Posts

Showing posts from February, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ ही क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राची "महा ऑलिम्पिक" महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची संधी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
  ठाणे, दि.27(जिमाका) :  पोलीस विश्वात होणारी ही क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राची "महा ऑलिम्पिक" असून महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची ही एक संधी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.        येथील साकेत मैदानावर 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 चा दिमाखदार शुभारंभ उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.12 वर्षांनंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेला हा कार्यक्रम राज्याच्या क्रीडा दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा क्षण आहे.      या दिमाखदार सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला, तसेच राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांचीही विशेष उपस्थिती होती.      उपमुख्...

मराठीची अर्थव्यवस्था मजबूत करूयात !

Image
           मराठी भाषेचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध काय? खरंतर जीवनातील अनेक गोष्टींचा आणि अर्थकारणाचा, अर्थव्यवस्थेचा थेट संबंध आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी मागणी आणि पुरवठा या विषयावर महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी असे म्हटले की, पुरवठा आणि मागणीमुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते. बाजारपेठेत एखाद्या वस्तूला, सेवेला मागणी मिळण्याआधी ती बाजारपेठेत उपलब्ध देखील असायला हवी. किंवा मागणी आल्यावर त्वरित उपलब्ध व्हायला हवी. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याचा थेट संबंध असून ह्यावरच सर्व अर्थचक्र अवलंबून आहे. मराठीभाषेला अभिजात दर्जा मिळाला, ह्या मुळे भाषेच्या   संवर्धनाकरिता काही कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकारकडून मिळेल. येणाऱ्या 10 मार्चला महाराष्ट्राच्या बजेट मध्ये मराठी विभागाकरिता घसघशीत निधीची घोषणा देखील होईल. पण ह्याच बरोबरच माय मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून आपली देखील जवाबदारी असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा. आपल्या मराठीला चिरंतन ठेवायचं असेल तर तिची मागणी व पुरवठा हा कायम अखंडितच हवा. मर...

ठाणे येथे 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, 2025 चे दि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत आयोजन

Image
ठाणे,दि.25(जिमाका):-  ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन दि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वांदो, दु-शु, ज्युदो, कुस्ती, बॉक्सींग, हॉकी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डिंग, क्रॉसकंट्री व जलतरण अशा 18 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकुण 13 संघ सहभागी झाले असून त्यात 2 हजार 323 पुरुष व 606 महिला खेळाडू असे एकूण 2 हजार 929 खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एम.एम.आर.डी.ए. क्वॉटर्स, भाईंदरपाडा येथे करण्यात आली असून त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा साकेत पोलीस परेड ग्राऊंड, मुख्यालय येथील जुने परेड ग्राऊंड, साकेत येथील हेलीपॅड, सिध्दी हॉल व रहेजा गार्डन ठाणे स्पोर्ट क्लब येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे साखळी सामने दि.22 फेब्रुवारी 2025...

सन 2024-25 या वर्षामध्ये निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीद्वारे शेत नोंदणी दि.28 फेब्रुवारी पर्यंत करावी

Image
ठाणे,दि.25(जिमाका):-  युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मॅगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2024-25 मध्ये आज अखेर महाराष्ट्र राज्यातून 9 हजार 459 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. तर कोकण विभागातून 3 हजार 919 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मॅगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दि.31 डिसेंबर 2024 होती. परंतू अपेडा, नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात यावी. निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय / शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करण्यात यावे. याबाबतच्या सूचना आयुक्तालयाचे दि.6 जून 2024 व दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्राने देण्यात आल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बा...

नोंदणीकृत कलापथक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे दरपत्रकासह प्रस्ताव द्यावेत

Image
ठाणे,दि.25(जिमाका):-  कलापथकांद्वारे शासकीय योजनांच्या प्रसिध्दीसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पथनाट्ये/कलापथक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव दरपत्रकासह 27 फेब्रुवारी 2025 रोजी  सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाठवावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कलापथकांद्वारे शासकीय योजनांची प्रसिध्दी करणे, या बाबीसाठी निधी मंजूर आहे. जिल्ह्यामध्ये कलापथक सादर करण्यासाठी कार्यालयाकडून पथनाट्ये/कलापथक संस्थांची निवड करण्यात येत आहे. निवड झालेल्या कलापथक/पथनाट्ये संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची सर्वांना एकसमान या तत्वाने संधी देण्यात येणार असून त्यासाठी योग्य ते मानधन देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील कलापथक/पथनाट्ये संस्थांनी कार्यालयाकडे पुढील कागदपत्रे 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत व्यक्तीश: सादर करावीत. संस्था नोंदणीकृत असल्यास त्याची कागदपत्रे, संस्था किती वर्षापास...

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

ठाणे,दि.24(जिमाका):-  सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेंतर्गत रु.5 हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पीक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पीकाची नोंद आहे असे खातेदार, खरीप 2023 कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील Non digitalised villages मधील खरीप 2023 कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत खातरजमा  www.scagridbt.mahait.org  या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडून करुन घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पीक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांनी व चंद्रप...

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात “जनता दरबार” संपन्न

Image
  560 नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या समस्या ठाणे,दि.24(जिमाका):-  ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत  “ जनता दरबार ”   ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला. या जनता दरबारात 560 नागरिकांनी आपल्या समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या. बहुतांशी सामाजिक सद्य:स्थिती, शिक्षण, महिला संरक्षण, पाणीपुरवठा, जनजाती, वन, शेतजमीन या व अशा विविध विषयांबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यापैकी काही निवेदनांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे तात्काळ समाधान केले गेले. उर्वरीत तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विहित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. यावेळी आमदार निरंजन डावखरे व संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिक...

“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण

Image
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,  ही कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारीच  -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे,दि.24(जिमाका):-  शासनाने खाजगी सावकाराच्या जाचातून शेतकऱ्याची मुक्तता करण्यात मह्तप्रयासाने यश मिळविले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यातील भागलपूर येथून  “ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण ”   संपन्न झाले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास तथा कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील एकूण 9 कोटी 80 लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 हजार कोटी निधी ऑनलाईन वितरीत करण्यात आला. या दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यक्रमास ठाणे जिल्हा नियोजन समिती सभा...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 19 व्या हफ्त्त्याचे 24 फेब्रुवारी रोजी होणार वितरण

  ठाणे,दि.22(जिमाका) :- पी.एम. किसान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी दु.2.00 ते 3.00 या वेळेत 19 व्या हफ्त्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.      बिहार राज्यातील भागलपूर येथे किसान सन्मान समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.             या ऑनलाईन समारंभामध्ये सर्व खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. मंत्री (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांनीही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.             तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे. 00000

मराठी ही आमची माऊली अभिजात भाषेची सावली

Image
      “ माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके! परी अमृतातेंही पैंजा जिंके! ” प्रख्यात साहित्यिक पु. ल.देशपांडे म्हणतात, "पंढरीचा पांडुरंग हे जसं महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत आहे, त्याप्रमाणेच कुसुमाग्रज हे राज्याचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक ठेवा आहे". चला तर, माय मराठीच्या संवर्धनासाठी तसेच मराठीपण व मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वजण एकदिलानं कटिबद्ध होऊया. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.महाराष्ट्र राजभाषा अधिनियम-1964 नुसार मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अमलात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजेच 2010 साली मराठी विभागाची मंत्रालयात निर्मिती करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणं, हे या विभागाचं मुख्य धोरण आहे. सदर धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने मराठी भाषा विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ हे विभाग कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, वाचन...

निरीक्षक वैधमापनशास्त्र, ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3 व भाईंदर विभाग ही कार्यालये वागळे इस्टेट येथे नवीन जागेत स्थलांतरीत

    ठाणे,दि.21(जिमाका) :-   उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, ठाणे जिल्हा क्र.1, ठाणे या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले निरीक्षक वैध मापनशास्त्र, ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3 व भाईंदर विभाग ही कार्यालये खाजगी जागेत भाडेतत्वावर तृणपुष्प सोसायटी, पाईप लाईन रोड, लुईसवाडी, ठाणे (प) 400604 या जागेत कार्यरत होते. हे कार्यालय दि.18 फेब्रुवारी 2025 पासून नवीन जागेत स्थालांतरित करण्यात आले असून या कार्यालयांचा नवीन पत्ता निरीक्षक वैध मापनशास्त्र ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3 व भाईंदर विभाग ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा, येथील प्रशासकीय भवन पहिला मजला, रोड नं. 27 आणि 34, वागळे आगार, वागळे इस्टेट, ठाणे (प) -400604   असा असल्याचे ठाणे जिल्हा क्र.1, ठाणे वैधमापन शास्त्र उपनियंत्रक रा.फ.राठोड यांनी कळविले आहे. 00000  

विशेष लेख क्र.09 - अभिजात मराठी भाषा.. जतन आणि संवर्धन

Image
मराठी भाषेबाबत महाराष्ट्रात माता व बालक यांच्या मधील संवादाची जी बोलीभाषा असते तिलाच मराठी मातृभाषा संबोधले जाते. मराठी माणूस जेथे वस्ती करीत राहिले तेथे संवाद साधताना रोजच्या वापरात, व्यवहारात रूढ असलेली मराठी भाषा मातृभाषा प्रचलित झाली. अन त्याच भाषेत शालेय विद्यार्थी शिक्षण घेत, अभ्यास करीत, मराठी भाषेला समृद्ध करू लागले. प्रत्येक तालुका, जिल्हाच्या गावागावातून बोलीभाषा ऐकायला वेगळी वाटली, तरी बोललेली समजते, कळत असते. या भाषेत शब्दकोष भांडार विपुल आहे, हे मराठी वाड • मयाचा अभ्यास करताना आढळून येते. मराठी संत साहित्य याचा अभ्यास करताना भाषा विविध अलंकाराने नटलेली वाक्प्रचार, म्हणी यांच्या सौंदर्याने सजलेली समृद्ध अन आकर्षक अशी जाणवते. अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी सकल जणांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. शब्दांचे मतितार्थ अन् भाव, आशय समजून उच्चार करताना शब्द उच्चारले पाहिजे. व्याकरणाचा अभ्यास करून त्यातील बोलीतून येणारा भेसळपणा दूर केला पाहिजे. जनमानसात ती टिकून राहण्यासाठी चर्चा सत्रे, निबंध अन काव्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, शिबिरे, इत्यादी आयोजि...

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे अभिवादन

Image
  ठाणे,दि.20(जिमाका):-  पत्रकारितेतील दीपस्तंभ  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अविनाश सकपाळ, सचिन काळुखे, सहायक छायाचित्रकार धनंजय कासार, वाहनचालक राजू भोये उपस्थित होते. 00000