्यात येत आहे . या कोव्हीड 19 ॲाक्सीजनची सुविधा असलेले 500 बेडस् निर्माण करण्यात येणार आहेत तर 100 बेडसचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहे . राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना . एकनाथ शिंदे , राज्...

रुग्णालयात दाखल करुन न घेणाऱ्या तसेच भरमसाठ पैसे उकळणाऱ्या मुंब्र्यातील तीन रुग्णालयांवर गुन्हा दाखल

  ठाणे दि. 29 : मुंब्रा परिसरात कोविड 19 चे रुग्ण वाढत असताना अशा रुग्णांना रुग्णालयात जागा नाही असे सांगून दाखल करुन न घेणाऱ्या, तसेच गरीब आजारी लोकांना व प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांकडून भरमसाठ पैसे सांगणाऱ्या मुंब्र्यातील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             मुंब्रा प्रभाग समिती मधील बिलाल रुग्णालय , प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयामध्ये   गरीब व आजारी रुग्णांना दाखल करताना , तसेच   महिलांना प्रसुतीसाठी दाखल करताना भरमसाठ पैसे भरा असे   सांगितले जात होते , तसेच रुग्णालयात बेड शिल्लक असताना देखील प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या . सध्या कोविड 19 चे रुग्ण वाढत असताना   रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करुन घेण्याबाबत रुग्णालयांना विनंती करण्यात आली होती तसेच नोटीसही बजावण्या...

क्वारंटाइन सेंटरमधील रहिवाशांची गैरसोय खपवून घेणार नाही - पालकमंत्री एकनाथ शिंदे

  ठाणे दि 29 :-   करोनाविरोधातील मुकाबल्यात आपण सर्वच एकदिलाने काम करत आहोत . करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या संशयित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटर्सही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत . मात्र , या ठिकाणी दाखल केलेल्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही , याची काळजी ठाणे महापालिकेने घ्यायची आहे . याबाबतच्या तक्रारी खपवून घेणार नाही , अशी सक्त ताकीद ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली . करोनाविरोधातील लढाईत श्री . शिंदे स्वत : रस्त्यावर उतरून प्रशासकीय यंत्रणेचे नेतृत्व करत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी त्यांनी स्वत : पीपीई किट घालून जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात जाऊन करोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला होता . श्री . शिंदे यांच्या या एका कृतीमुळे प्रशासकीय यंत्रणा तसेच करोनाबाधित रुग्णांमध्येही नवी उमेद निर्माण होऊन करोनाविरोधातील लढाई अधिक तीव्र झाली आहे . कोव्हिड रुग्णालये व क्वारंटाइन सेंटर येथील रुग्ण व संशयितांना उत्तम आहार मिळणे , तेथील बेड , गाद्या , उश्या , चादर...

क्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा ना. शिंदे, ना. डॅा. आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलिस आयुक्तांना सूचना

 ठाणे (28):-  ठाणे शहरात महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्स तसेच आयसोलेशन सेंटर्समधून सध्या तक्रारी प्राप्त होत नाहीत ही समाधानाची बाब असली तरी भविष्यात या सेंटर्समधून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत मंत्री मंत्री द्वयांनी यावेळी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना सूचित केले. दरम्यान यावेळी जे-जे निर्णय बैठकित घेतले गेले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी या अशा सूचना महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी केल्या. ठाणे शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना बाधितांच् ‌ या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री ना . एकनाथ शिंदे आणि नाय डॅा . जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती . शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे . पण अशावेळी जे गंभीर स्वरूपाचे रूग्...

पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी पालिकेने उपलब्ध केली 81 रूग्णवाहिकांची सुविधा

ठाणे दि.28 :- कोरोना कोव्हीडचे संकट वाढत असताना रूग्णालयांमध्ये, क्वारंटाईन सेंटर्स आणि आयोसोलेशन सेंटर्समध्ये नेण्यासाठी रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून महापालिकेने निर्माण केलेल्या रूग्णवाहिकांची आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून समाधान व्यकत केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते.       सुरूवातीच्या काळात रूग्णवाहिकांमुळे नागरिकांची गैरसोय झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना. शिंदे यांनी त्वरीत मोठ्या प्रमाणात रूग्णवाहिका भाड्याने घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर जवळपास 81 रूग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आणि त्यांचे नियोजन करण्यासाठी 24 तास स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला.       महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या रूगणवाहिकांमध्ये महापालिकेच्या 3 कार्डियाक, 2 खासगी कार्डियाक रूग्णवाहिका आहेत. तसेस 14 परिवहन बस रूग्णवाहिका, 15 खासगी शाळा बस रूग्णवाहिका, रूग...

आता खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त

  ठाणे दि. 24:- नौपाडा कोपरी प्रभाग समितीतंर्गत नागसेन नगर, खारटन आणि चेंदणी कोळीवाडा येथे कोराना कोव्हीड 19 ची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार आता नागसेननगर आणि खारटन रोड येथे कोव्हीड वॅारियर्स नेमण्यात आले आहेत. दरम्यान शहरामध्ये जवळपास 600 पेक्षा जास्त कोव्हीड वॅारियर्स गस्तीवर आहेत.      महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोव्हीड वॅारियर्स   नेमून त्यांच्यामार्फत नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे , त्या परिसरात कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का याची माहिती घेवून त्यांना तेथील फिव्हर ओपीडीमध्ये जाण्यास प्रवृत्त करणे आदी कामगिरी करवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत .      त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी परिमंडळ उपायुक्त संदीप माळवी आणि नौपाडा - कोपरी सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रणाली घोंगे , कार्यकारी अभियंता प्रदीप घाटगे यांनी नागसेननगर , खारटन रोड येथे भेट देवून या सर्व कोव्हीड वॅारियर्सना आवश्यक त्या सूचना दिल्या .      दरम्यान चंदणी कोळ...

दिलासादायक बातमी ठाणे जिल्ह्यात २ हजार ७७रुग्णांचा कोरोनावर विजय

  ठाणे दि. २३-   ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरीही आजअखेर पर्यत   तब्बल २ हजार ७७ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला   आहे. ही ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बातमी आहे. विजयी विरांमध्ये नवजात बालकापासुन ९१ वर्षाच्या आजीपर्यतच्या सर्वाचा समावेश आहे. ठाणे   जिल्ह्य़ातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या   प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल ३० हजार ३३४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील २२ हजार ९६२जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर   ५ हजार ३८८   जण कोरोनाग्रस्त झाले होते . तर आज अखेरपर्यंत १६३ जणांचे मृत्यू झाले आहेत.   आज अखेर    ठाणे जिल्ह्यात ३ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हम होंगे कामयाब ही भावना ठेवुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर   सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित रहावी   यासाठी   सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. ...

थायरोकेअर लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी असमाधानकारक कोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेचा निर्णय

ठाणे दि. 22 :-   थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हीड 19 च्या स्वब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे. ठाणे शहरात कोरोना कोव्हीड - १९ची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हीड - १९ची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते . थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती . परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले . यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले होते . त्यामुळे २२ मे २०२० पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅब गोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत . कोविड चाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यातआला आहे . --

पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली प्रस्तावित क्वारंटाईन सेंटर्स आणि न्यू होरायझन स्कूल सेंटर्सची पाहणी

  ठाणे दि . 19:-   राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना . एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या क्वारंटाईन सेंटर्सची तसेच न्यू होरायझन स्कूल येथे कोरोना कोव्हीड 19 ची लक्षणे नसलेल्या बाधित रूग्णांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सेंटर्सची पाहणी केली . यावेळी त्यांच्यासमवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल होते .       प्रारंभी ना . शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयास भेट दिली . ज्ञानसाधना महाविद्यालय येथे महापालिकेच्यावतीने जवळपास 350 ते 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे . या सेंटर्सची पाहणी करून त्यांनी त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची तात्काळ पुर्तता करण्याच्या सूचना दिल्या . याठिकाणी तात्पुरती शौचालये निर्माण करून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसौय होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले .      ज्युपिटर हॅास्पीटल जवळ महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझामध्येही जवळपास 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत से...

क्वारंटाईन सेंटर्सची क्षमता वाढवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड-19 चे नियोजन करा आढावा बैठकीत पालकमंत्री ना. शिंदे यांच्या सूचना

            ठाणे दि . 18 :- कोरोना कोव्हीड 19 ची वाढती संख्या लक्षात घेवून ठाणे शहरामध्ये आपल्याला क्वारंटाईन सेंटर्सची क्षमतावाढविण्याची गरज व्यक्त करून पावसाळा तोंडावर आला असल्याने त्यादृष्टीकोनातून कोव्हीड 19 चे नियोजन करा अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्रीना . एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना दिल्या .        कोरोना कोव्हीड 19 ची आढावा बैठक ना . शिंदे यांनी आज महापालिका मुख्यालयामध्येआयोजित केली होती . त्या बैठकीत ते बोलत होते . यावेळी बोलताना त्यांनी मुंब्रा , किसननगर , सीपी तलाव , लोकमान्यनगर , राबोडी आदी दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी असलेल्या परिसरात जास्तपाळत ठेवून याचा प्रादूर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनादिल्या .                                    ...

'माझा प्रभाग…कोरोनामुक्त प्रभाग' या भव्य स्पर्धेचे आयोजन

विजयी प्रभागासाठी मिळणार 50 लाखाचा निधी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची संकल्पना नगरसेवकांनी पुढाकार घेण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन ठाणे दि 18 :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'माझा प्रभाग…कोरोनामुक्त प्रभाग' या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गेल्या पंधरा दिवसांत प्रभाग समिती क्षेत्रात कोणताही नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद न होणे आणि सध्याचे बाधित रूग्ण निगेटिव्ह होवून डिस्चार्ज झाल्यास अशा प्रभाग समितीस विकासकामासाठी 25 लक्ष रूपयांचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे तर एक महिन्याच्या कालावधीत नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद न होणे आणि असलेले बाधित रूग्ण बरे होवून डिस्चार्ज झालेल्या प्रभाग समितीस विकास कामासाठी 50 लक्ष रूपयांचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.       आपला प्रभाग आणि पर्यायाने आपले शहर कोरोनामुक्त व्हावे यासाठी प्रत्येक नागरिकांचा, स्वयंसेवी संस्था, मंडळे यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा असे आव...

दिल्लीहून विशेष रेल्वेने विद्यार्थ्यांचे आगमन

ठाणे दि. 18 :- महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी   दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन कल्याण   रेल्वे स्टेशन येथे काल रात्री   १०.४०   वाजता पोहोचली.    कोकण विभागातील सर्व   जिल्ह्यातील ८८विद्यार्थी होते . यामध्ये    मुंबई १८ , ठाणे ४२ , मुंबई उपनगर ९ , पालघर ५ , रायगड ९ रत्नागिरी ५   असे एकुण ८८ विद्यार्थी होते .   या सर्वांना   प्रथम सोशल डिस्टंसींग बाबत सुचना देण्यात आल्या . सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत   करण्यात आली. कोविड १९ संदर्भात संशयित आढळले नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा   शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले . ठाणे   शहर आसपासच्या विद्यार्थ्यांना   त्याच्या इच्छीत ठिकाणी जाण्यासाठी आवश्यकते नुसार खाजगी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले . जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर   यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या...

करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती

मृत्यूदर खाली आणा , काँटॅक्ट ट्रेसिंग वाढवा , त्वरित १० अँब्युलन्स कंत्राटी तत्त्वावर घ्या खासगी रुग्णालयांना दर ठरवून देण्याचे निर्देश   ठाणे दि.15 –   ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, १५ मे रोजी ठाणे महानगरपालिकेत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर खाली आणण्याची गरज असतानाच करोनाविरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे सांगून कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा श्री. शिंदे यांनी दिला. फायली तयार करण्यात वेळ घालवू नका . कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे . त्यामुळे हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल , असे   पालकमंत्री   श्री . शिंदे यांनी सांगितले . करोनाबाधित रुग्णांवर वेळच्यावेळी उपचार होणे महत्त्वाचे आहे . परंतु , अनेक ठिकाणी वेळच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत असून त्याची गंभी...

प्रभाग समिती स्तरावर नगरसेवकांचा कृतीगट मृत्यू दर कमी करण्यावर भर सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री ना. शिंदे यांच्या सुचना

  ठाणे दि . 15 : ठाणे शहरामध्ये कोरोनाबाधित रग्णांची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती असली तरीही मृत्यूदर कमी करण्यावर भर देण्यात यावा , कोमॉर्बिड पेशन्टस् तसेच 50 वर्षांवरील रुग्णांची विशेष काळजी घ्यावी व यासाठी तज्ञ डॉक्टरांची वेगळी यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश देतानाच राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना . एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक , प्रभाग अधिकारी , स्थानिक पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश असलेली एक समिती तयार करण्याच्या सूचना दिल्या .          कोव्हीड -19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यानुषंगाने उपाययोजना निश्चित करण्यासाठी ना . एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कै . नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .   या बैठकीसाठी महापौर नरेश म्हस्के , खासदार राजन विचारे , आमदार संजय केळकर , आमदार प्रमोद पाटील , आमदार ॲड . निरंजन डावखरे , उपमहापौर सौ . पल्लवी पवन कदम , स्थायी समिती सभापती राम रेपाळे , सभागृह नेता अशोक वैती , विरोधी पक्षनेत्या सौ . प्रमिला मुकुंद केणी , महाप...

नवी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे निर्जंतुकीकरण काम अंतिम टप्प्यात

  ठाणे   दि . 14:- मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत साफसफाई , निर्जंतुकीकरण , वैद्यकीय तपासणी विशेष मोहिम राबविण्यासाठी ११ मे ते १७ मे २०२० पर्यंत सर्व बाजार आवारे बंद ठेवण्यात आली आहेत .   त्यात १ हजार ४७५ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे .   अशी माहिती आज बैठकीत देण्यात आली .   या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री . शिवाजी दौंड हे होते .                   फळ मार्केट , भाजी मार्केट , मसाला , कांदा - बटाटा , धान्य आदिंची निर्जंतुकीकरण करण्यात आले . नवी मुंबई महानगरपालिका आणि तेरणा हॉस्पिटलच्या २५ वैद्यकीय पथक संख्येने ही तपासणी केली .                   येत्या सोमवार पासून कोविड - १९ च्या सर्व निर्देशांचे पालन करुन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येण...

*ठाणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे -- कृषीमंत्री दादाजी भुसे* *2020 वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरे करणार*

Image
                                         ठाणे   दि. 20- कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात गरज लक्षात घेऊन बदल करणे आवश्यक आहे. ठाणे   जिल्ह्यातील शेतकऱ्यांना   पारंपरिक शेती बरोबरच सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यात यावे व त्यासाठी प्रवृत्त करावे   अशी   सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केली.   ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे   यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   यावेळी बोलतांना कृषीमंत्री भुसे म्हणाले 2020 वर्ष हे कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. तसेच खते , बियाणे व त्याच बरोबर शेतकऱ्यांन...