ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात 24जुलै ते ७ ऑगस्ट पर्यत मनाई आदेश जारी
ठाणे, दि. २२ (जिमाका) : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दि. २४ जुलै २०२२ ते दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.
या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही, दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद केले आहे.
लग्न कार्यासाठी जमलेले नागरिक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेन्या येथे जमलेले नागरिक सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका. सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, आदींना हे आदेश लागू राहणार नाही.
हा मनाई आदेश दि. २४ जुलै २०२२ रोजी ००.०१ वाजेपासून दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी २४.०० वाजेपर्यंत अमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणान्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. पठार यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment