Posts

Showing posts from July, 2019

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार          दि.31 ठाणे   जिमाका :   ठाणे , पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिक विधवांनी शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये बोर्डाच्या शालांत परिक्षा इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक परिक्षा इयत्ता 12 वी या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण   झालेल्या पाल्यांची नावे एअर मार्शल व्ही.ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसहित   दि 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावीत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 022-25343174 वर संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे /पालघर यांनी केले आहे 0000000

हिरकणी -नवउद्योजक महाराष्ट्राची योजना

हिरकणी -नवउद्योजक   महाराष्ट्राची   योजना ’           दि.31 ठाणे   जिमाका :   महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता आणि नवकल्याण प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘ हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ’ योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या नविण्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे , तालुका व जिल्हास्तरावर मंच उपलब्ध करून देणे व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा व अर्थसहाय्य करणे तसेच महिला बचतगटांना नवीन कल्पना संकल्पित करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे प्रमुख उद्दीष्ट आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान , राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान , महिला आर्थिक   विकास महामंडळ , उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान या यंत्रणाच्या अंतर्गत तयार केलेले , पंचसूत्रीचे पालन करणारे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचतगट हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राच्या योजनेत पात्र राहतील. खाजगी संस्थाव्दारे स्वंतत्रपणे तयार केलेले गट या योजनेत सहभागी होण्यासाठी पात...

दिव्यांगानी विविध योजनासाठी अर्ज करावेत

दिव्यांगानी विविध योजनासाठी अर्ज करावेत ठाणे दि.30(जिमाका):समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत सन 2019-20 या वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. सदर योजना करिता ठाणे जिल्हातील दिव्यांग व्यक्तीनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे. लघु उद्योगासाठी शारीरिकदृष्टया दिव्यांग व्यकतींना सहाय्य (बीज भांडवल योजना) दिव्यांग व्यक्तींना स्वत:चा उद्योग सुरु करुन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक पुनर्वसन साधता यावे म्हणून रु.150000/- पर्यंतच्या व्यवसायास अनुदान देण्याची योजना आहे. सदरील योजनेद्वारे प्रत्यक्षात 80 टक्के रक्कम बॅक कर्ज आणि 20 टक्के रक्कम समाज कल्याण विभागाकडून बीज भांडवल अनुदान देण्यात येते. पात्रता व अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे : अपंगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा अधिक असावे. वय 18 ते   50 वर्षे च्या दरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न रु.1,00,000 च्या आत असावे. कोटेशन (व्यवसाय प्रकल्प) रु 1,50,000 पर्यंत असावे. सोबत ज्या जागेत व्यवसाय करावयाचा आहे , त्या जागेचे प्रमाणपत्र प्रस्ताव...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीटाचे 1 ऑगस्ट रोजी प्रकाशन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकीटाचे 1 ऑगस्ट रोजी प्रकाशन ठाणे दि. 30   (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित महाराष्ट्र सरकार व महामंडळाच्या वतीने   टपाल तिकीटाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30   वाजता रंगशारदा सभागृह , के.सी.मार्ग , लिलावती रुग्णालयाजवळ , बांद्रा (प) येथे होणार आहे.       या ऐतिहासिक सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळांच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती अरुणा जोशी यांनी केले आहे. 00000
Image
ग्राहकांचे हित जपावे - राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांचे आवाहन     ठाणे दि. 30 (जिमाका) : ग्राहकांचे हित जपणे हे सेवा देणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे . त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या टोल फ्री   क्रमांकावर तक्रार दाखल करावी आणि शासनाच्या संबंधित विभागांनी त्याची तात्काळ दखल घेऊन तक्रार निवारण करावे , अशी सूचना राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्रीस्तरीय अरूण देशपांडे यांनी केली .             राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीने ग्राहकांना सेवा पुरविणाऱ्या ठाणे   जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय समिती   सभागृहात आढावा बैठक घेतली . यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी   जलसिंग वळवी , उप नियंत्रण शिधा वाटप फ परिमंडळ नरेश वंजारी   आदी यावेळी उपस्थित होते .             श्री . दे...

जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक                                               -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे, दि. 29   : राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे , दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्व आहे , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.कपिल पाटील, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार सर्वश्री संजय केळकर, किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, बालाजी किणीकर, जगन्नाथ पाटील यांच्या पत्नी पुष्पा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. ...

भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा ठाणे दि. 29 (जिमाका) : सततच्या पावसामुळे भातसाधरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे   भातसाधरणाचे पाच दरवाजे उघडण्यात येणार आहेत.भातसाधरणातून सुमारे 155 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जाणार आहे.भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल ,सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात येत आहेत.या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न   करण्याचा व दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी ठाणे यांनी कळविले आहे.

मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन 50 टक्के निधी उपलब्ध करून देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन 50 टक्के निधी उपलब्ध करून देणार                                               -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे, दि. 29   : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. 26 व 27 जुलै रोजी झालेल्या बदलापूर-कल्याण परिसरातील पुरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून राज्य शासन नुकसानग्रस्तांना भरीव मदत करेल आणि गरज भासल्यास नव्या निकषानुसार शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज ठाणे जिल्हयातील मुरबाड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळयाचे अनावरण, पोलस स्टेशन मुरबाड आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी वसाहत उद्घाटन समारंभ...

दिव्यांग पुरस्कारासाठी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

दिव्यांग   पुरस्कारासाठी 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत ठाणे , दि. 28 ( जिमाका):- केंद्र शासनाच्या विकलांगजन शक्तीकरण विभागाने सन 2019 पुरस्कारासाठी दिव्यांग व्यक्तीना अर्ज 10 ऑगस्ट पर्यंत करण्याचे आवाहन केले आहे. उत्कृष्ठ कर्मचारी , अधिकारी , दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्ती , दिव्यांगाचे जीवनमान उंचावण्यासाठी संशोधन , दिव्यांगाचे पुनर्वसन करणारा उत्कृष्ठ जिल्हा , उत्कृष्ठ काम करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती , चांगले काम करणारे दिव्यांग बालक , उत्कृष्ठ ब्रेल छाप खाना , सहज साध्य संकेत स्थळ , क्रीडा क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती यांनी पुरस्कारसाठी अर्ज करावेत. या अर्जामधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. त्यासाठी अर्ज करावयाचा नमुना http://disablityffairs.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्जदाराने आपले अर्ज विहित नमुन्यात इंग्रजीमध्ये व हिंदीमध्ये संक्षिप्त माहितीसह तीन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 10 ऑगस्ट पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परि...

डी.एल.एड. प्रवेशासाठी इच्छुकांनी 2 ऑगस्ट पुर्वी अर्ज करावेत

डी.एल.एड. प्रवेशासाठी इच्छुकांनी 2 ऑगस्ट पुर्वी अर्ज करावेत ठाणे , दि.28 (जिमाका) :- महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी शुक्रवार दि. 2 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.       याबाबतच्या सर्व सुचना , प्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या   www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असेल , यासाठी संबधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे , असे   प्राचार्य , जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था , रहाटोली जि .ठाणे यांनी कळवले.

नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन नेण्याची आवश्यकता भासणार नाही -रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Image
नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी   आरटीओ कार्यालयामध्ये वाहन नेण्याची आवश्यकता भासणार नाही - रस्ते   वाहतूक मंत्री नितीन गडकरी             ठाणे दि.27 जिमाका :   नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयामध्ये वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही , लवकरच ग्राहक हे काम ऑनलाईन करू शकतील , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.             बस व कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नवी मुंबई येथे   आयोजित   तीन दिवसीय प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना श्री. गडकरी म्हणाले की ,   सरकारमार्फत दळणवळण क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान , आधुनिकीकरण , नवीन व्यवसाय , नवीन चालना आणली जात आहे. आता इलेक्ट्रिक बसेसवर फक्त ५% जीएसटी आकारण्यात येणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस , इलेक्ट्रिक कार टॅक्सी , इलेक्ट्रिक रिक्षा आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांसारख्या कोणत्याही विद्य...
Image
महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश    ठाणे , दि. २७ ; वांगणी जवळ चामटोली परिसरात महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर पहाटेपासून सर्व संबंधित यंत्रणांनी   तत्परतेने   मदत कार्य करून प्रवाशांना प्रथम सह्याद्री मंगल कार्यालयात सुरक्षित हलविले. याठिकाणी प्रवाशांच्या जेवणाची तसेच 37 डॉक्टर्सच्या टीमद्वारे वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात येऊन त्यानंतर त्यांना 14 एसटी बसेस आणि तीन टेम्पो च्या माध्यमातून बदलापूर स्थानकावर पोहोचवण्यात आले. तेथून पुढे त्यांच्या इच्छित स्थळी प्रवासाची व्यवस्था रेल्वेमार्फत करण्यात आली.             पहाटे सहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या तत्काळ मदत कार्यावर देखरेख ठेवण्याच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आणि संबंधित प्रांत अधिकारी , तहसीलदार , एनडीआरएफ , आरपीएफ , स्थानिक पोलिस , ठाणे महानगरपालिका आपत्ती व्य...

कारगिल विजयदिनी 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व

Image
कारगिल विजयदिनी 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व ठाणे, दि. 26 जिमाका : ठाणे जिल्ह्यात 20 वा कारगिल युध्द विजय दिन व माजी सैनिक संम्मेलन कार्यक्रमाचे नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहिद   जवान स्मृती प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा, युध्द विधवा, माजी सैनिक संघटना यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी व आमदार (राज्यमंत्री दर्जा) गुरुमुक जगवानी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी, तक्रारी यांचे निवारण करण्यात आले. या प्रसंगी ठाण्यातील वीर पत्नी श्रीमती मीरा देवी, श्रीमती सत्याराणा, श्रीमती बेबी जोन्ह सी, श्रीमती सुप्रिया सुधीर आंब्रे यांना सन्मानित करण्यात आले व कारगिल युध्दात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्...

उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामुळे विद्यार्थीच्या देश भावना वृध्दींगत

Image
उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामुळे विद्यार्थीच्या   देश भावना वृध्दींगत ठाणे, दि. 26 जिमाका : कारगिल युध्द विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत होण्यासाठी 26 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता ठाणे जिल्हयातील 40 चित्रपटगृहांमध्ये “ URI-THE SURGICAL STRIKE ” हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात 19 हजार 600 विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. सदर चित्रपट प्रदर्शित   करण्याआधी सिनेपोलिश चित्रपटगृह, विवियाना मॉल, ठाणे येथे जिल्हाधिकारी राजेश   नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उदघाटनाच्या वेळी अपर जिल्हाधिकारी अनिल पवार,   उपजिल्हाधिकारी (सा.प्र) अभिजीत भांडे - पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव, करमणूक कर अधिकारी,   सर्जेराव मस्के - पाटील हे उपस्थित होते हा चित्रपट ठाणे जिल्हयातील 18 ते 25 वयोगटातील युवकांना दाखविण्यात आला. सदर चित्रपटास युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.