विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम -मुख्यमंत्री फडणवीस
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9pxRivyc01WXpKMDwVfoCwHNVZSX7DL8a8ZXX8EW_LAZIUxLSJIMAOtK6LAPAqaUHykmfdqk1cUwkFrhgoAvoBDMavWq0IISVQSth6yCt7TiBwQvJmQ9Vaa8F4GsaX-HHWdp_K841ZJBm/s320/CM+3.jpg)
नवी मुंबई, दि.३१(जिमाका)- सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते , असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था नवी मुंबई आयोजित नवी मुंबई उत्सव 2019 चे उदघाटन ना.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माजी राज्यपाल डॉ.डी वाय पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडको चे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आ.रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आ.मंदाताई म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामीआदी मान्यवर उपस्थित होते. कै गणपतशेट तांडेल मैदान, नेरुळ येथे हा शानदार कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवर्धिनी संस्थेच्या वतीने 11 लाख रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख...