Posts

Showing posts from February, 2025

विशेष लेख क्र.07 - एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन

Image
आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्ग केंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पाहणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज उत्तरं सापडत नाही. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहेत किंवा अंतर्गत व बाह्य संघर्षात गुरफटले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, देश देखील अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत, एका दूरदर्शी विचारवंताने एकात्म मानवतावाद या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते. परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट केले की...

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावे - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

Image
कॉपीमुक्त ठाणे करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्राद्वारे आवाहन   ठाणे,दि.10(जिमाका):-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इ.12 वी व इ. 10 वी परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात, यासाठी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांकरिता आपल्या आवाहनात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले आहेत की, तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश...

जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच छत्राखाली शासनाच्या विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ

Image
शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे होणार शक्य   ठाणे,दि.10(जिमाका):-  सामान्य प्रशासन विभागाच्या दि.13 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा दिला असून त्यात मुद्दा क्रमांक 2 मध्ये नागरिकांना दैनंदिन जीवन सुकर व्हावे, याकरिता सातत्याने प्रयत्न करावेत, असे नमूद आहे. त्यानुषंगाने नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सेवा त्यांना एक छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी दि.9 फेब्रुवारी 2025 पासून एकाच छत्राखाली विविध सेवा देण्यासंबंधीचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेंतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करणे व दाखला प्राप्त करणे शक्य होणार आहे. या सर्व सेवा शासनमान्य आधारकेंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र येथे नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहेत. (संबंधित केंद्रांची यादी सोबत जोडली आहे) तरी, जिल्ह्यातील गरजूंनी ...

एसटी कर्मचाऱ्यांनी " प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा " समजून काम करावे..! - उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मौलिक सल्ला

Image
  ठाणे,दि .09 (जिमाका :- एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी   " प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!" समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील   नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा -मोहरा बदलून " फाईव्ह स्टार " परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे.     मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC...

“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” “जनसामान्यांची सेवा हाच धर्म”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  ठाणे,दि.09(जिमाका):-   हे शासन सर्वसामान्यांचे असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी “ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ” आणि “ जनसामान्यांची सेवा हाच धर्म ” या तत्वांवर चालणारे असून   नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.             सार्वजनिक आरोग्य विभाग वतीने 6 डे-केअर किमोथेरपी सेंटर (ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व वर्धा) उभारण्यात येणार असल्याची घोषणा आणि कर्करोग मोबाईल व्हॅन-8, 102 रुग्णवाहिका-384, सीटी स्कॅन-2, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका-7, डिजिटल हँड हेड एक्स-रे मशिन-80 चा लोकार्पण सोहळा जिल्हा नियोजन भवन सभागृह, येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.              यावेळी आयुष मंत्रालय तसेच स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प...

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

    ठाणे,दि .07 (जिमाका :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि.११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दि.२१ फेब्रुवारी २०२५ ते दि.१७ मार्च २०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. १) ९०११३०२९९७, २) ८२६३८७६८९६,   ३) ८७६७७५३०६९, ४) ७३८७४००९७०, ५) ९९६०६४४४११ ६) ७२०८७७५११५,   ७) ८१६९२०२२१४,   ८) ९८३४०८४५९३,   ९) ८३२९२३००२२, १०) ९५५२९८२११५. वरील भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा काला...

मनोधैर्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य घेवून साक्ष फिरविणाऱ्या महिलेवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे कडून वसुलीची कारवाई

  ठाणे,दि.07(जिमाका :-   बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पीडित महिला न्यायालयात फितूर झाल्याने शासनाकडून मिळालेली एक लाख रुपयांची मदत तिला परत करावी लागणार आहे. बलात्कार पीडित म्हणून पुनर्वसनासाठी शासनाकाकडून तिला ही मदत देण्यात आली होती. मात्र तिच्या फितूरीमुळे आरोपीची निर्दोष सुटका झाल्याने तिला दिलेली रक्कम आता परत घेतली जाणार असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तशी तिला नोटीस पाठवण्यात आली आहे. कल्याण येथील 40 वर्षीय (घटना घडली तेव्हाचे वय) महिलेचे पती मनोरुग्ण होते. या कारणाने तिने उपचारासाठी त्यांना ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात 2017 मध्ये दाखल केले होते. या संधीचा फायदा घेऊन तिच्या दिराने घराच्या हिश्श्यावरून तिच्याशी हुज्जत घातली आणि घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला. कोणाकडे वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याबाबत तिने कल्याण पोलीस ठाण्यात दिराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेला शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ व्हावा, यासाठी पोलिसांमार्फत हे प्रकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्यात ...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम सुधारित उत्तरसूचीबाबत आक्षेप असल्यास दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावा

          ठाणे,दि .07 (जिमाका :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 पेपर (इ. 1 ली ते 5 वी) पेपर ।। (इ. 6 वी ते 8 वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दि.31 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता व या अंतरिम निकालावर दि.06 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप मागविलेले होते. त्यानुसार दि. 10 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तरसूचीवर प्राप्त हरकतीनुसार पेपर ।। मधील गणित विज्ञान विषयातील प्रश्नक्रमांक संच A-130, B-125, C-150 व D -145 बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार हा प्रश्न रद्द करण्यात येऊन अंतिम सुधारित उत्तरसूची जाहीर करण्यात येत आहे. याबाबतही कोणाचा आक्षेप असेल तर दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत mah a tet 24 msce@gmail.com   या ई-मेल वर आक्षेप नोंदविता येतील. वरील कालावधीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही व तद्नंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात य...

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे “कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

    ठाणे,दि .07 (जिमाका) :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.४ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या अनुषंगाने राज्यात पुढील महिनाभर कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत कर्करोग तपासणी करिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या “ कर्करोग तपासणी वाहनांचा लोकार्पण सोहळा ” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र शासन तसेच जिल्ह्यातील इतर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत दि.९ फेब्रुवारी २००५ रोजी नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी केले आहे. 00000000000

मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Image
                 ठाणे,दि.7 (जिमाका):- जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली.               या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा भूमी अधीक्षक बाबासाहेब रेडकर, तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.              यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना शासनाने या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मौजे मोघरपाडा, सर्व्हे नं.30 मधील 167 भाडेपट्टेधारक शेतकरी व 31 अतिक्रमणधारक शेतकरी यांना विशेष नुकसान भरपाई योजना म्हणून शासनाने धोरण तयार केले असून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची सुयोग्य भरपाईच...

पुढील 10 वर्षात ठाणे बनणार देशातील आदर्श शहर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Image
  ठाणे, दि.7(जिमाका):- ठाणे शहरात आणि जिल्ह्यात अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षात ठाणे शहर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श शहर बनणार यात शंकाच नाही, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे व्यक्त केला.             क्रेडाई एमसीएचआय ठाणे आयोजित 22 व्या रिअल इस्टेट आणि हौसिंग फायनान्स एक्स्पो चे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.             यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल, क्रेडाई चे अध्यक्ष जितेंद्र मेहता, डॉमनिक रोमेल, अजय आशर , स्टेट बँक ऑफ इंडिया चे उप महाव्यवस्थापक सुरजित त्रिपाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.             परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख...

“आरटीई” प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये

Image
कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई -शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी   ठाणे,दि.06(जिमाका):-  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे अवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी मनपा/नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

Image
  ठाणे,दि.06(जिमाका):-  दि.07 फेब्रुवारी 1986 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 39 वा वर्धापन दिन सोहळा दि.07 फेब्रुवारी 2025 रोजी बांद्रा येथील महासंघ कल्याणकेंद्र येथे संपन्न होणार आहे. हा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मुख्य सचिव सुजाता सौनिक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या निमित्ताने, वर्ष 2024-25 मध्ये कल्याणकेंद्र निधी संकलन व संघटनात्मक उल्लेखनीय कार्य केलेल्या ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, मुंबई उपनगर, पुणे या जिल्हा समन्वय समितींना  “ आदर्श जिल्हा समन्वय समिती ”   पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण विभागीय सहसरचिटणीस तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश भागवत, ठाणे जिल...