Posts

Showing posts from September, 2025

ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत 50 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी संकेतस्थळावर जाहीर

ठाणे,दि.30(जिमाका) :  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1388 ग्रंथांची यादी (मराठी - 749, हिंदी - 297, व इंग्रजी - 342) ग्रंथालय संचालनालयाच्या  www.dol.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर दि.26 सप्टेंबर, 2025 ते दि. 15 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आलेली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरीत करणे बंधनकारक आहे. या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सूचना/ हरकती/ आक्षेप असल्यास दि.15ऑक्टोबर, 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – 400 001 यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेल वर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा/हरकतींचा/आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याच...

शासनमान्य ग्रंथांच्या यादीकरिता सन 2024 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत आवाहन

ठाणे,दि.30(जिमाका) :  राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदीकरिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय  “ शासनमान्य ग्रंथांची यादी ”  प्रकाशित करण्यात येते. या  “ शासनमान्य ग्रंथांची यादी ”  करिता सन 2024 या कॅलेंडर (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामूल्य (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-400 001 यांच्याकडे दि.15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत.   सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. हे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in  व ग्रंथालय ...

समाज कल्याण कार्यालयाकडून 1 ऑक्टोबर रोजी साजरा होणार जागतिक जेष्ठ नागरिक दिवस

  ठाणे,दि.30(जिमाका) :    भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक / मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि.9 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर 2025 रोजी    सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 4 था मजला, स्वामी समर्थ मठासमोर, खारीगांव, कळवा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्य...

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल वेगवान; त्यात ठाणे जिल्ह्याचे असणार भरीव योगदान

Image
प्रशासन आणि जिल्ह्यातील उद्योग समूहांनी केला संकल्प ठाणे,दि.30(जिमाका):-    महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टय साध्य करताना त्यात ठाणे जिल्ह्याचे भरीव योगदान असावे, यासाठी उद्योग समूहांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, अनिल थोरात, कार्यकारी अभियंता एस.एम.कांबळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार, व्यवस्थापक अश्विनी कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.   जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी उपस्थित औद्योगिक कंपन्या, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ठाणे जिल्ह्यातील उद्योगांसाठी असलेल्या सकारात्मक बाबींचा उल्लेख केला, तसेच त्यांना उद्योगवाढीसाठी अपेक्ष...

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

Image
ठाणे,दि.29(जिमाका) :  शासन निर्णय क्र.केंमाअ-2008/प्र.क्र.378/ 08/सहा, दि.20 सप्टेंबर 2028  अन्वये 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी  “ आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन ”  म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), श्रीमती रुपाली भालके, नायब तहसिलदार तथा जनसंपर्क अधिकारी मधुकर जाधव, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित  होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), श्रीमती रुपाली भालके यांनी माहितीचा अधिकार कायदा-2025 या कायद्याला 19 वर्षे पूर्ण होत असून कायद्याची महत्वाची उद्दिष्टे, बाबी, माहिती पुरविण्याची जबाबदारी, पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली. 000000

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्याला दिला दि.28 सप्टेंबर ला रेड, 29 ला ऑरेंज तर 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा

जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी आहे सज्ज ठाणे,दि.28(जिमाका):- प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास सर्व प्रकारे सज्ज आहे. हवामान विभागाचा इशारा: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, २९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रात, सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार काम करण्यास निर्देश देण्यात आले आहेत. यामध्...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर...

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन ठाणे,दि.२७(जिमाका):- भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर येण्याची शक्यता आहे. नागरिकांसाठी सूचना या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक आणि पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, पावसाळ्यात झाडाखाली थांबणे टाळावे, तसेच नदी आणि नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना शासन आणि प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. प्रशासकीय तयारी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सर्व जिल्ह्यांमधील ...

नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

Image
एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार; समिती काढणार वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा   ठाणे,दि.26(जिमाका):-  नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. तसेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार आहे. या समितीच्या माध्यमातून वाहतूक कोंडीबाबत अभ्यास करून या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार किसन कथोरे, संजय केळकर, डॉ.बालाजी किणीकर, कुमार आयलानी, शांताराम मोरे, नरेंद्र मेहता, महेश चौघुले, विश्वनाथ भोईर, रईस शेख, ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार संच वाटप

ठाणे , दि.25(जिमाका):-  माहिती तंत्रज्ञान संचालनालय ,  महाराष्ट्र शासन यांच्याकडून ठाणे जिल्ह्यासाठी आधार संच पुरविण्यात आले आहेत. हे आधार संच मिळण्यासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यापैकी 107 अर्जदार यांनी त्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित असल्याचे व आपले सरकार सेवा केंद्रामधून सेवा देण्यात येत असून  Transactions  होत असल्याच्या निकषाची व इतर विहीत निकषांची पुर्तता केल्याने त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात 24 केंद्र चालकांना आज अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके यांच्या हस्ते व तहसिलदार सचिन चौधर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार संच वाटप करण्यात आले. 00000

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Image
ठाणे , दि.25(जिमाका):-  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सानपाडा येथील नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे कोनशिलेचे अनावरण व भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक ,  पणन मंत्री जयकुमार रावल ,  सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ,  आमदार निरंजन डावखरे ,  मंदा म्हात्रे ,  प्रशांत ठाकूर ,  विक्रांत पाटील, प्रशांत ठाकूर, कुमार अयलानी, माजी खासदार संजीव नाईक,  महाराष्ट्र गृह निर्माण व कल्याण महामंडळ (मर्या.) मुंबईच्या व्यवसायिक संचालक तथा पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी ,  नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ,  पोलीस सहआयुक्त संजय एन. पुरे ,  अतिरिक्त पोलीस आयुक्त (नवी मुंबई) दीपक चाकोरे ,  अतिरिक्त पोलीस आयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नूतन इमारतीत पोलीस प्रशासनासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सेवा-सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी आधुनिक ...

माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार   समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणे हेच आमचे धोरण  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे , दि.25(जिमाका):-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारे हे सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणे, हेच या सरकारचे धोरण आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचे जीवनमान उंचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू ,  अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र राज्य माथाडी ,  ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ,  अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट येथे आज स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात राज्याचे वनमंत...