Posts

Showing posts from January, 2025

विशेष लेख क्र.05 - ज्येष्ठांची काळजी घेणारी “मुख्यमंत्री वयोश्री योजना”

Image
    मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.        सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 24 लाख असून त्यापैकी सद्य:स्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण 1 कोटी 50 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. योजनेचे स्वरुप: •        ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टि...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न

Image
ठाणे,दि.31(जिमाका):-  मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार व महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा दि.28 जानेवारी 2025 रोजी कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महानगरपालिकेने अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी स्पर्धा आणि महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध स्पर्धा, म्हणी, वाकप्रचार स्पर्धा इतर महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेहराव मराठी भाषा स्पर्धा, लावणी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मराठी भाषेचे वैभव जपणे, मराठी भाषेचे संवर्धन करणे, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक झाड एक कविता, पथनाट्य, सोनावणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अक्षर दिंडी, मंगळागौर, प्रगती महाविद्यालयातील विद्यार्...

स्पर्श पोर्टलसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स स्थापन करण्याकरिता इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

ठाणे,दि.30(जिमाका):-  केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत राज्यातील राज्य सैनिक बोर्ड/जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिकांना स्पर्श प्रणालीत (Sparsh Portal) येत असलेल्या अडचणींसाठी CSC (Common Service Centres) स्थापन करण्याबाबत कळविले आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना डीजीआरद्वारे मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या माजी सैनिकांना CSC केंद्र स्थापन करावयाचे आहे, त्यांनी डीजीआरच्या  http://dgrindia.gov.in  या संकेतस्थ्ळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी, ठाणे व पालघर जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव त्वरीत वरील संकेतस्थळावर नोंद करून या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे. 00000

कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे दि.01 फेब्रुवारी रोजी “सुकून प्रकल्प” सेंटरचे उद्घाटन

Image
  ठाणे,दि.30(जिमाका):-  कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे दि.01 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता  “ सुकून प्रकल्प ”  सेंटरचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी, या कार्यक्रमाकरिता इच्छुक नागरिकांनी, विधी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी, प्रसारमाध्यम प्रति‍निधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन बेलापूर नवी मुंबई वकील संघाचे अध्यक्ष ॲड.सुनिल मोकल आणि कौटुंबिक न्यायालय, बेलापूरच्या न्यायाधीश डॉ.रचना तेहरा यांनी केले आहे. 00000

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

Image
  विकासकामे गतीने पूर्ण करुन  सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा  - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे   ठाणे,दि.29(जिमाका):-  हे शासन कल्याणकारी राज्य घडविण्यासाठी काम करीत असून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम करीत आहे व यापुढेही करीतच राहणार. याच प्रकारे जिल्ह्यातील विकासकामेही गतीने पूर्ण करुन सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, दौलत दरोडा, विश्वनाथ भोईर, किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, त्याचबरोबर आमंत्रित सदस्य आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे...

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध

  ठाणे,दि.29(जिमाका):-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयाने ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणी, जादा प्रवासी वाहून नेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसी उध्दट वर्तन करणे, शिवागाळ करणे इ. गुन्ह्यांकरिता ऑटोरिक्षा प्रवाशांसाठी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी मोबाईल क्र. 9423448824 (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चालकाने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केल्यास प्रवाशाने ठिकाण, दिनांक, वेळ व गुन्ह्याचे स्वरुप, फोटो इ. तपशिलासह वरीलप्रमाणे नमूद व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार दाखल करावी. या तक्रारीची दखल घेवून ऑटोरिक्षा चालकावर मोटार वाहन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे. 00000

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांच्या 1 फेब्रुवारी 2025 पासून भाडेदरात वाढ सुरु

  ठाणे,दि.29(जिमाका):-  मोटार वाहन कायदा, 1988 कलम 68 अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे. या प्राधिकरणाची बैठक दि.23 जानेवारी 2025 रोजी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई व अपर परिवहन आयुक्त यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये पुढिलप्रमाणे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 1. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर वाढ. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने दि.10 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये श्री.बी.सी. खटुआ समितीची स्थापना केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत शासनाने दि.9 मार्च 2020 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. मा. खटुआ समितीच्या अहवालास शासनाने दि.9 मार्च 2020 रोजीच्या निर्णयाव्दारे मान्य केलेल्या काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सूत्रानुसार ...

महाराष्ट्रातील पहिल्या जलशक्ती केंद्राचे उद्घाटन संपन्न

ठाणे,दि.29(जिमाका):-  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जलमिशन अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या व भारतीय जैन संघटना (बीजीएस) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्या निर्देशानुसार व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता तथा अप्पर आयुक्त प्रादेशिक क्षेत्र, पुणे सुनिल कुशिरे व ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या जलशक्ती केंद्राचे उद्घाटन कळवा, ठाणे येथे संपन्न झाले. हे जलशक्ती केंद्र पाण्याच्या संबधित माहिती जलसंधारणाची तंत्रे पाण्याची गुणवत्ता, पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी संसाधन आणि ज्ञान केंद्रे म्हणून काम करतील आणि याबाबत स्थानिक लोकांना पाण्याशी संबंधित सर्व उपक्रमावर तांत्रिक मार्गदर्शन करतील, असे जलशक्ती केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान, उपविभागीय जलसंधारण अधिकारी संजय कचरे, अरुण ब...

जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी आर्थिक मदत प्रकरणांसाठी नोंदणी करावी

Image
ठाणे,दि.28(जिमाका):-  जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी  https://www.mahasainik. maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करुन घेणे अनिवार्य आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) कळविले आहे. नोंदणी केल्याशिवाय आपल्याला ओळखपत्र, पाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. महापोर्टलवर आपली नोंदणी करण्यासाठी ओळखपत्र, डिस्चार्ज बुक, आधार कार्ड, पी.पी.ओ. (PPO), पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, ई.सी.एच.एस.कार्ड. ही कागदपत्रे आवश्यक आहेत. 00000

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

  ठाणे,दि.28(जिमाका):-  सन 2020 पासून कृषी यांत्रिकीकरण योजना महाडिबीटीवर ऑनलाईन अर्ज करुन सोडत काढून राबविण्यात येते. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविताना शेतकरी बंधूनी अर्ज दाखल केल्यानंतर लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येते. महाडिबीटी प्रणालीवर योजना सुरु होवून 4 वर्षांचा कालावधी झाला आहे. ही प्रचलित ऑनलाईन सोडत पध्दत योग्य आहे किंवा कसे याबाबत शेतकरी बांधवांची मते जाणून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना महाडिबीटी प्रणाली सोडत पध्दतीबाबत पुढीलप्रमाणे शेतकरी प्रतिक्रिया देण्यात याव्यात:- 1. सध्याची सोडत पध्दत योग्य आहे का? होय / नाही 2. या व्यतिरिक्त सोडत पध्दत  “ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ”  या पध्दतीची असावी असे वाटते का? होय / नाही प्रचलित सोडत पध्दत व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी कोणती सोडत पध्दत प्राधान्याने राबवावी, याबाबतचा अभिप्राय ……………… . 3. याबाबत आपले काही नवीन अभिप्राय असल्यास. कृषी यांत्रिकीकरण सोडत पध्दतीबाबत वरीलप्रमाणे आपले म्हणणे/सूचना/मते नजिकच्या कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/...

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता दि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

  ठाणे,दि.27(जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे केले आहे. 00000

रबाळे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता दि.29 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

ठाणे,दि.27(जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे/ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, मेट्टा ग्लोबल फाऊंडेशन व नेशन बिल्डर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, पी-14, एस.आय.डी.सी, रबाळे रेल्वे स्टेशन शेजारी, ठाणे बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे केले आहे. 00000

उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठकीचे आयोजन

Image
  ठाणे,दि.27(जिमाका):-  उपमुख्यमंत्री, नगर विकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे बुधवार, दि.29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी कळविले आहे. 00000

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण संपन्न

Image
  ठाणे, दि.26 (जिमाका):-  76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी  नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे,  महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.वैदेही रानडे,  अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, मल्लिकार्जून माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, संदीप थोरात, रेवण लेंभे, उज्वला भगत, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, राहुल सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्र...

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ठाणे येथे ध्वजारोहण संपन्न

Image
पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रातील  सुधारणांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिल्याचे समाधान                            - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे   ठाणे,दि.26(जिमाका):-  आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे...