Posts

Showing posts from August, 2020
Image
  ठाणे , कल्याण -डोंबिवली , नवी मुंबई पालिकांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा कोरोना सोबतच इतर बाबींवर मनपा यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना   दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ------- शासन पालिकांच्या पाठीशी , पण हलगर्जी नको   मुंबई दि 24 (जिमाका): शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे  पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच  पावसाळीआजार , खड्डे , रस्ते कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.             ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे   जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली   त्यात ते बोलत होते.     या...

आदिवासी बांधवाच्या समस्या तात्काळ सोडवा -मंत्री के.सी.पाडवी.

Image
    ठाणे दि.24 ( जिमाका): आदिवासी  घटकासाठी अनेक योजना सरकारकडून राबविल्या जातात.त्या योजना  ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत व आदिवासी बांधवाना त्याचा लाभ भेटला पाहिजे.त्यांसाठी त्याच्या समस्या तात्काळ सोडवा असे प्रतिप्रादन आदिवासी  विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी आदिवासी विकास योजनाची आढावा बैठक  समिती सभागृह जिल्हाधिकारी  कार्यालय येथे केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त ठाणे   ग्रामीण, डॉ.शिवाजी राठोड,संबधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री   पाडवी यांनी तालुका निहाय आदिवासी योजनाचा आढावा घेतला व   समस्या जाणून घेतल्या.आदिवासी भागात जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे विद्यार्थांना योजनाचा लाभ मिळत नाही त्यामुळे आदिवासी भागात जातीच्या दाखल्यासाठी कॅप आयोजीत करा असे निर्देश संबधिताना दिले. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा   शेतीविकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टिने उपलब्ध असलेल्या   साधनांचा व उर्जेचा पुरेपूर उपयोग करुन आदिवासी भागात जे उत्पादन होते त्याच्या उत्पादना...

नागरी संरक्षण पदविका आभ्याक्रमासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

  ठाणे दि.19( जिमाका):नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय , मुंबई महाराष्ट्र शासन येथे नविन सुरु होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी, आपत्ती व्यवस्थापन पदवित्तर पदविका अभ्यासक्रम मुंबई विद्यापिठाच्या संलग्नतेने सप्टेंबर-2020 ते जून-2021 या कालावधीत सुरु करण्यात येत आहे. नागरी संरक्षण संघटना ही आप्ती प्रसंगी दुर्घटनास्थळी प्रथम प्रतिसाद देऊन नागरीकांना आवश्यक ती मदत व बचाव करण्याचे कार्य करते तसेच शांतता काळात सामान्य नागरीक शासकीय-निमशासकीय , खाजगी आस्थापना आणि उद्योगांमधील आस्थापना वरील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच शाळा-कॉलेज मधील शिक्षक व विदयार्थांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित करते.आपत्ती व्यवस्थापन पाठ्यक्रम ( Post Graduate in Disaster Management )   12 महिने   सप्टेंबर , 2020 ते जून 2021 असा काळावधी आहे .   या प्रवेशासाठी प्रती बॅच 20 प्रशिक्षणार्थी   क्षमता आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर ( 60% पेक्षा अधिक गुण आवश्यक ) नियमानुसार मागासवर्गीय राखीव, रु. 59,000/- + रु. 500/- ( प्रक्रिया शुल्क) आहे. सदर पदविका पाठयक्रमाचे शुल्क Comm...

नोकरी इच्छुक उमेदवार,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा

              ठाणे दि.19( जिमाका)   राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती कविता ह . जावळे यांनी दिली आहे .               नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा , सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत . राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणा - या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम   योजनेअंर्तगत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे , केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा - या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्था यांची माहिती प...

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदत

       ठाणे दि.19( जिमाका) : ठाणे जिल्हयातील सार्वजनिक व खाजगी   क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी   मनुष्यबळाची माहिती राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 31 ऑगस्ट 2020 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय , निमशासकीय तसेच खाजगी   क्षेत्रातील कायदयाअंतर्गत असणा-या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणा-या सर्व कर्मचा-यांची पूरूष / स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस कायदयाच्या तरतूदीनुसार भरणे बंधनकारक आहे. जून 2020 अखेर संपणा-या तिमाहीची माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जुने कोषागार कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे कार्यालयात चालू आहे.सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने य विभागाच्या संकेत स्थळावर लॉगिन करावे व कायदयाचे अन...

पालकमंत्री यांच्या हस्ते रानभाज्या प्रदर्शनचे उद्घाटन

Image
  ठाणे दि. 15(जिमाका) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नियोजन भवन आवार , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , ठाणे येथे रानभाज्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभास   खासदार राजन विचारे , श्रीकांत शिंदे   आमदार संजय केळकर , रवींद्र फाटक , जिल्हाधिकारी   राजेश   नार्वेकर , जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे , मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे , उपाध्यक्ष सुभाष पवार , ठाणे मनपा आयुक्त   पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर , पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड , अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे , निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. सदरचा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्वोरमेंटल सोसायटी यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन व विक्री साठी ठेवण्यात होते. आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे त्यामध्ये रा...

रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन

Image
      रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन ठाणे दि. १५ - जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे   यांनी   जिल्हयातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री   एकनाथ शिंदे   यांच्या हस्ते झाले. ठाणे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हयातील सर्व कोविड १९ रुग्णांसाठी केंद्रीय रूग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. १८०० १२० ५२८२ या टोल फ्री क्रमांकावर ही   सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या मनपात बेड उपलब्ध नसल्यास जिल्हास्तरावरून दुस या मनपातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बेड उपलब्ध झाल्याबाबत रूग्णाला एसएमएसद्वारे सूचना मिळणार आहे. त्यामुळे बेडआभावी उपचार न मिळण्याची समस्या दुर होण्यास मदत होणार आहे. जिल्हा स्तरावर तसेच प्रत्येक मनपा व ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

Image
  पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण   करोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम ; जिल्हावासीयांच्या उत्तम सहकार्याने कोरोनावर लवकरच मात करू- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास ठाणे   दि. १५ - कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत.पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर , मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं , सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला तर आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास ठाणे   जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारंभास   खासदार राजन विचारे , श्रीकांत शिंदे   आमदार संजय केळकर , रवींद्र फाटक , जिल्हाधिकारी   राजेश   नार्वेकर , जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे , मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे , उपाध्यक्ष सुभाष पवार , ठाणे मनपा आयुक्त ...

31 ऑगस्ट पर्यंत निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

  31 ऑगस्ट पर्यंत निवृत्ती   वेतनधारकांनी   माहिती   सादर करण्याचे आवाहन    ठाणे दि.12( जिमाका):जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे येथून निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांची   माहिती   निवृत्तीवेतन   वाहिनी   प्रणालीमध्ये अदयावत करावयाची असल्याने खालील मुद्देनिहाय माहिती   दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सादर करावी. १) निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचे पूर्ण नाव व पूर्ण पत्ता २) पीपीओ क्रमांक , ३) बँकेचा तपशिल (बँकेचे नाव , शाखेचे नाव व खातेक्रमांक) ४) पॅन कार्ड(झेरॉक्स जोडावी) , ५) भ्रमणदूरध्वनी , ६)ईमेल आयडी(असल्यास) इत्यादी माहिती खालील पत्यावर व ईमेलव्दारे   पाठविण्यात यावी.ईमेल आयडी to.thane@zillamahakosh.in पत्रव्यवहारचा पत्ता :-   जिल्हा कोषागार कार्यालय , निवृत्तीवेतन शाखा , तळमजला , जिल्हाधिकारी   कार्यालय   परिसर ,   कोर्ट नाका ,   ठाणे – 400601 असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी केले आहे.

१५ ऑगस्ट रोजी रानभाज्या प्रदर्शन व विक्री

  १५ ऑगस्ट रोजी रानभाज्या प्रदर्शन व विक्री ठाणे दि. १४(जिमाका)रानभाज्या प्रदर्शन व विक्री   दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी ११.०० ते ५.०० वाजता नियोजन भवन आवार , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , ठाणे येथे आयोजित केला आहे .   सदरचा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्वोरमेंटल सोसायटी यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे . जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन व विक्री साठी ठेवण्यात येणार आहे   निसर्गातः उपलब्ध होणा-या रानभाज्या नैसर्गिक सेंद्रिय असून सर्व प्रकारची जीवनसत्वे व औषधी गुणधर्म संपन्न आहेत . आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे या करता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी हि संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषि विभागाचे धोरण आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या , हिरव्या भाज्या फळभाज्या , पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अत...

नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू ​ - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील

  नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणार आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू ​ - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ​ मुंबई दि. १४: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या   खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ​ कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की , कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३...

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

  पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण   ठाणे दि . 14 ( जिमाका ):-   भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री   एकनाथ शिंदे   यांच्या हस्ते होणार आहे .   या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये . जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत : चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्या नंतर आयोजित करावा . दि . 15 ऑगस्ट   रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमातींवर , तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा .   स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन व याबाबतच्या सर्व न...

स्वातंत्र्य सैनिक दामोदर उसगावकर यांचा सन्मान

  स्वातंत्र्य सैनिक   दामोदर उसगावकर यांचा सन्मान   ठाणे   दि. ९( जिमाका): राष्ट्रपती भवन , नवी दिल्ली येथील सत्कार समारंभासाठी निवड करण्यात आलेले   स्वातंत्र्य सैनिक श्री. दामोदर सोहिरोबा   उसगावकर यांचा सन्मान   महाराष्ट्र शासनाचे वतीने जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी , ठाणे अविनाश शिंदे यांनी     त्यांचे प्रतिनिधी म्हणून   मुलीचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला.     दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त महामहीम राष्ट्रपती यांचेकडून सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ राष्ट्रपती भवन , नवी दिल्ली येथे आयोजित केला जातो. यासाठी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांची निवड केली होती.   परंतु   कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेवून ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन , नवी दिल्ली येथे बोलवित   येणार   नाही , असे केंद्र शासनाने कळविले होते.     उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने ,   सत्कार समारंभासाठी निवड करण्यात ...