Posts

Showing posts from September, 2025

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन काळे तर सरचिटणीसपदी समीर भाटकर व कोषाध्यक्षपदी संतोष ममदापुरे यांची निवड!

Image
ठाणे,दि.04(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दि.23 व 24 ऑगस्ट 2025 दरम्यान संपन्न झाली. या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वर्ष 2025-28 या वर्षासाठी झालेल्या महासंघ पदाधिकाऱ्यांची निवडणूकीत सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई श्री.नितीन काळे यांची अध्यक्ष; वित्त व लेखा विभागातील सहायक संचालक श्री.समीर भाटकर यांची सरचिटणीस; मंत्रालयातील अवर सचिव श्री.संतोष ममदापुरे यांची कोषाध्यक्ष पदावर तसेच 12 उपाध्यक्ष; 3 महिला उपाध्यक्ष; 19 विभागीय सहचिटणीस; 19 महिला सहचिटणीस यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्यातील विविध खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 70 खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. महासंघामार्फत राज्यसेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न, शासन-प्रशासनाशी चर्चाविनिमय व सौहार्दाच्या वातावरणात सोडविले जातात. दर तीन वर्षांनी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड नियमितपणे केली जाते. शेगाव येथे दोन दिवस चाललेल्या या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महासंघाशी सं...

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ

ठाणे,दि.04(जिमाका):-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शिबीर कार्यालय 1. अंबरनाथ, 2. बदलापूर व 3. मुरबाड अशी एकूण तीन शिबीर कार्यालये येत असून या कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती (Learner License) व पक्के अनुज्ञप्ती (Driving License) विषयक कामकाज केले जाते. शिबीर कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती (Learner License) व पक्के अनुज्ञप्ती (Driving License) बाबत अपॉईन्टमेंट मिळत नसल्याने जनतेची गैरसोय होते व लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता शिबीर कार्यालये कमी पडत असून शिबीर कार्यालयात वाढ करणे आवश्यक असल्याने शिबीर कार्यालयात वाढ करण्यात आली आहे. शिबीर कार्यालयाचे नियोजन पुढीलप्रमाणे:- शिबीर कार्यालय क्र.1 -  शिबीर कार्यालयाचे ठिकाण- अंबरनाथ, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी. शिबीर कार्यालय क्र.2 -  शिबीर कार्यालयाचे ठिकाण- बदलापूर, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक सोमवार व गुरुवारी. शिबीर कार्यालय क्र.3 -  शिबीर कार्यालयाचे ठिकाण- मुरबाड, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी. जनतेचे हिताकरिता शिबीर कार्या...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी (TAIT) परीक्षा 2025

ठाणे,दि.03(जिमाका) :-   महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण 2025/प्र.क्र.92/टिएनटी-1, दि. 28 फेब्रुवारी 2025 व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/पाथ 106/टेट-3/वेप/2025/1191, दि.19 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ. दि.21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025" चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दि.27मे2025ते30 मे 2025व दि.02 जून 2025 ते 05 जून 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण 2 लाख 11 हजरी 308 प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल दि.18 ऑगस्ट 2025 रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या  www.mscepune.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण...

रब्बी 2025-26 हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे,दि.03(जिमाका):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान- अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकांकरिता कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि.31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना लाभ देण्यात येणार आहे. याकरिता गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा दि.02 सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे. महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करतांना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर “ बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते ” या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानु...

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव..!

Image
छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर ठाणे,दि.03(जिमाका):- ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा 2025 ’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये 1) ‘वन्यजीव ’ , 2) ‘निसर्ग ’ , 3) ‘संस्कृती आणि परंपरा ’ तसेच 4) ‘बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प ’ या चार विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारली जातील. प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 4 छायाचित्रे पाठवता येतील. एकाच विषयाचे चार फोटो असल्यास Category_Name_mobile number_1; Category_Name_mobile number_2 ; Category_Name_mobile number_3 ; Category_Name_mobile number_4 अशी नावे देवून पाठवावीत. ही छायाचित्रे उच्च दर्जाची (High-Resolution HD 10MB) असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे thanedio2025...

विशेष लेख: ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: 'सेवा पंधरवडा'

Image
सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..! आपल्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे असतात. कधी शेतजमिनीची नोंद , कधी घराचा उतारा , तर कधी सरकारी योजनेचा लाभ... ही कामे वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावीत यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ' राबवण्यात येणारा हा "सेवा पंधरवडा" सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर , २०२५) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (०२ ऑक्टोबर , २०२५) हा ' सेवा पंधरवडा ' राज्यभर साजरा होणार आहे. या कालावधीत , सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , कार्यक्षम आणि गतिमान पद्धतीने काम करणार आहे. या उपक्रमात राबवले जाणारे कार्यक्रम यापूर्वीही सुरू होते , परंतु या काळात ते युद्धपातळीवर आणि मोहीम स्वरूपात राबविले जातील. यासंदर्भात शासनाने नुकताच एक निर्णय काढला असून , तो www.maharashtra.gov.in ...

ठाण्यात श्री. एकनाथ भानुदास ढमाळ यांची सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता पदावर नियुक्ती

ठाणे,दि.01(जिमाका)  :-  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 30अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांना पदोन्नती देऊन सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त केले आहे. या पदोन्नतीत ठाणे जिल्ह्यातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. एकनाथ भानुदास ढमाळ यांची निवड होऊन त्यांची नियुक्ती ठाणे येथे करण्यात आली आहे. श्री. ढमाळ यांची 2002 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहा. सरकारी अभियोक्ता (गट-अ) म्हणून निवड झाली होती. त्यानंतर मुंबई, रायगड व ठाणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये त्यांनी शासनाच्या वतीने प्रभावीपणे कामकाज केले. प्रविण महाजन अटक व रिमांड कार्यवाही तसेच अजमल कसाब अटक व रिमांड प्रक्रियेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी शासनाची बाज यशस्वीपणे मांडली. सन 2021 मध्ये त्यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून पदोन्नती झाली. ठाणे व बेलापूर येथील उपन्यायालयांमध्ये काम करताना त्यांनी दोषसिद्धीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवले असून अनेक गंभीर खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली. आता सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. ढमाळ यांच्यावर ठाणे व पालघर जिल्ह्यातील कार्...

इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे येथे 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिवस साजरा

ठाणे,दि.01(जिमाका) :-   इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे येथे 31 ऑगस्ट 2025 रोजी पहिला भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. महामानवांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी व कर्मचारी, समाज कल्याण ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महामंडळ अधिकारी कर्मचारी तसेच विविध योजनांचे लाभार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांवर विद्यार्थी फेरी, रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले, असे इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे, सहायक संचालक यांनी कळविले आहे. 00000

नागरिकांना त्यांच्या तक्रारी/अडीअडचणी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर

  ठाणे,दि.01(जिमाका) :-    ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना व्हॉट्सॲप व्दारे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याकडे तक्रारी/अडीअडचणी सादर करण्यासाठी 9930001185 हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात येत आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअॅप (Whatsapp) द्वारे तक्रार नोंदविताना, तक्रार ज्या विभागाची आहे त्या विभागाचे नाव व्यवस्थित नमूद करावे तसेच तक्रारदाराने स्वतःचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, ई-मेल व मोबाईल क्रमांकही नमूद करावा. या व्हॉट्सअॅप (Whatsapp) वर आपल्या तक्रारीशी संबंधित नसलेले कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुभेच्छा संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ वा अन्य मजकूर पाठवू नये. ही सुविधा कॉलिंगसाठी नसून केवळ मेसेजद्वारे आपली तक्रार नोंदविण्यासाठी आहे. मेसेजव्दारे प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे. तक्रारदाराने वारंवार एकाच स्वरुपाची तक्रार करु नये. एकाच वेळेस तक्रार पाठवावी, त्याची नोंद घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांनी कळविले आहे. 00000

निवडणूक आयोगाने जारी केली नोटीस; 'सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया' पक्षाची नोंदणी रद्द होण्याच्या मार्गावर

ठाणे,दि.01(जिमाका) :-    केंद्रीय निवडणूक आयोगाने 'सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया' या राजकीय पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पक्षाने गेल्या सहा वर्षांपासून, म्हणजेच 2019 पासून, लोकसभा किंवा कोणत्याही राज्य विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. यामुळे, हा पक्ष लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29 अ नुसार राजकीय पक्ष म्हणून काम करत नसल्याचे आयोगाचे मत आहे. त्यामुळे, आयोगाने या पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कारवाई करण्यापूर्वी पक्षाला त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, कोणत्याही संस्थेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा मुख्य उद्देश निवडणुकांमध्ये भाग घेणे हा असतो. परंतु, 'सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया' या पक्षाने 2019 पासून कोणत्याही निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे, हा पक्ष आता राजकीय पक्षाच्या निकषांनुसार कार्यरत राहिलेला नाही असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. या नोटीसवर उत्तर देण्यासाठी पक्षाला 4 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पक्षाने लेखी निवेदन, संबंधित कागदपत्रे आणि अध्यक्षांच्य...

निवडणूक आयोगाने जारी केली नोटीस; 'राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस' पक्षाची नोंदणी रद्द का करू नये?

           ठाणे,दि.01(जिमाका) :-    केंद्रीय निवडणूक आयोगाने 'राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस' या राजकीय पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या सहा वर्षांपासून, म्हणजे 2019 पासून या पक्षाने कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे, लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29 अ नुसार या पक्षाने राजकीय पक्षासारखे काम करणे थांबवले आहे, असे आयोगाला वाटते. याच कारणामुळे आयोगाने पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कारवाई करण्यापूर्वी पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार, 'राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस' पक्षाची स्थापना निवडणुकीत भाग घेण्यासाठी झाली होती. मात्र, 2019 पासून या पक्षाने लोकसभा, राज्य विधानसभा किंवा कोणत्याही पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे, हा पक्ष आता कलम 29 अ नुसार राजकीय पक्षाच्या निकषांचे पालन करत नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पक्षाला 4 सप्टेंबर, 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पक्षाला लेखी स्पष्टीकरण, संबंधित कागदपत्रे आणि अध्यक्षांचे किंव...