Posts

Showing posts from September, 2019

निवडणुकीच्या काळात बँकेतून संशयास्पद गैर व्यवहारांना बसणार आळा ----------------------------------------------------------- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बँक प्रतिनिधीची घेतली बैठक

Image
          ठाणे दि 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने घोडेबाजाराला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कठोर पावलं उचलली असून जिल्ह्यातील बँकर्सनी बँक खात्यामधील १ लाखावरील व्यवहारांची तसेच   संशयास्पद व्यवहारांची   माहिती निवडणूक खर्च कक्षास दैनंदिन देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे.            आज जिल्हास्तरीय बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती   सभागृहात जिल्हाधिकारी   राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.          जिल्ह्यात २१ सप्टेंबर पासुन विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील सर्व बँकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले ,बँकेची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून कोणत्याही परिस्थितीत बँके शिवाय अन्य कोणत्याही त्रयस्थ संस्...

146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणा सज्ज- निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सतिष बागल

ठाणे दि. 22 ( जिमाका ) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या   सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात   दि. 21 सप्टेंबर पासुन आदर्श आचारसंहिता   लागू करण्यात आली आहे. 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सतिष बागल यांनी दिली . निवडणुकीची अधिसूचना दि.   २७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ४ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी दि.५ ऑक्टोबर रोजी तर   उमेदवारी अर्ज मागे घेण्याची   मुदत   ७ ऑक्टोबर आहे. २१ ऑक्टोबरला मतदान    व   दि. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी   डॉ बाबासाहेब   आंबेडकर भवन पोखरण रोड नं 2 ठाणे   येथे   होणार आहे. 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात एकूण 430 मतदान केंद्र ा पैकी मतदान केंद्र क्रमांक 377 व 378 हे दोन महिला मतदान केंद्र असणार आहेत. या मतदारसंघात 2,43, 815 पुरुष मतदार 2,03 ,704 स्त्री मतदार 11 इतर मतदार   असे 4,47,530 एक...

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई -- जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेश नार्वेकर

ठाणे (जिमाका ) दि. २१ - भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या   सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात   आजपासून आदर्श आचारसंहिता   लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी तथा   जिल्हा निवडणूक अधिकारी   श्री राजेश   नार्वेकर यांनी केले.     ठाणे जिल्ह्यातील   अठरा विधानसभा मतदार संघांसाठी दि.२१ ऑक्टोबरला मतदान   तर दि.२४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.निवडणुकीची अधिसूचना दि.   २७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ४ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी दि.५ ऑक्टोबर रोजी तर   उमेदवारी अर्ज मागे घेण्याची   मुदत   ७ ऑक्टोबर आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “ काय करावे किंवा करु नये ” ( “ DOs & DON’Ts) ची माहिती   मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांच्या   https://ceo.maharashtra.g...

अप्पर जिल्हाधिकारी पदी वैदेही रानडे

Image
ठाणे दि.18जि माका : ठाणे जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी श्रीमती वैदेही रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीमती रानडे यांनी आज मंगळवार दि.18 सप्टेंबर रोजी पदभार स्विकारला.यापुर्वी श्रीमती रानडे अप्पर जिल्हाधिकारी मुंबई या पदावर कार्यरत होत्या.

जिल्ह्यातील मतदानकेंद्रे तळमजल्यावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार अमंलबजावणी --जिल्हाधिकरी राजेश नार्वेकर

Image
ठाणे दि. 16 - मतदानाचा हक्क बजावतांना मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये तसेच त्यांना सुलभ रित्या मतदार केद्रे उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हातील जी मतदान केंद्रे पहिल्या , दुसऱ्या , तिसऱ्या , मजल्यावर होती अशी सर्व मतदार केंद्रे तळमजल्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाधिकरी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वमुमीवर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रकिया सुलभ सुरळीत पणे राबण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत.या सर्व मतदारसंघामध्ये या निर्देशाची तातडीने अमंलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात   एकूण 6621 मतदान केंद्रे असुन लिफ्ट सुविधासह असलेले 251 मतदान केंद्रे वगळता 6370 मतदान केंद्रे तळमजळयावर असणार आहेत. या पैकी 5508 ही मतदान केद्रे तळमजल्यावर 862 मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत. लिफ्ट असलेल्या 251 मतदार केद्रामध्ये बॅटरी बॅक्अप व्यवस्था करण्यात येणार आहे.मतदाराना कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी घेण्यात येत असल्याचे श्री नार्वेकर यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्य...

ठाणे शहरात गणपती विसर्जनसाठी वाहतूक मार्गात बदल

ठाणे दि. 5 (जिमाका) : ठाणे शहरात गणेश मुर्ती विसर्जनाच्या दिवशी   दि.6. सप्टेंबर 2019 (पाच दिवसांचे) दि .8 सप्टेंबर 2019 (सात दिवसाचे) दि.12 सप्टेंबर .2019(अंनत चर्तुदशी) या कालावधीत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव व वर्तकनगर येथील उपवन तलाव या ठिकाणी   पोखरण नं 1 व 2 भागातील,तसेच मुंबई उपनगर परिसरातील गणेश मुर्तीचे विसर्जन मोठया प्रमाणात ठाणे शहरात केले जाते.त्या करिता वाहतूक सुरळीत व सुनिश्चित रहावी यासाठी मोटार वाहन कायदा कलम 115,116,(1)(अ)(ब) अन्वये वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. प्रवेश बंद- मॉडेला चेक नाका येथून रोड नं.16 व वागळे इस्टेट विभागाकडे जाणाऱ्या टी.एम.टी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना सिंधुदुर्ग हॉटेल येथुन मुख्य रस्त्याने(स.गो.बर्वे मार्गाने) जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग- सदरची सर्व वाहने मॉडेल नाका येथुन रोड नं16 व वागळे इस्टेट विभागाकडे जाणारी वाहने सिंधुदुर्ग हॉटेल येथे डावीकडे वळून जगदाळे ट्रान्सपोर्ट येथे उजवीकडे वळून शांताराम चव्हाण   मार्गाने एम.आय.डी.सी ऑफिस येथे डावीकडे वळून मुख्य रस्त्याने (स.गो बर्वे मार्गाने) ...

ठाणे जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही

ठाणे जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही ठाणे दि.4   (जिमाका): ठाणे जिल्हयात भाताची   लागवड   जास्त असल्याने सन 2019-20 या वर्षाकरीता ठाणे जिल्हासाठी एकूण 13290 मे टन युरीया खताची मागणी मंजुर झाली आहे. एकुण 13290 मे टन युरिया खताच्या मागणी पैकी ठाणे जिल्हृयात आज अखेर राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टीलायझर्स मार्फत 7228.22 मे.टन कृभको मार्फत 360 मे.टन आणि झुआरी मार्फत 78 में टन   असा एकुण 7666.22 मे.टन युरिया खताचा पुरवठा वितरणाकडे झाला आहे. शेतकऱ्यांना 100 टक्के युरीया खत पुरवठयाचे नियोजन करण्यात   आले आहे.तसेच सुफला या खताचा पुरवठा वितरकांकडे झाला आहे.जिल्हात खताचा साठा पुरेसा आहे.शेतकऱ्यांनी युरीया तुटवडयाबाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी   अंकुश माने व कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांचेकडून करण्यात आले आहे.