बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
बाल शक्ती व  बालकल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज
करावेत
ठाणे दि.22 (जिमाका):केंद्र शासनाच्या महिला
व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.ज्या
मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला,सांस्कृतिक
कार्य,खेळ नाविन्यपुर्ण शोध,सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष
नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे,त्यांना बाल शक्ती 
 
पुरस्कार  दिला जातो.
   बालकल्याण
पुरस्कार -  मुलांच्या विकास संरक्षण व
कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त
भावनेतुन किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस 
वैयक्तीक  पुरस्कार दिला जातो.तसेच
बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला  संस्थास्तरावरील पुरस्कार दिला जातो. संस्था
पुर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी.तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे
सातत्यपुर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
  बाल शक्ती
पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज  मागविलेले आहेत.सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in  या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले  जाणार आहेत.पुरस्काराची माहिती संकेतस्थळावर
देण्यात आलेली आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.31.08.2019 पर्यंत असुन पुरस्कारासाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त महिला व बाल विकास,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी
केले आहे.
Comments
Post a Comment