बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत


बाल शक्ती व  बालकल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

ठाणे दि.22 (जिमाका):केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला,सांस्कृतिक कार्य,खेळ नाविन्यपुर्ण शोध,सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे,त्यांना बाल शक्ती
  पुरस्कार  दिला जातो.

   बालकल्याण पुरस्कार -  मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस  वैयक्तीक  पुरस्कार दिला जातो.तसेच बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला  संस्थास्तरावरील पुरस्कार दिला जातो. संस्था पुर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी.तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपुर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

  बाल शक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज  मागविलेले आहेत.सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in  या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले  जाणार आहेत.पुरस्काराची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.31.08.2019 पर्यंत असुन पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त महिला व बाल विकास,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी केले आहे.






Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न